अ‍ॅपशहर

kaalbhairav ashtami 2022 कालभैरव जयंती : कालाष्टमीचे महत्व मान्यता आणि कथा

Kalashtami Katha : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते. मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. कालभैरव जयंती कधी आहे त्याचे महत्व मान्यता आणि कथा जाणून घेऊया...

Edited byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2022, 9:53 am
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते. मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता असे मानले जाते. या वर्षी, कालभैरव जयंती २७ नोव्हेंबर, शनिवारी येत आहे. या दिवशी भगवान भैरवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत. कालभैरव जयंती कधी आहे त्याचे महत्व मान्यता आणि कथा जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kaalbhairav ashtami importance signification and story kalashtami katha in marathi
kaalbhairav ashtami 2022 कालभैरव जयंती : कालाष्टमीचे महत्व मान्यता आणि कथा


कालभैरव जयंती कधी आहे
कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष अष्टमी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी असून, कालभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून तसेच, भगवान कालभैरवाची पूजा करावी, संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावा आणि त्यांची मनोभावे पूजा करा. देवाला फुले, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करा. यानंतर भगवंताच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालीसाचा पाठ अवश्य करावा किंवा ॐ भैरवाय नम: मंत्राचा जप करावा.

कथा अशी की...
शिव महा पुराणाच्या आधारे असे संगतात की, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी ब्रह्माला शासन करण्यासाठी कालभैरवाची उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक कालभैरवाने उडवले. परंतु ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, जो पर्यंत पापमुक्त होत नाही तो पर्यंत कालभैरवाचे ते मस्तक वाहत होते.

कालभैरव जयंती कथा
दुसरी एक कथा अशी सांगतात की, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन भगवान शिवालाच आपला वर मानले होते आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली त्यामुळे दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप करू लागला, हे सहन न होऊन सतीने तिथेच प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला तसेच दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने कालभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी कालभैरवाचे मंदिर असतेच अशी मान्यता आहे.
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज