अ‍ॅपशहर

संकष्टी चतुर्थीला या उपायांनी होईल अडचणींवर मात

करोनाच्या प्रादुर्भावाचा काहींना सदुपयोग होतो आहे तर काहींना दुरूपयोग. काम करण्याची मनस्थिती नाही राहत, आळस येतो, झोपावं वाटतं, चिंता सतावते, अशात देवाच्या काही मंत्रांचे नामस्मरण केल्यास अनेक लाभ होतात. आता पौर्णिमेनंतरची संकष्टी जवळ आली असून, तुमच्या अडचणी दूर करण्यास या उपायांची मदत मिळेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2021, 7:34 am
करोनाच्या प्रादुर्भावाचा काहींना सदुपयोग होतो आहे तर काहींना दुरूपयोग. काम करण्याची मनस्थिती नाही राहत, आळस येतो, झोपावं वाटतं, चिंता सतावते, अशात देवाच्या काही मंत्रांचे नामस्मरण केल्यास अनेक लाभ होतात. आता पौर्णिमेनंतरची संकष्टी जवळ आली असून, तुमच्या अडचणी दूर करण्यास या उपायांची मदत मिळेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sankashti chaturthi 2021 remember this mantra in marathi
संकष्टी चतुर्थीला या उपायांनी होईल अडचणींवर मात


मे महिन्यात कुठला रंग ठरेल तुमच्यासाठी लाभदायक जाणून घ्या

काही समस्या असल्यास

आपल्या आयुष्यात बर्‍याच समस्या असतात, कधी कधी त्या अडचणीचं निराकरण कसं करावं हे कळत नाही, एकापाठोपाठ एक अडचणी तोंड वर करून समोर येत असतात. असं म्हणतात शिवपुराणात नमूद केलं आहे त्यानुसार, कृष्ण पक्षाची चतुर्थी (म्हणजे पौर्णिमा नंतर ची चतुर्थी) येते. त्या दिवशी सकाळी या सहा मंत्रांचा जप करावा. तसेच गणपती देवास नमन करावे यामुळे घरी वारंवार उद्भवत असलेल्या त्रासापासून आणि अडचणींपासून मुक्ती मिळेल. त्रासाचा नायनाट होईल.

ॐ सुमुखाय नम: हे देवा जर आम्ही खरी भक्ती करत असलो तर आमचा चेहरा सुद्धा तुमच्या सुंदर आणि प्रसन्न चेहऱ्याप्रमाणे सुंदर आणि प्रसन्न दिसो ही प्रार्थना .

ॐ दुर्मुखाय नम: याचा अर्थ असा की जेव्हा भाविकास एखाद्या दृष्ट प्रवृत्तीचा त्रास होत असेल तेव्हा भैरवाचं रूप दिसो आणि ती वाईट दृष्ट प्रवृत्ती घाबरून जावी.

ॐ मोदाय नम: जे सुखी आहेत, जे सुखी राहतात. जे सर्वांचं चांगलं होवो अशी प्रार्थना करतात त्या सर्वांना आनंद मिळो.

कुत्रा, गाय, मासे यांना अन्न पाणी देण्या मागे असेही लाभ

ॐ प्रमोदाय नम: इतरांनाही आनंदी करा. भक्त प्रमोदी आहे आणि अभक्त प्रमादी, जे आळशी आहेत त्या आळशी माणसाला लक्ष्मी सोडून निघून जाते. आणि जो आळशी नाही ज्यांचं कुठलंही काम पूर्ण करणं हेच प्रार्थमिक ध्येय असतं त्यांच्यावर लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते.

ॐ अविघ्नाय नम:

ॐ विघ्नकरत्र्येय नम:

गणरायाच्या या मंत्रांचा जप केल्यास सकारात्मकता राहते आणि दिवसभरातली सुस्ती, आळशीपणा नाहिसे होण्यास मदत होते. करोनाचा प्रादुर्भाव हा सर्वांना नकारात्मक आणि चिंतींत करतो आहे पण देवाचे नामस्मरण केल्यास नकारात्मकता जाऊन शरीरात सकारात्मकतेचा प्रवेश होईल.

कुंभ राशीत स्थित असणारा गुरू असा आहे फायदेशीर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज