श्री श्री आनंदमुर्ती
जेव्हा आयुष्याला गती मिळते किंवा अधोगती होते, तिथे संवेग किंवा आकर्षणही असतं. दोन्ही राहतील असंही होतं. एक माणसाच्या आयुष्याला गती मिळते तेव्हा भौतिक गोष्टींच्या आकर्षणामुळे तो पुढे ढकलला जातो. अनेकदा आपल्या आयुष्याला गती मिळते. आपण पुढे जातो. पण मन मात्र मागेच राहतं. आपलं मन दुर्बल असतं. त्याला पुढे जाण्याची इच्छा नसते. मनाने झोकून, शरिराने झोकून काम करायला हवं असं आपण अनेकदा म्हणतो. हे झोकून देणं माणसाच्या शारिरीक, आध्यात्मिक आणि मानसिक जगाचा एक अविभाज्य घटक असतो.
जगामध्ये अनेक प्रकारच्या गती आहेत. पण भौतिक जगातीस गती तात्कालिक आहेत. त्या नाशिवंत आहेत. आध्यात्मिक जगातील गती मात्र अमर आहेत. चिरकाल टिकणाऱ्या आहेत. भौतिक जगामध्ये माणूस जेव्हा झोकून काम करतो तेव्हा त्याच्या मानसिक शक्ती आणि कर्मशक्ती त्याची मदत करतात. पण त्याच्या आत्मिक शक्ती मात्र त्यात उतरत नाहीत. जेव्हा तो त्याचे सर्वस्व पणाला लावून, जीव ओतून काम करतो तेव्हाच त्याचा जन्म सार्थ ठरतो. त्याचे कर्म सार्थ ठरतात. अशाप्रकारे जन्म आणि कर्माचे सार्थ ठरल्यास त्यालाच भक्ती असं म्हटलं जातं.
भौतिक जगातील सर्वच गोष्टींमध्ये भक्ती राहू शकत नाही. भक्ती हा एक परमोच्च बिंदू आहे. जिथे ज्ञान आणि कर्म एकत्र येतात तिथेच भक्तीचा परमोच्च बिंदू गाठला जातो. त्यामुळे आयुष्यात भक्ती महत्त्वाची असते. भक्तीचेही एक आकर्षण आहे आणि ते चिरकाल टिकणारं आहे. या चिरकाल टिकणाऱ्या भक्तीच्या आकर्षणाला प्रेरणा म्हणतात. आयुष्यात भक्ती आणि प्रेरणा नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. जेव्हा भक्तीभावाने आपल्या आदर्शांकडून प्रेरणा घेऊन आपण कार्य करतो तेव्हाच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. इतर कोणताही मार्ग नाही.
जेव्हा आयुष्याला गती मिळते किंवा अधोगती होते, तिथे संवेग किंवा आकर्षणही असतं. दोन्ही राहतील असंही होतं. एक माणसाच्या आयुष्याला गती मिळते तेव्हा भौतिक गोष्टींच्या आकर्षणामुळे तो पुढे ढकलला जातो. अनेकदा आपल्या आयुष्याला गती मिळते. आपण पुढे जातो. पण मन मात्र मागेच राहतं. आपलं मन दुर्बल असतं. त्याला पुढे जाण्याची इच्छा नसते. मनाने झोकून, शरिराने झोकून काम करायला हवं असं आपण अनेकदा म्हणतो. हे झोकून देणं माणसाच्या शारिरीक, आध्यात्मिक आणि मानसिक जगाचा एक अविभाज्य घटक असतो.
भौतिक जगातील सर्वच गोष्टींमध्ये भक्ती राहू शकत नाही. भक्ती हा एक परमोच्च बिंदू आहे. जिथे ज्ञान आणि कर्म एकत्र येतात तिथेच भक्तीचा परमोच्च बिंदू गाठला जातो. त्यामुळे आयुष्यात भक्ती महत्त्वाची असते. भक्तीचेही एक आकर्षण आहे आणि ते चिरकाल टिकणारं आहे. या चिरकाल टिकणाऱ्या भक्तीच्या आकर्षणाला प्रेरणा म्हणतात. आयुष्यात भक्ती आणि प्रेरणा नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. जेव्हा भक्तीभावाने आपल्या आदर्शांकडून प्रेरणा घेऊन आपण कार्य करतो तेव्हाच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. इतर कोणताही मार्ग नाही.