अ‍ॅपशहर

शाळेत न जाण्याचा हट्ट; पुढे मुलगा झाला राष्ट्रपती!

लहान मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना विविध प्रलोभने दाखवली जातात. मोबाइल हातात दिले जातात. मात्र, एखादा मुद्दा योग्य पद्धतीने समजावून सांगितला जातोच असे नाही. आजच्या काळातील धावपळीमुळे पालकांचा संयम कमी होत चालला आहे, असेच दिसते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 4:21 pm
आजच्या काळात माणसाला कोणतीही गोष्ट इन्स्टंट मिळावी, असे वाटत असते. किंचितसे अपयश खूप मोठे वाटायला लागते. माणसाचा संयम सुटत चालला आहे. लहान मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना विविध प्रलोभने दाखवली जातात. मोबाइल हातात दिले जातात. मात्र, एखादा मुद्दा योग्य पद्धतीने समजावून सांगितला जातोच असे नाही. काही दशकांपूर्वीचे पालक आपल्या मुलांना गोष्टी समजावून सांगत. विविध उदाहरणे दिली जात. आजच्या काळातील धावपळीमुळे पालकांचा संयम कमी होत चालला आहे, असेच दिसते. एक मुलगा शाळेत जाणारच नाही, असा हट्ट करू लागला. पालकांनी खूप समजावले. वडिलांच्या मित्रांनी त्याला एक प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलाला गोष्ट पटली आणि तो शाळेत जायला तयार झाला. पुढे जाऊन तोच मुलगा देशाचा राष्ट्राध्यक्ष झाला. चला तर मग, नेमके काय घडले जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sukarno


'हे' आहेत एप्रिल महिन्यातील मुख्य सण-उत्सव

मराठी नववर्षः 'या' राशींना ठरणार यंदाचे वर्ष लाभदायक

एक मुलगा अचानक हट्ट करू लागला की, काही झाले तरी शाळेत जाणार नाही. शाळेची वेळ जवळ येत गेली, तसे शाळेत न जाण्याचा त्याचा निर्धार पक्का होत गेला. मुलाच्या वडिलांनी त्याला जवळ बोलावले. असे काय घडले आहे, ज्यामुळे शाळेत न जाण्याचा हट्ट धरतोयस, असे वडिलांनी मुलाला विचारले. वर्गातील सर्व मुले मला चिडवतात, असे प्रत्युत्तर मुलाने वडिलांना दिले. वडील म्हणाले की, वर्गातील मुलांच्या चेष्टेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही दिवसांनंतर तीच मुले तुझे मित्र होतील. तुला आपलेसे करून घेतील. मात्र, शाळेत न जाण्याबाबत मुलगा ठाम राहिला.

कलियुगाची किती वर्षे सरली? विष्णुपुराण सांगते...

सामर्थ्याची साधना, साधनेचे सामर्थ्य सांगणारे समर्थ

पालकांनी मुलाला खूप समजावले. मात्र, काही केल्या मुलगा शाळेत जाणार नाही, असेच सांगत राहिला. मुलाला कसे समजवावे, हे पालकांना कळेना. शेवटी मुलाच्या वडिलांनी ही बाब आपल्या एका मित्राच्या कानावर घातली. वडील, मुलगा आणि वडिलांचा मित्र बाहेर मोकळ्या वातावरणात गेले. जवळच एक पाण्याचा पाट वाहत होता. वडिलांच्या मित्राने एक दगड घेतला आणि वाहत्या पाण्यात टाकला. दगडामुळे पाण्याचा प्रवाह थांबला. पाणी साचायला लागले आणि काहीवेळाने अचानक पाणी तीव्र गतीने वाहायला लागले. तो दगड पाण्यात बुडाला. या प्रात्यक्षिकानंतर वडिलांचा मित्र मुलाला म्हणाला की, बाळा, कोणत्याही अडचणींना, समस्यांना घाबरून जाता कामा नये. पाण्यात दगड टाकल्यावर पाण्याचा प्रवाह थांबला. मात्र, काही कालावधीतच दगडाच्या समस्येवर मात करत पाणी प्रवाही झाले. पाण्याचा पाट अडचणीवर मात करू शकतो, तर तू एक माणूस आहेस. अडचणींना का घाबरायचे?

शिवपुण्यदिन: शिवरायांची 'ही' अष्टसुत्री प्रेरणादायी

शिवतेजः छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक

मुलाला गोष्ट समजली. दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा शाळेत जाऊ लागला. वर्गातील विद्यार्थी त्याचे मित्र झाले. खूप अभ्यास करून मुलगा मोठा झाला. त्या मुलाचे नाव अहमद सुकर्णो. पुढे जाऊन सुकर्णो निसर्गसंपन्नता लाभलेल्या इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, समस्यांवर मात करून पुढे जाणे श्रेयस्कर ठरते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज