अर्चना झा
कुरुक्षेत्रात युद्धासाठी एकत्र आलेल्या माझ्या पुत्रांचे आणि पांडूपुत्रांचे काय सुरू आहे? असा प्रश्न धृतराष्ट्र संजयला भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोक विचारतात. संपूर्ण भगवद्गीतेत धृतराष्ट्रानं केवळ हाच एक प्रश्न विचारला आहे. तोही मुलांबद्दल. आपली मुलं युद्धभूमीवर काय करताहेत हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. हा प्रश्न म्हणजे धृतराष्ट्राचा 'माझ्या' माणसांबद्दलचा मोहच आहे. प्रेम हा शुद्ध रूपातील मोह असतो. त्या मोहामुळं जीवन समृद्ध होऊन जातं.
आपल्या नातेवाईकांना सुखसुविधा मिळाव्यात या उद्देशानेच कर्म केले जाते. जीवनात मोह नसेल तर जीवनात काही प्रयोजनच शिल्लक राहत नाही. मोह नसेल तर मन निराश, भावनाशून्य होईल. मोहाला माया असेही संबोधले जाते. संसार हा मायेतच गुरफटला गेला आहे. मनुष्य, पशु, पक्षी आणि देवता यांपैकी कोणीही मोहापासून मुक्त नाही. चिमणी आपल्या पिलांना चोचीने दाणे टिपून त्यांना घास भरवते. स्वत: पावसात भिजते पण पिले भिजू नयेत म्हणून त्यांना पंखाखाली घेते. श्रीरामानेही लंकेत जाऊन दुष्टांचा नाश केला होता यात श्रीरामाचा सीतेप्रती असलेला मोह दिसून येतो. मग मोहाचा तिरस्कार का केला जातो? तीर्थयात्रेला जाणाऱ्याला सतत मोहापासून दूर राहा, असा उपदेश केला जातो. कबीर 'माया मुई न मन मुआ' असं म्हणतात.
इच्छाशक्ती तीव्र असेल तर कुठल्याही गोष्टीपासून आपण वंचित राहू शकत नाही. इच्छाशक्तीमुळे तुम्हाला मोठे धाडस करण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात नातेवाईकांचा विचार येतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काहीही करायला सदैव तत्पर असतो. मग याच न्यायाने धृतराष्ट्र चुकीचे कसे ठरतील? तेही आपल्या मुलांची चौकशी करत होते. धृतराष्ट्राचा मोह हा विकारग्रस्त मोह आहे असा मोह विवेकशून्य ठरतो. अशा मोहामुळं जीव एखाद्या गोष्टीत गुंतून राहतो आणि आपण धर्म तसेच नीतीच्या विरोधात जाऊनही त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतो.
आपण बंधनातून मुक्त कसे होणार? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मोक्ष म्हणजेच मुक्ती आणि आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं आहे. बंधमुक्त होण्याच्या इच्छेनेच राजा जनकाने ऋषी अष्टावक्रला प्रश्न विचारला आणि मोक्षाचा मार्ग सोपा व्हावा म्हणून अष्टावक्रने उत्तर दिले, 'यदि देहं पृथकृत्य चित्ति विश्राम्य तिष्ठसि। अधुनैव सुखी शान्तः बन्धमुक्तो भविष्यसि।।' म्हणजेच बंधमुक्त होण्यासाठी देह आणि स्वत:मध्ये थोडं अंतर असणे आवश्यक आहे.
भावनेच्या भरात आपण काय चांगलं, काय वाईट याकडे दुर्लक्ष करतो. मला वाटतं मी जे म्हणतो तेच नेहमी खरं असतं, असाच धृतराष्ट्राचा समज झाला. व्यापक अर्थानं मोहाचा विचार केल्यास समाजासाठी मोह उपयोगी ठरतो. मात्र, हे तेव्हाच घडतं, जेव्हा आपण अहंकार बाजूला सारून समाजासाठी काम करतो. तटस्थतेची भावना आपल्याला जीवनातून मुक्त करते. मोह आणि निर्मोह या दोघांमधला समन्वय म्हणजेच मुक्ती होय.
कुरुक्षेत्रात युद्धासाठी एकत्र आलेल्या माझ्या पुत्रांचे आणि पांडूपुत्रांचे काय सुरू आहे? असा प्रश्न धृतराष्ट्र संजयला भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोक विचारतात. संपूर्ण भगवद्गीतेत धृतराष्ट्रानं केवळ हाच एक प्रश्न विचारला आहे. तोही मुलांबद्दल. आपली मुलं युद्धभूमीवर काय करताहेत हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. हा प्रश्न म्हणजे धृतराष्ट्राचा 'माझ्या' माणसांबद्दलचा मोहच आहे. प्रेम हा शुद्ध रूपातील मोह असतो. त्या मोहामुळं जीवन समृद्ध होऊन जातं.
आपल्या नातेवाईकांना सुखसुविधा मिळाव्यात या उद्देशानेच कर्म केले जाते. जीवनात मोह नसेल तर जीवनात काही प्रयोजनच शिल्लक राहत नाही. मोह नसेल तर मन निराश, भावनाशून्य होईल. मोहाला माया असेही संबोधले जाते. संसार हा मायेतच गुरफटला गेला आहे. मनुष्य, पशु, पक्षी आणि देवता यांपैकी कोणीही मोहापासून मुक्त नाही. चिमणी आपल्या पिलांना चोचीने दाणे टिपून त्यांना घास भरवते. स्वत: पावसात भिजते पण पिले भिजू नयेत म्हणून त्यांना पंखाखाली घेते. श्रीरामानेही लंकेत जाऊन दुष्टांचा नाश केला होता यात श्रीरामाचा सीतेप्रती असलेला मोह दिसून येतो. मग मोहाचा तिरस्कार का केला जातो? तीर्थयात्रेला जाणाऱ्याला सतत मोहापासून दूर राहा, असा उपदेश केला जातो. कबीर 'माया मुई न मन मुआ' असं म्हणतात.
इच्छाशक्ती तीव्र असेल तर कुठल्याही गोष्टीपासून आपण वंचित राहू शकत नाही. इच्छाशक्तीमुळे तुम्हाला मोठे धाडस करण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात नातेवाईकांचा विचार येतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काहीही करायला सदैव तत्पर असतो. मग याच न्यायाने धृतराष्ट्र चुकीचे कसे ठरतील? तेही आपल्या मुलांची चौकशी करत होते. धृतराष्ट्राचा मोह हा विकारग्रस्त मोह आहे असा मोह विवेकशून्य ठरतो. अशा मोहामुळं जीव एखाद्या गोष्टीत गुंतून राहतो आणि आपण धर्म तसेच नीतीच्या विरोधात जाऊनही त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतो.
आपण बंधनातून मुक्त कसे होणार? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मोक्ष म्हणजेच मुक्ती आणि आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं आहे. बंधमुक्त होण्याच्या इच्छेनेच राजा जनकाने ऋषी अष्टावक्रला प्रश्न विचारला आणि मोक्षाचा मार्ग सोपा व्हावा म्हणून अष्टावक्रने उत्तर दिले, 'यदि देहं पृथकृत्य चित्ति विश्राम्य तिष्ठसि। अधुनैव सुखी शान्तः बन्धमुक्तो भविष्यसि।।' म्हणजेच बंधमुक्त होण्यासाठी देह आणि स्वत:मध्ये थोडं अंतर असणे आवश्यक आहे.
भावनेच्या भरात आपण काय चांगलं, काय वाईट याकडे दुर्लक्ष करतो. मला वाटतं मी जे म्हणतो तेच नेहमी खरं असतं, असाच धृतराष्ट्राचा समज झाला. व्यापक अर्थानं मोहाचा विचार केल्यास समाजासाठी मोह उपयोगी ठरतो. मात्र, हे तेव्हाच घडतं, जेव्हा आपण अहंकार बाजूला सारून समाजासाठी काम करतो. तटस्थतेची भावना आपल्याला जीवनातून मुक्त करते. मोह आणि निर्मोह या दोघांमधला समन्वय म्हणजेच मुक्ती होय.