अ‍ॅपशहर

Ice on Shivling in Nashik: त्र्यंबकराजमध्ये देवानेच दिले भक्तांना दर्शन, असा घडला नैसर्गिक चमत्कार

Ice on Shivling in Nashik Trimbakeshwar Mandir: नाशिक जिल्ह्याचा विचार करता ऐतिहासिक वारसा तर या शहराला लाभलेला आहेच पण, सोबतच अगदी रामायणातील पौराणिक काळाशी ही नाशिकचा फार घनिष्ठ संबंध आहे. येथील आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर पिंडीवर गुरूवारी पहाटेच्या सुमारास बर्फाचे थर जमा झाल्याचे पुजाऱ्यांच्या दृष्टीपथास पडले. ही वार्ता अल्पावधीतच मंदिर परिसरासह बाहेर पसरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2022, 12:17 pm
नाशिक जिल्ह्याचा विचार करता ऐतिहासिक वारसा तर या शहराला लाभलेला आहेच पण, सोबतच अगदी रामायणातील पौराणिक काळाशी ही नाशिकचा फार घनिष्ठ संबंध आहे. अंजनेरी येथील मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर, गोदाघाट, काळाराम, गोराराम यासारखी मंदिरं किंवा अगदी आत्ताच्या रविवार कारंजा भागातील पेशवेकालीन सुंदर नारायण मंदिर अशा अनेक मंदिराचा खास वारसा येथे लाभलेला आहे. नुकतेच त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिर (Trimbakeshwar Mandir Nashik) येथे पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुजाऱ्यांकडून पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम त्र्यंबकराजमध्ये देवानेच दिले भक्तांना दर्शन, असा घडला नैसर्गिक चमत्कार


त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे प्राचीन मंदिरासंबंधी पाहायचे झालेस येथील विवध चमत्काराची माहिती समोर येत असते आणि हे मंदिर चर्चेत असते. नुकतेच मंदिरातील मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे समजताच भाविक हा चमत्कार पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे. पुजाऱ्यांकडून पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओही समोर आल्याचे ते सांगत आहेत. यावेळी संपूर्ण गाभारा थंड झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही असा चमत्कार झाला होता
यापूर्वी भारत चीन युद्धावेळी असा गोळा आल्याचे बोलले जात आहे. १९६२ साली असाच बर्फ जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ईशान्य भारतात संकट आल्या नंतर हा चमत्कार झाल्याची माहिती देण्यात येत आहे. ईशान्य भारतातील आसाम पाण्याखाली गेल्या नंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा पिंडीवर चमत्कारिक बर्फ आल्याचे तेथील पुजाऱ्यांकडून बोलले जात होते.

भुगर्भातील हालचालींच्या परिणामांची शक्यता
ज्योतिर्लिंग हे ज्वालामुखीसमान मानले जाते. त्यामुळे भूगर्भातील हालचालींचा प्रभाव येथे दिसतो. याचा वैज्ञानिक अभ्यास होणे आवश्यक आहे. आज पर्यंत येथे बर्फ झालेला कोणीही पाहिलेले नाही. मात्र हा भुगर्भातील हालचालींचे परिणाम असावा. भविष्यातील काही घटनांचा हा संकेतदेखील असू शकतो.

देवानेच भक्तांना दर्शन दिल्याची लोकांची श्रद्धादेशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग देशभरात ओळखले जाते. या घटनेमुळे पुन्हा हे मंदिर चर्चेत आले आहे. हे शिवलिंग स्वयं प्रकट झाले असून, कोणीही ते स्थापन केलेले नाही असे सांगण्यात येते. तर आज त्र्यंबकेश्वर मंदिर ज्योतिर्लिंगातील महादेवाच्या स्वयंभू शिवलिंगात बर्फ गोठला हा एक नैसर्गिक चमत्कार आहे, तो कधीच घडला नाही असे सांगितले जात आहे. अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून, त्र्यंबकराजमध्ये देवानेच भक्तांना दर्शन दिल्याची लोकांची श्रद्धा आहे.
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज