अ‍ॅपशहर

राखी बांधण्यासाठी 'हा' आहे योग्य मुहूर्त

१५ ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा आहे. धार्मिक दृष्ट्या या पौर्णिमेचं अधिक महत्त्व आहे. याच दिवशी रक्षाबंधनदेखील आहे. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुख-समृद्धीसाठी लक्ष्मी-नारायणाची पूजा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 3:04 pm
१५ ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा आहे. धार्मिक दृष्ट्या या पौर्णिमेचं अधिक महत्त्व आहे. याच दिवशी रक्षाबंधनदेखील आहे. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुख-समृद्धीसाठी लक्ष्मी-नारायणाची पूजा केली. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी भगवान विष्णुंना राजा बळीच्या वरदानातुन मुक्त करून पाताळ लोकातून वैकुंठात घेऊन येते. तसंच या दिवशी अमरनाथ यात्रा पूर्ण होते. श्रावण पैर्णिमेचं अधिक महत्त्व रक्षाबंधनामुळं आहे. या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. व त्या बदल्यात भाऊ बहिणीला मी सदैव तुझं रक्षण करीन असा आशिर्वाद देतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raksha-bandhan


रक्षाबंधन कधी करावं

रक्षाबंधन भद्रा मुक्त पौर्णिमा या तिथीनुसार साजरा करण्यात यावा अशी मान्यता आहे. या वर्षी मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्योदयाच्या आधीच भद्रा समाप्त होत आहे. यामुळं सूर्यास्तापर्यंत कधीही बहिण भावाला राखी बांधू शकतात. असं असलं तरी राखी बांधण्याचा चांगला मुहूर्त कोणता हे जाणून घेऊया...

१५ ऑगस्टला गुरूवार असल्यानं दुपारी १. ३० ते ३ पर्यंत राहूकाल आहे. तर, ९ ते १०.३० पर्यंत गुलिल काल आणि सकाळी ६ ते ७.३० पर्यंत यमगंड काल असणार आहे. या तीन वेळा सोडून तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी राखी बांधू शकता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज