मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
कोलकात्यात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर ढगाळ वातावरण आता हळूहळू निवळू लागलं असून भारत-पाकिस्तान सामन्यासाठी येथे दाखल झालेल्या हजारो क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. पुन्हा पाऊस न झाल्यास नियोजित वेळेनुसार इडन गार्डन्सवर रात्री ७.३० वाजल्यापासून भारत-पाक लढत सुरू होईल, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
कोलकात्यात आज सकाळपासूनच ढगाळ तावावरण होतं. त्यातच सकाळी १० च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागात जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे क्रिकेट चाहते चिंतेत पडले होते. मात्र ताज्या माहितीनुसार आता पाऊस पूर्णपणे थांबला असून आभाळही निरभ्र झालं आहे. मैदानावरील स्टाफने उत्तम कामगिरी बजावत संपूर्ण मैदान कव्हर्सनी झाकले आहे. मात्र, पुन्हा पाऊस पडू नये अशी प्रार्थना सगळेच करताना दिसत आहेत.
दरम्यान, हवामान खात्याशी संपर्क साधला असता तिथून चांगली बातमी मिळाली असून रात्री वातावरण ढगाळ राहिल पण पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
कोलकात्यात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर ढगाळ वातावरण आता हळूहळू निवळू लागलं असून भारत-पाकिस्तान सामन्यासाठी येथे दाखल झालेल्या हजारो क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. पुन्हा पाऊस न झाल्यास नियोजित वेळेनुसार इडन गार्डन्सवर रात्री ७.३० वाजल्यापासून भारत-पाक लढत सुरू होईल, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
कोलकात्यात आज सकाळपासूनच ढगाळ तावावरण होतं. त्यातच सकाळी १० च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागात जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे क्रिकेट चाहते चिंतेत पडले होते. मात्र ताज्या माहितीनुसार आता पाऊस पूर्णपणे थांबला असून आभाळही निरभ्र झालं आहे. मैदानावरील स्टाफने उत्तम कामगिरी बजावत संपूर्ण मैदान कव्हर्सनी झाकले आहे. मात्र, पुन्हा पाऊस पडू नये अशी प्रार्थना सगळेच करताना दिसत आहेत.
दरम्यान, हवामान खात्याशी संपर्क साधला असता तिथून चांगली बातमी मिळाली असून रात्री वातावरण ढगाळ राहिल पण पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.