अ‍ॅपशहर

Red Water in Bhavani Temple: 'या' मंदिरातील पाणी होऊ लागलंय लाल, भविष्यात अशुभ घडण्याचे संकेत असल्याची भाविकांना भीती

काश्मिर येथील खीर भवानी मंदिर श्रीनगरहून २७ किलोमीटर दूर तुल्ला मुल्ला गावात स्थित आहे. खीर भवानी ही काश्मिरींची कुलदेवी मानली जाते. येथील लोकांचे म्हणणे आहे की, येथील पाण्याचा रंग निळा किंवा हिरवा असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते, परंतु पाणी लाल किंवा काळे असणे अत्यंत अशुभ आहे. हे आगामी संकटाचे लक्षण मानले जाते.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2022, 2:39 pm
काश्मीरमधील संकट पुन्हा एकदा समोर येणार आहे का? हे आम्ही म्हणत नाही, तर काश्मिरी पंडितांची कुलदेवी खीर भवानी मंदिराचे पाणी इथे सांगत आहे. अचानक इथल्या पाण्याचा रंग बदलून तो लाल होऊ लागला आहे. येथील लोक याकडे अशुभ संकेत म्हणून पाहत आहेत आणि काश्मीरचे संकट पुन्हा समोर येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी खीर भवानी मंदिरातील तलावातील पाणी काळे झाले होते आणि काश्मिरी पंडितांना घरे सोडावी लागली होती. येथून पळून जावे लागले होते. सध्या पाण्याचा लाल रंग पाहून काश्मिरी नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. खोऱ्यात राहणारे मुस्लीमही ते चांगले नसल्याचेच समजतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम story of the water of kheer bhavani temple in marathi red water is inauspicious
Red Water in Bhavani Temple: 'या' मंदिरातील पाणी होऊ लागलंय लाल, भविष्यात अशुभ घडण्याचे संकेत असल्याची भाविकांना भीती


बुधवारी 'हे' उपाय आणि दान करणे करिअरमध्ये प्रगतीसाठी फायदेशीर

काश्मिर येथील खीर भवानी मंदिर श्रीनगरहून २७ किलोमीटर दूर तुल्ला मुल्ला गावात स्थित आहे. खीर भवानी ही काश्मिरींची कुलदेवी मानली जाते. येथील लोकांचे म्हणणे आहे की, येथील पाण्याचा रंग निळा किंवा हिरवा असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते, परंतु पाणी लाल किंवा काळे असणे अत्यंत अशुभ आहे. हे आगामी संकटाचे लक्षण मानले जाते.

हनुमानाने देवी येथे आणली होती

काश्मीरचे हे खीर भवानी मंदिर म्हणजे रागन्या देवीचे मंदिर आहे. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाची कुलदेवी तिथे होती, परंतु जेव्हा हनुमान माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले होते, तेव्हा रावणाच्या कृत्यांना कंटाळलेल्या रागन्याने हनुमानास तिला लंकेतून नेऊन दुसरीकडे कुठेतरी स्थापन करण्यास सांगितले. पौराणिक कथेनुसार नंतर हनुमानाने त्यांना लंकेतून आणून काश्मीरमध्ये विराजीत केले.

जेवताना 'या' चुका तुम्ही देखील करता का? वेळीच टाळा अन्यथा पडेल महागात

दरवर्षीची यात्रा

दरवर्षी मे महिन्यातील पौर्णिमेच्या आठव्या दिवशी येथे यात्रा भरते आणि मोठ्या संख्येने भाविक जमतात. येथे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला पाण्याच्या टाकीचा शोध लागला. तेव्हापासून येथे दरवर्षी या तिथीला मोठी यात्रा भरते आणि खीर भवानीला खीर अर्पण केली जाते. या मंदिरातील भवानी मातेला फक्त खीरचा प्रसाद चढवला जातो.
June Planetary Transit 2022 : जूनमध्ये ५ ग्रहांच्या बदलामुळे 'या' राशींना जबरदस्त फायदा होईल
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज