अ‍ॅपशहर

Kartiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीचा मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया

Dev Uthani Ekadashi 2022 : देव प्रबोधिनी एकादशी ४ नोव्हेंबरला आहे. देवउठणी एकादशीपासून पुन्हा लग्न कार्य सुरू होते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही देवप्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2022, 12:23 pm
यावेळी देव प्रबोधिनी एकादशी ४ नोव्हेंबरला आहे. या दिवशी भगवान विष्णू ४ महिन्यांच्या झोपेनंतर जागे होतात, म्हणून या एकादशीला देवप्रबोधिनी म्हणतात. ४ महिन्यांपासून बंदी असलेली मांगलिक कामे, शुभ कार्य आणि विवाह, देवउठणी एकादशीपासून पुन्हा लग्न कार्य सुरू होते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही देवप्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यावेळी देवउठणी एकादशी शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी आहे. तर पारण ५ नोव्हेंबरला होणार आहे. या दिवशी तुळशीविवाहही केला जातो. देवोत्थान एकादशीची शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kartiki Ekadashi 2022
कार्तिकी एकादशीचा मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया


देवोत्थान एकादशीचा शुभ मुहूर्त


देवप्रबोधिनी एकादशी प्रारंभ : एकादशी तिथी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजून ३० मिनिटापासून सुरू होते.

देवप्रबोधिनी एकादशी समाप्ती : ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजून ०८ मिनिटे होईल.

पारण वेळ : ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून ४१ मिनिटे ते ०८ वाजून ५७ मिनिटे.

देवउठणी एकादशी तुळशी विवाह


चार महिन्यांच्या निद्रेनंतर विष्णू देवता जागृत झाल्यावर देवउठणी एकादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो आणि त्यानंतर लग्नकार्य सुरू होते. क्षीरसागरात चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर, भगवान विष्णू पुन्हा विश्वाचे संचालन करण्याचे कार्य हाती घेतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून श्री हरी झोपी जातो आणि नंतर देवउठनी एकादशीला उठतात.

देवउठनी एकादशी पूजाविधि

सर्व एकादशींप्रमाणे या एकादशीला पूजेची पद्धत सारखीच असली तरी काही घरांमध्ये या दिवशी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावले जाते. या दिवशी घराच्या अंगणात भगवान विष्णूच्या चरणांचा आकार बनवावा आणि संध्याकाळी मुख्य गेटवर दोन्ही बाजूंनी दिवे लावावेत. त्यानंतर रात्री विष्णूसह देवी-देवतांची पूजा करावी. त्यानंतर शंख आणि घंटा वाजवून भगवान विष्णूंना उठवावे.

या गोष्टींकडे लक्ष द्यावे

बरेच लोक या दिवशी निर्जला व्रत पाळतात, जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर तुम्ही फळे आणि भाज्या एकाच वेळी खाऊ शकता. या उपवासात आजारी, वृद्ध आणि गरोदर महिलांना खाण्याची परवानगी आहे. एकादशीच्या दिवशी भात किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका. जरी तुम्ही उपवास करत नसले तरी या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि मद्य सेवन करू नका.

कन्यादानचे महत्व

ज्या लोकांच्या घरात मुलगी होत नाही, त्यांना देवोत्थान एकादशीला तुळशीविवाह करून सुनेचे पुण्य मिळू शकते, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिवशी संध्याकाळी तुळशी आणि शालीग्रामचा विवाह होतो. या दिवशी तुळशीमातेला वधूप्रमाणे सजवले जाते. जर तुम्हाला तुळशीविवाह करता येत नसेल तर या दिवशी संध्याकाळी तुळशीमातेला श्रृंगाराच्या सर्व वस्तू अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू महिलेला दान करा.
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज