अ‍ॅपशहर

करोना काळात वरुथिनी एकादशीला करावे हे उपाय

यादिवशी आणखी काही उपाय केल्यास लक्षमी-नारायण आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसेच आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2021, 6:33 pm
वरुथिनी एकादशी म्हणजेच चैत्र कृष्ण एकादशी. यावर्षी ती शुक्रवार ७ मे रोजी म्हणजे उद्या असणार आहे.असे मानले जाते की यादिवशी श्रीविष्णूच्या वामन अवताराची पूजा केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतात. त्याशिवाय जर यादिवशी आणखी काही उपाय केल्यास लक्षमी-नारायण आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसेच आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम varuthini ekadashi 2021 remedy in marathi
करोना काळात वरुथिनी एकादशीला करावे हे उपाय


​वरुथिनी एकादशीच्या दिवशी सगळ्यात आधी करावा हा उपाय

ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूला तुळशीची माळ अर्पण करावी. तुळस ही लक्ष्मी-नारायणाला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे तुळस अर्पण केल्यास ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्यासोबतच वरुथिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून श्रीविष्णूला अभिषेक करावा. असे केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात व सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.

धनप्राप्तीसाठी लाल किताब या ग्रथांतील हे उपाय ठरतील लाभदायक

​धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा असल्यास

जर पैश्यांशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल तर वरुथिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि श्रीविष्णू यांची एकत्रित पूजाअर्चा करावी. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. पिंपळाच्या झाडात श्रीविष्णूचा वास असतो असे मानले जाते, त्यामुळेच वरुथिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्यास व त्याची पूजा केल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात व आपल्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी कायम राहते.

हा नैवेद्य दाखवल्यास पूर्ण होतील सर्व मनोकामना

ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी-नारायणाला नैवेद्य दाखवताना त्यात पिवळ्या रंगाचा विशेष प्रयोग करावा. त्यासाठी श्रीविष्णूला केशरयुक्त खीर,पिवळे फळ,पिवळ्या रंगाची मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्यास श्रीविष्णू प्रसन्न होतात व आपली बिघडलेली, रखडलेली कामे पुन्हा सुरळीत होतात असे मानले जाते. परंतु हे सर्व उपाय करत असताना मनात कोणाविषयीही वाईट भावना किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याची भावना नसावी अन्यथा श्रीविष्णूचा कोप होतो.

ह्या कारणांमुळे एकादशीला तांदूळ खात नाही

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज