तिळगुळ खायचयं ना' मकर संक्रांतीला!
तिळगुळ खा आणि गोडच बोला!
मुंबई: मकर संक्रात हा सण जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. हा सण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. आकाशगंगेतील ग्रहांना अनुकूल परिस्थितीत ठेवण्यासाठी ग्रहांचा राजा सूर्यग्रहाची पूजा केली जाते. मकर संक्रांति हा सण सौरकालगणनेशी संबंधित आहे तसेच या दिवसांत शेतात आणि मळ्यात पिकलेले वाळ स्त्रिया एकमेकींना भेट म्हणून देतात. काही माणसांच्या अर्वाच्य भाषेमुळं वर्षभर नको नकोसे झाले असते सर्वत्र अशांती पसरलेली असते अशा माणसांना शांत करण्यासाठी रामबाण उपाय म्हणून तिळगुळ तरी खा आणि गोडगोड बोला असा संदेशच संक्रांतीला दिला जातो. हि परंपरा युगानुयुगे आपल्या देशात सुरु आहे .देशात हा सण असाच अबाधित सुरु राहावा आणि साजरा केला जावा यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे . कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या सविस्तरपणे.
मकरसंक्रांतीतील महत्वाच्या चार महत्वाच्या गोष्टी.
१) तिळाचे महत्व :
मकर संक्रात या सणाच्या दिवशी तिळाने सूर्य , विष्णू , शनिदेवाची पूजा केली जाते. खरतर शनी महाराजांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत ठेवण्यासाठी तिळाची पूजा केली होती. तिळाची पूजा केल्याने शनी महाराजांना सूर्यदेव प्रकट झाले. त्यांनी शनिमहाराजांना वरदान दिले कि,जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करील त्यादिवशी तिळाद्वारे माझी पूजा कर. यामुळे शनीचा दोष नष्ट होऊन सुख,समृद्धी आणि शांती लाभेल.
२ ) तुपाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार तुपाचे महत्व सूर्य आणि गुरु ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार मकरसंक्रांतीला तुपाचे प्रसाद खाल्यावर विविध भोगयातनेतून मोक्षप्राप्ती मिळते. याच कारणामुळे खिचडीत तूप मिसळून पुजाऱ्यांना महाप्रसाद दिला जातो तुपाचे दिवे पेटवून सूर्यदेवाची आणि विष्णुदेवाची पूजा केल्यावर सुख समृद्धीचा अलभ्य लाभ मिळतो.
३) गुळाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्व अधिक असल्याचे सांगितले जात आहे . गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनिमहाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो.
४) उदीतडाळीचे महत्व :
मकर संक्रांतीच्या निमित्ताने उडीतडाळीचे दान केल्यावर आणि महाप्रसाद म्हणून खिचडी केल्यावर देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला असलेला शनी दोष नष्ट होतो . यावर्षी शनी मकर राशीत प्रवेश करणार असल्याने हा उपाय करून तुम्ही शनिदोषातुन मुक्त होऊ शकता. असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे .
तिळगुळ खा आणि गोडच बोला!
मुंबई: मकर संक्रात हा सण जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. हा सण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. आकाशगंगेतील ग्रहांना अनुकूल परिस्थितीत ठेवण्यासाठी ग्रहांचा राजा सूर्यग्रहाची पूजा केली जाते. मकर संक्रांति हा सण सौरकालगणनेशी संबंधित आहे तसेच या दिवसांत शेतात आणि मळ्यात पिकलेले वाळ स्त्रिया एकमेकींना भेट म्हणून देतात. काही माणसांच्या अर्वाच्य भाषेमुळं वर्षभर नको नकोसे झाले असते सर्वत्र अशांती पसरलेली असते अशा माणसांना शांत करण्यासाठी रामबाण उपाय म्हणून तिळगुळ तरी खा आणि गोडगोड बोला असा संदेशच संक्रांतीला दिला जातो. हि परंपरा युगानुयुगे आपल्या देशात सुरु आहे .देशात हा सण असाच अबाधित सुरु राहावा आणि साजरा केला जावा यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे . कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या सविस्तरपणे.
मकरसंक्रांतीतील महत्वाच्या चार महत्वाच्या गोष्टी.
१) तिळाचे महत्व :
मकर संक्रात या सणाच्या दिवशी तिळाने सूर्य , विष्णू , शनिदेवाची पूजा केली जाते. खरतर शनी महाराजांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत ठेवण्यासाठी तिळाची पूजा केली होती. तिळाची पूजा केल्याने शनी महाराजांना सूर्यदेव प्रकट झाले. त्यांनी शनिमहाराजांना वरदान दिले कि,जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करील त्यादिवशी तिळाद्वारे माझी पूजा कर. यामुळे शनीचा दोष नष्ट होऊन सुख,समृद्धी आणि शांती लाभेल.
२ ) तुपाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार तुपाचे महत्व सूर्य आणि गुरु ग्रहाशी संबंधित आहे. शास्त्रांनुसार मकरसंक्रांतीला तुपाचे प्रसाद खाल्यावर विविध भोगयातनेतून मोक्षप्राप्ती मिळते. याच कारणामुळे खिचडीत तूप मिसळून पुजाऱ्यांना महाप्रसाद दिला जातो तुपाचे दिवे पेटवून सूर्यदेवाची आणि विष्णुदेवाची पूजा केल्यावर सुख समृद्धीचा अलभ्य लाभ मिळतो.
३) गुळाचे महत्व :
ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्व अधिक असल्याचे सांगितले जात आहे . गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनिमहाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो.
४) उदीतडाळीचे महत्व :
मकर संक्रांतीच्या निमित्ताने उडीतडाळीचे दान केल्यावर आणि महाप्रसाद म्हणून खिचडी केल्यावर देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला असलेला शनी दोष नष्ट होतो . यावर्षी शनी मकर राशीत प्रवेश करणार असल्याने हा उपाय करून तुम्ही शनिदोषातुन मुक्त होऊ शकता. असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे .