अ‍ॅपशहर

या गोष्टी शिवलींगावर अर्पित करू नका, वाचा सविस्तर

शिवरात्रीच्या दिवशी पूजेचे विशेष महत्व असते. मात्र शिवलींगावर ह्या गोष्टी अर्पित करू नका.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2021, 2:24 pm
भोलेनाथांची मनापासून उपासना केल्यास त्याचे उचित फळ मिळते. परंतु सोमवार आणि शिवरात्रीच्या दिवशी पूजेला विशेष महत्व आहे. जर तुम्हीही शिवरात्रीच्या दिवशी उपवास करुन व पूजा करुन शिवजींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण शिवपूजनामध्ये काही गोष्टींचा वापर करण्यास मनाई आहे. जाणून घेऊया ह्या कोणत्या गोष्टी आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम this things should not be offered to lord shiva
या गोष्टी शिवलींगावर अर्पित करू नका, वाचा सविस्तर


हे अर्पण केल्यास पूजा करणे व्यर्थ ठरते

भगवान शंकरांना चुकूनही हळद अर्पण करू नये. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक असून हळद स्त्रियांशी संबंधित आहे. यामुळे भोलेनाथ यांना हळद चढवली जात नाही. असे म्हणतात की जर तुम्ही शिवजीच्या पूजेमध्ये हळद वापरली तर तुमची पूजा व्यर्थ ठरते. म्हणून शिवलिंगावर चुकुनसुद्धा हळद अर्पण करू नका.

हे अर्पण करण्यास सक्त मनाई आहे

भोलेनाथ यांना कधीही नारळाचे पाणी अर्पित करू नये.इतर देवांना नारळ फोडून नारळाचे पाणी अर्पण केले जाते परंतु शिवजींना नारळ निषिद्ध आहे. शिवलिंगावर अर्पण केलेल्या सर्व वस्तू निर्मळ असाव्यात. म्हणजेच ज्याचे सेवन करू नये. त्याचा परत वापर करू नये. देवतांना नारळाचे पाणी अर्पण केल्यावर तीर्थ स्वरूपात प्राशन केले जाते म्हणून शिवलिंगावर नारळपाणी अर्पण करण्यास मनाई आहे.

कुंकूसुद्धा निषिध्द

भोलेशंकराच्या पूजेमध्ये लाल रंग, केतकी आणि केवड्याची फुले कधीही अर्पण केली जात नाहीत. याशिवाय कुंकू अर्पण करण्यास बंदी आहे. असे मानले जाते की या गोष्टी अर्पण केल्यास उपासनेचे फळ मिळत नाही. लक्षात ठेवा की भोले भंडारीला पांढर्‍या रंगाची फुले अर्पण करावीत. यामुळे ते लवकर प्रसन्न होतात. कुंकूबद्दल असे म्हणतात की हिंदू स्त्रिया ते आपल्या पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी वापरतात. परंतु भगवान शिव हे वैरागी आहे, म्हणूनच, शिवलिंगावर कुंकू अर्पण केले जात नाही.

शिवपूजेत हे सुद्धा निषिद्ध आहे

भोलेशंकर यांना कधीही तुळशी अर्पण करु नये. पौराणिक मान्यतेनुसार, जालंधर नावाच्या एका असुराने आपल्या पत्नीची पतिव्रता आणि विष्णूच्या कवचामुळे अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. तो अमर असल्याने तो जगभर दहशत निर्माण करीत होता. अशा परिस्थितीत भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी त्यांच्या वधासाठी त्याला ठार मारण्याची योजना आखली. वृंदाला जेव्हा तिच्या पती जालंधरच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा ती खूप दु:खी झाली व संतापली. या रागाच्या भरात तिने भगवान शिव यांना शाप दिला की तुळशीची पाने त्यांच्या पूजेमध्ये नेहमी निषिद्ध असतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज