नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रिय फळ आहे त्यामुळे त्याला ‘श्रीफळ’ म्हणूनही ओळखले जाते. नारळाच्या वापराने केवळ आपले आरोग्य सुदृढ राहते असे नाही तर आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठीही नारळाचे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात. श्रीफळ म्हणजेच नारळाशी संबंधित अनेक उपाययोजना
वर्षानुवर्षापासून केले जात आहेत. पूजेमध्ये श्रीफळ ठेवण्यापासून ते एकाक्षी म्हणजे एक डोळ्याच्या नारळ यासंबंधी विशीष्ट महत्व आहे. आपल्या गरजेनुसार तुम्ही नारळाचा वापर करून आपल्या समस्या दूर करू शकता. परंतु या उपायांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ मान्यतांवर आधारित आहेत हेही लक्षात ठेवावे.
यामुळे शुभकार्य सुरू करण्यापूर्वी फोडतात नारळ
लक्ष्मी मातेचेच दुसरे नाव म्हणजे 'श्री'.म्हणजे नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे. त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते. नारळाच्या झावळ्यांपासून झाडू तयार केली जाते जी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. नारळाच्या पाण्याने आरोग्य सुधारते. तसेच धनप्राप्तीही होते. नारळाचे खोबरेही अतिशय आरोग्यवर्धक मानले जाते. नारळाच्या काथ्यापासून दोरही बनवला जातो. याच नारळाच्या बहुगुणी गुणधर्मामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे. असे केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.
बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश या पाच राशींसाठी ठरणार लाभदायक
शुक्रवारी करा नारळाचे हे उपाय
शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत आणि सकाळी अंघोळीनंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी व तिला श्रीफळ अर्पण करावे. थोड्या वेळाने तो नारळ एका स्वच्छ लाल कपड्यात गुंडाळून घरातील अश्या जागी ठेवावा जिथे तुम्ही धनसंपत्ती ठेवता. जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही असे स्थान निवडावे. या उपायासाठी एकाक्षी म्हणजे एक डोळा असणारा नारळ सापडल्यास अतिउत्तम. असे केल्यास तुमच्या घरात धनसंपत्ती सोबतच सुखसमृद्धीदेखील वाढते असे मानले जाते.
नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी
जर तुम्हाला स्वतःच्या घरातच एकटं वाटत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे असे जाणवत असेल तर तुम्ही नारळाचा हा उपाय नक्की आजमावून पाहा. एक नारळ घेऊन त्यावर काजळाचा टिळा लावावा नंतर तो नारळ घरातील कानाकोपऱ्यात फिरवून नदीमध्ये वाहून टाका. असे केल्यास घरातील आनंद परत येईल व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
व्यापारात नुकसान होत असल्यास
जर काही कारणास्तव तुमच्या व्यापारात सतत तोटा होत असेल आणि मोठी गुंतवणूक व अतिशय कष्ट करूनही तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल तर तुमच्यासाठी हा उपाय लाभदायक ठरेल. गुरुवारी एक नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यात जानवे आणि सफेद रंगाची मिठाई ठेवून श्रीविष्णूच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे. असे केल्यास तुमचा व्यापार सुरळीत होईल व लाभ मिळू लागेल.
मासिक आर्थिक राशीभविष्य मे २०२१ : या राशींना मिळेल आर्थिक लाभ तर यांना करावा लागेल सांभाळून खर्च
राहु-केतु दोष दूर करण्यासाठी
जर राहु आणि केतु सारखे क्रूर ग्रह तुमच्या कुंडलीत त्रासदायी ठरत असतील तर नारळाचा उपाय नक्की करून पाहा. शनिवारी एक सुकलेला नारळ घेऊन त्याला अर्ध्यात कापावे व दोन्ही वाट्यांमध्ये साखर भरून एखाद्या निर्जन जागी जाऊन जमिनीत दाबून ठेवावे.जसजसे मुंग्या किंवा इतर किडे ते खातील तसतसे तुमच्या कुंडलीतील दोष नाहीसे होतील.
धनप्राप्ती व्हावी यासाठी
जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्याकडून व्यर्थ खर्च जास्त होत असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या शनिदेवाच्या मंदिरात ७ नारळ अर्पण करावेत व नंतर त्यांना पाण्यात सोडून द्यावे.असे केल्यास तुमचे शनिदोष कमी होतील व धनवृद्धी होईल.नजरदोष दूर करण्यासाठीही हा उपाय लाभदायक ठरतो.
वाईट नजरेपासून मुलांना वाचवण्यासाठी
जर तुमच्या मुलांना कुणाची वाईट नजर लागली आहे व त्यामुळे त्यांचे अभ्यासात मन लागत नाही किंवा ते व्यवस्थित खातपित नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यावरून एक पाणीदार नारळ ११ वेळा उतरवून एकांतात नेऊन जाळावा किंवा पाण्यात सोडून द्यावा. असे केल्यास लाभ होईल.
monthly horoscope मासिक राशीभविष्य मे २०२१: पहा मे महिना कसा असेल, कसा प्रभाव असेल ग्रह ताऱ्यांचा
वर्षानुवर्षापासून केले जात आहेत. पूजेमध्ये श्रीफळ ठेवण्यापासून ते एकाक्षी म्हणजे एक डोळ्याच्या नारळ यासंबंधी विशीष्ट महत्व आहे. आपल्या गरजेनुसार तुम्ही नारळाचा वापर करून आपल्या समस्या दूर करू शकता. परंतु या उपायांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ मान्यतांवर आधारित आहेत हेही लक्षात ठेवावे.
यामुळे शुभकार्य सुरू करण्यापूर्वी फोडतात नारळ
लक्ष्मी मातेचेच दुसरे नाव म्हणजे 'श्री'.म्हणजे नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे. त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते. नारळाच्या झावळ्यांपासून झाडू तयार केली जाते जी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. नारळाच्या पाण्याने आरोग्य सुधारते. तसेच धनप्राप्तीही होते. नारळाचे खोबरेही अतिशय आरोग्यवर्धक मानले जाते. नारळाच्या काथ्यापासून दोरही बनवला जातो. याच नारळाच्या बहुगुणी गुणधर्मामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे. असे केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.
बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश या पाच राशींसाठी ठरणार लाभदायक
शुक्रवारी करा नारळाचे हे उपाय
शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत आणि सकाळी अंघोळीनंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी व तिला श्रीफळ अर्पण करावे. थोड्या वेळाने तो नारळ एका स्वच्छ लाल कपड्यात गुंडाळून घरातील अश्या जागी ठेवावा जिथे तुम्ही धनसंपत्ती ठेवता. जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही असे स्थान निवडावे. या उपायासाठी एकाक्षी म्हणजे एक डोळा असणारा नारळ सापडल्यास अतिउत्तम. असे केल्यास तुमच्या घरात धनसंपत्ती सोबतच सुखसमृद्धीदेखील वाढते असे मानले जाते.
नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी
जर तुम्हाला स्वतःच्या घरातच एकटं वाटत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे असे जाणवत असेल तर तुम्ही नारळाचा हा उपाय नक्की आजमावून पाहा. एक नारळ घेऊन त्यावर काजळाचा टिळा लावावा नंतर तो नारळ घरातील कानाकोपऱ्यात फिरवून नदीमध्ये वाहून टाका. असे केल्यास घरातील आनंद परत येईल व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
व्यापारात नुकसान होत असल्यास
जर काही कारणास्तव तुमच्या व्यापारात सतत तोटा होत असेल आणि मोठी गुंतवणूक व अतिशय कष्ट करूनही तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल तर तुमच्यासाठी हा उपाय लाभदायक ठरेल. गुरुवारी एक नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यात जानवे आणि सफेद रंगाची मिठाई ठेवून श्रीविष्णूच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे. असे केल्यास तुमचा व्यापार सुरळीत होईल व लाभ मिळू लागेल.
मासिक आर्थिक राशीभविष्य मे २०२१ : या राशींना मिळेल आर्थिक लाभ तर यांना करावा लागेल सांभाळून खर्च
राहु-केतु दोष दूर करण्यासाठी
जर राहु आणि केतु सारखे क्रूर ग्रह तुमच्या कुंडलीत त्रासदायी ठरत असतील तर नारळाचा उपाय नक्की करून पाहा. शनिवारी एक सुकलेला नारळ घेऊन त्याला अर्ध्यात कापावे व दोन्ही वाट्यांमध्ये साखर भरून एखाद्या निर्जन जागी जाऊन जमिनीत दाबून ठेवावे.जसजसे मुंग्या किंवा इतर किडे ते खातील तसतसे तुमच्या कुंडलीतील दोष नाहीसे होतील.
धनप्राप्ती व्हावी यासाठी
जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्याकडून व्यर्थ खर्च जास्त होत असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या शनिदेवाच्या मंदिरात ७ नारळ अर्पण करावेत व नंतर त्यांना पाण्यात सोडून द्यावे.असे केल्यास तुमचे शनिदोष कमी होतील व धनवृद्धी होईल.नजरदोष दूर करण्यासाठीही हा उपाय लाभदायक ठरतो.
वाईट नजरेपासून मुलांना वाचवण्यासाठी
जर तुमच्या मुलांना कुणाची वाईट नजर लागली आहे व त्यामुळे त्यांचे अभ्यासात मन लागत नाही किंवा ते व्यवस्थित खातपित नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यावरून एक पाणीदार नारळ ११ वेळा उतरवून एकांतात नेऊन जाळावा किंवा पाण्यात सोडून द्यावा. असे केल्यास लाभ होईल.
monthly horoscope मासिक राशीभविष्य मे २०२१: पहा मे महिना कसा असेल, कसा प्रभाव असेल ग्रह ताऱ्यांचा