मस्कत
मस्कतमध्ये सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी उपांत्यपूर्व फेरीत भारताने जपानला ३-२ ने नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताची रविवारी अंतिम लढत पाकिस्तानशी होणार आहे. या उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून गुरजंतने (१९ व्या मिनिटाला), चिंगलेनसानाने (४४ व्या) आणि दिलप्रीतने (५५व्या मिनिटाला) १-१ गोल केले. उत्तरादाखल जपानने २ गोल केले. जपानकडून हिरोताका वाकुरी(२२व्या) आणि हिरोताका जेनदानाने (५६व्या) मिनिटाला १-१ गोल केला.
सामन्याच्या चौथ्या आणि अंतिम भागात जपान बरोबरी साधण्याची सतत संधी शोधण्याच्या प्रयत्नात होता. पण टीम इंडियाने त्यांना असं करण्याची संधीच दिली नाही. शेवटच्या ५ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना ५५ व्या मिनिटाला दिलप्रीतने संधी मिळताच सुंदर असा गोल केला. भारताचा हा सामन्यातील तिसरा गोल होता. आणि जपानचा संघ २ गोलने मागे पडला होता.
शेवटच्या मिनिटाला (५६व्या) जपानला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. यावेळी हिरोताका जेनदानाने आपल्या संघाला नाराज केले नाही आणि भारतावर दुसरा गोल केला पण ४ मिनटांनंतर भारतीय संघाने जपानला एकही संधी दिली नाही. जपानला ३-२ ने नमवत भारताने अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले.
मस्कतमध्ये सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी उपांत्यपूर्व फेरीत भारताने जपानला ३-२ ने नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताची रविवारी अंतिम लढत पाकिस्तानशी होणार आहे. या उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून गुरजंतने (१९ व्या मिनिटाला), चिंगलेनसानाने (४४ व्या) आणि दिलप्रीतने (५५व्या मिनिटाला) १-१ गोल केले. उत्तरादाखल जपानने २ गोल केले. जपानकडून हिरोताका वाकुरी(२२व्या) आणि हिरोताका जेनदानाने (५६व्या) मिनिटाला १-१ गोल केला.
सामन्याच्या चौथ्या आणि अंतिम भागात जपान बरोबरी साधण्याची सतत संधी शोधण्याच्या प्रयत्नात होता. पण टीम इंडियाने त्यांना असं करण्याची संधीच दिली नाही. शेवटच्या ५ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना ५५ व्या मिनिटाला दिलप्रीतने संधी मिळताच सुंदर असा गोल केला. भारताचा हा सामन्यातील तिसरा गोल होता. आणि जपानचा संघ २ गोलने मागे पडला होता.
शेवटच्या मिनिटाला (५६व्या) जपानला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. यावेळी हिरोताका जेनदानाने आपल्या संघाला नाराज केले नाही आणि भारतावर दुसरा गोल केला पण ४ मिनटांनंतर भारतीय संघाने जपानला एकही संधी दिली नाही. जपानला ३-२ ने नमवत भारताने अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले.