अ‍ॅपशहर

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन विशेष

Shri Swami Samarth Maharaj : 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ही तिथी गुरुवार २३ मार्च रोजी आहे. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2023, 7:38 am
अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकटदिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shri Swami Samartha Maharaj


Hindu New Year Horoscope 2023: हिंदू नववर्ष प्रारंभ; वार्षिक राशीभविष्य, जाणून घेऊया पुढील एक वर्ष कसे जाईल

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.

चैत्र नवरात्राची धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हा प्रसंग वर्णिलेला आहे. आपल्या सशस्त्र क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे व सत्पुरूषांचे आशीर्वाद मिळावेत या हेतूने वासुदेव बळवंत फडके हे एक तलवार घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या (श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज) दर्शनाला जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात देऊन आशिर्वाद दिला तर आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते. त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहित असावे. त्यामुळे त्यांनी काही न बोलता एका सेवेकर्‍याला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितले. वा. ब. फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले. बराच वेळ बसून सुध्दा स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून फडके निराश झाले व तशीच तलवार घेऊन परत आले. श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील "अजून क्रांतीला योग्य वेळ आलेली नाही" असा फडक्यांना इशारा दिला होता.

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्री आत्मशुद्धी आणि मुक्तीसाठी, जाणून घेऊया व्रताचे नियम
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख