नवी दिल्ली:
२०२२मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी या खेळाला डच्चू देण्याचा निर्णय राष्ट्रकुल फेडरेशनने घेतला असून या निर्णयामुळे नाराज होऊन भारत कदाचित या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. गुरुवारी राष्ट्रकुल फेडरेशनने २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्याचवेळी तीन नव्या खेळांना या स्पर्धेत स्थान दिले आहे. त्यात महिला क्रिकेट, बीच व्हॉलीबॉल आणि पॅरा टेबलटेनिस यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी तत्कालिन क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रकुल फेडरेशन आणि स्पर्धा संयोजकांना नेमबाजी खेळ स्पर्धेत राहावा यासाठी पत्र लिहिले होते. नेमबाजी खेळ बाहेर ठेवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६६ पैकी १६ पदके ही नेमबाजीतून मिळाली होती. आयओेएचे सचिव राजीव मेहता यांसदर्भात म्हणतात की, नेमबाजी हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे. शिवाय, ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठी तयारीचा भाग म्हणूनही पाहिली जाते. आम्ही यासंदर्भात फेडरेशनला कळविले होते तसेच सरकारनेही नेमबाजीचा मुद्दा उचलून धरला होता. तरीही या खेळाला वगळण्यात आले आहे. आयओएची कार्यकारिणी यासंदर्भात पुढील दोन आठवड्यात निर्णय घेईल. काही मोठा निर्णय (स्पर्धेतून माघार घेण्याचा) घेण्याची शक्यताही आम्ही नाकारत नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे राणिंदरसिंग यांनी बर्मिंगहॅम खेळांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.
२०२२मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी या खेळाला डच्चू देण्याचा निर्णय राष्ट्रकुल फेडरेशनने घेतला असून या निर्णयामुळे नाराज होऊन भारत कदाचित या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. गुरुवारी राष्ट्रकुल फेडरेशनने २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्याचवेळी तीन नव्या खेळांना या स्पर्धेत स्थान दिले आहे. त्यात महिला क्रिकेट, बीच व्हॉलीबॉल आणि पॅरा टेबलटेनिस यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी तत्कालिन क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रकुल फेडरेशन आणि स्पर्धा संयोजकांना नेमबाजी खेळ स्पर्धेत राहावा यासाठी पत्र लिहिले होते. नेमबाजी खेळ बाहेर ठेवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६६ पैकी १६ पदके ही नेमबाजीतून मिळाली होती. आयओेएचे सचिव राजीव मेहता यांसदर्भात म्हणतात की, नेमबाजी हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे. शिवाय, ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठी तयारीचा भाग म्हणूनही पाहिली जाते. आम्ही यासंदर्भात फेडरेशनला कळविले होते तसेच सरकारनेही नेमबाजीचा मुद्दा उचलून धरला होता. तरीही या खेळाला वगळण्यात आले आहे. आयओएची कार्यकारिणी यासंदर्भात पुढील दोन आठवड्यात निर्णय घेईल. काही मोठा निर्णय (स्पर्धेतून माघार घेण्याचा) घेण्याची शक्यताही आम्ही नाकारत नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे राणिंदरसिंग यांनी बर्मिंगहॅम खेळांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.