श्री श्री आनंदमूर्ती
वृत्ती मुख्यत: दोन प्रकरच्या असतात-साधारण वृत्ती आणि सहज वृत्ती. प्रगत जीवनात सहज वृत्ती आणि अन्य वृत्तीही असतात, ज्या अध्ययनाने, सामाजिक आदान -प्रदानाने, सांस्कृतिक, अनुशासन, आध्यात्मिक साधनेने मजबूत होतात. मनाच्या विकसित अवस्थेत धर्म, सामर्थ्य यांची उपलब्धी होते तेव्हा असं मानलं जातं की, मनाची काही प्रगती झाली आहे. प्रत्येक विकासाच्या परावर्तीत चरणात जेव्हा कार्यक्षमतेला गृहीत धरले जाते, त्यावेळी हे ही गृहीत धरले जाते की, जीवनाची आणखी प्रगती झाली आहे. मनुष्याचे जीवन अन्य जीवांपासून प्गत होते. ही प्रगती कशाप्रकारे होते हे जाणून घेणे, आवश्यक आहे.
आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवे की, वृत्ती काही-काही सहज प्रकारच्या असतात. पूर्वीही याबाबत सांगितलं आहे की, मनुष्य साधने द्वारे, ज्ञान-विद्या यांच्या चर्चेद्वारे, आपापसातील असलेल्या संबंधांमुळे आपल्या वृत्तीत वाढ होते. कधी कधी असेही होते की, मनुष्यावर कोणत्याही वृत्तीचा बाहेरून दबाव टाकण्यात येतो आणि त्यांना गृहीत धरून मार्गक्रमण करा असे सांगितले जाते. कोणत्याही प्रकारे त्याची अवहेलना होता कामा नये. अशाप्रकारे यात वाढ होऊन एक कल्पना समोर येते, जी मनुष्याला प्रगती करू देत नाही.
ती कल्पना सांगते की, अमुक धर्मशास्त्रात ही गोष्ट सांगितलेली आहे. हे सर्व काही मनुष्याने केलेला प्रपंच आहे हे ध्यानात येते, तरीही ही गोष्ट त्याच्या मर्यादेपलीकडची आहे हे ध्यानात येऊ लागते. हे विश्व माझ्या परमेश्वराने निर्माण केलेले आहे, माझे आहे, तरीही मी हा अथांग सागर कसा पार करू? शास्त्रात सांगितले आहे की, असे करू नका. शास्त्रात सांगितले आहे, तर काय करावे? मानावं तर लागेल की, आणि सोबतच मन असा विचार करेल की, हे करणं योग्य नाही. तरीही शास्त्रांविरूद्ध काहीही बोलू शकत नाही, कारण त्यात साहस नाही.
ही एक विचारधारा आहे जी, प्रगतीमध्ये बाधा आणते आहे. मनाची गती थांबवता येते यालाच भाव जडत्व असे म्हणतात. मग ते चुकीच्या पद्धतीने येऊ दे किंवा शास्त्रांतूनही येऊ दे, पण ते अवश्य नाकारले जाते. जर कोणी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली तर त्याला मानल्याने प्रगती होते. तो पुढे चालत राहतो आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही.पण हा सिद्धांत मार्गात अडथळे आणून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच शास्त्रात जी शिकवण दिलेली आहे ती चुकीची आहे, दर्शन चुकीची शिकवण देते किंवा असं म्हणता येईल की, शास्त्र आणि दर्शन विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या व्याख्येमुळे चुकीचा संदेश तयार होतो.
परिणाम एकच आहे. उपाय हाच आहे की, ज्या ठिकाणी युक्ती काम करत नाही तेथे मानवतेच्या आधारे विचार करावा. माझ्यासाठी माझे प्राण जितके प्रिय आहेत, एका पशुसाठी त्याचे प्राणही तेवढेच प्रिय आहेत. मी त्यांच्या प्रति दया का दाखवू आणि जर कोणी म्हणत असेल की, यामुळे पशुला आपल्या पशु जीवनापासून मुक्ती मिळत असेल, तर तुम्ही तर मनुष्य आहात आणि मनुष्यही जीव आहे. तर आपणही आपल्या मानेवर सुरा फिरवून मनुष्य जीवनापासून मुक्ती का नाही मिळवत? निश्चय करा की या जडत्वामुळे काही जुळत नाही याची खात्री करा आणि दुसरीकडे मानवाची विशाल हृदयता म्हणजेच मानवता होय. ज्या ठिकाणी आध्यात्मिकता टिकते त्या ठिकाणी माणुसकीचा मार्ग प्रकट होतो.
वृत्ती मुख्यत: दोन प्रकरच्या असतात-साधारण वृत्ती आणि सहज वृत्ती. प्रगत जीवनात सहज वृत्ती आणि अन्य वृत्तीही असतात, ज्या अध्ययनाने, सामाजिक आदान -प्रदानाने, सांस्कृतिक, अनुशासन, आध्यात्मिक साधनेने मजबूत होतात. मनाच्या विकसित अवस्थेत धर्म, सामर्थ्य यांची उपलब्धी होते तेव्हा असं मानलं जातं की, मनाची काही प्रगती झाली आहे. प्रत्येक विकासाच्या परावर्तीत चरणात जेव्हा कार्यक्षमतेला गृहीत धरले जाते, त्यावेळी हे ही गृहीत धरले जाते की, जीवनाची आणखी प्रगती झाली आहे. मनुष्याचे जीवन अन्य जीवांपासून प्गत होते. ही प्रगती कशाप्रकारे होते हे जाणून घेणे, आवश्यक आहे.
आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवे की, वृत्ती काही-काही सहज प्रकारच्या असतात. पूर्वीही याबाबत सांगितलं आहे की, मनुष्य साधने द्वारे, ज्ञान-विद्या यांच्या चर्चेद्वारे, आपापसातील असलेल्या संबंधांमुळे आपल्या वृत्तीत वाढ होते. कधी कधी असेही होते की, मनुष्यावर कोणत्याही वृत्तीचा बाहेरून दबाव टाकण्यात येतो आणि त्यांना गृहीत धरून मार्गक्रमण करा असे सांगितले जाते. कोणत्याही प्रकारे त्याची अवहेलना होता कामा नये. अशाप्रकारे यात वाढ होऊन एक कल्पना समोर येते, जी मनुष्याला प्रगती करू देत नाही.
ती कल्पना सांगते की, अमुक धर्मशास्त्रात ही गोष्ट सांगितलेली आहे. हे सर्व काही मनुष्याने केलेला प्रपंच आहे हे ध्यानात येते, तरीही ही गोष्ट त्याच्या मर्यादेपलीकडची आहे हे ध्यानात येऊ लागते. हे विश्व माझ्या परमेश्वराने निर्माण केलेले आहे, माझे आहे, तरीही मी हा अथांग सागर कसा पार करू? शास्त्रात सांगितले आहे की, असे करू नका. शास्त्रात सांगितले आहे, तर काय करावे? मानावं तर लागेल की, आणि सोबतच मन असा विचार करेल की, हे करणं योग्य नाही. तरीही शास्त्रांविरूद्ध काहीही बोलू शकत नाही, कारण त्यात साहस नाही.
ही एक विचारधारा आहे जी, प्रगतीमध्ये बाधा आणते आहे. मनाची गती थांबवता येते यालाच भाव जडत्व असे म्हणतात. मग ते चुकीच्या पद्धतीने येऊ दे किंवा शास्त्रांतूनही येऊ दे, पण ते अवश्य नाकारले जाते. जर कोणी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली तर त्याला मानल्याने प्रगती होते. तो पुढे चालत राहतो आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही.पण हा सिद्धांत मार्गात अडथळे आणून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच शास्त्रात जी शिकवण दिलेली आहे ती चुकीची आहे, दर्शन चुकीची शिकवण देते किंवा असं म्हणता येईल की, शास्त्र आणि दर्शन विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या व्याख्येमुळे चुकीचा संदेश तयार होतो.
परिणाम एकच आहे. उपाय हाच आहे की, ज्या ठिकाणी युक्ती काम करत नाही तेथे मानवतेच्या आधारे विचार करावा. माझ्यासाठी माझे प्राण जितके प्रिय आहेत, एका पशुसाठी त्याचे प्राणही तेवढेच प्रिय आहेत. मी त्यांच्या प्रति दया का दाखवू आणि जर कोणी म्हणत असेल की, यामुळे पशुला आपल्या पशु जीवनापासून मुक्ती मिळत असेल, तर तुम्ही तर मनुष्य आहात आणि मनुष्यही जीव आहे. तर आपणही आपल्या मानेवर सुरा फिरवून मनुष्य जीवनापासून मुक्ती का नाही मिळवत? निश्चय करा की या जडत्वामुळे काही जुळत नाही याची खात्री करा आणि दुसरीकडे मानवाची विशाल हृदयता म्हणजेच मानवता होय. ज्या ठिकाणी आध्यात्मिकता टिकते त्या ठिकाणी माणुसकीचा मार्ग प्रकट होतो.