हाफीज किडवाई
आमचा धर्म संकटात आहे, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आपण कधी विचार केला आहे की, धर्मावर संकट केव्हा येते आणि तो संकटातून कधी बाहेर येतो. अशी कोणती शकत्ती आहे की, जी नागा साधूंच्या धर्मावर संकट येऊ देत नाही. सुफींच्या धर्मावर संकटांची सावली पडू देत नाही. कधी कुंभ पाहा तेव्हा जाणवेल की, हजारो वर्ष सुरू असलेला हा कुंभ नागा साधूंशिवाय झालाच नाही. त्यांच्याजवळ कधाही तक्रार करायला जागाच उरली नाही. त्यांना कधी कोणत्या प्रकारची भीती वाटली नाही, कारण धर्म त्यांच्यात सामावलेला आहे. धर्म ज्यांच्यात सामावलेला आहे तो कधीही घाबरणार नाही किंवा कमकुवत होणार नाही.
धर्म जर आपल्या हृदयात आहे तर संसारातली अशी कोणती शक्ती आहे की, जी आपल्या हृदयातून त्याला विलग कर शकेल ही बाब आपल्याला लक्षात घ्यायला हवी. असं कोणती गोष्ट आहे ती आपलं हृदय जिंकू शकेल. हे लक्षात असू द्या की, धर्म कधाच संकटात नव्हता. धर्माच्या नावाखाली सत्तेत आलेल्या शक्तींचाच धर्म कमकुवत असू शकतो, आपला नाही, कारण आपल्या हृदयातून प्रेम कोणी कसं काय वेगळं करू शकतो, कोणी समर्पण कसं काढू शकतो. त्याग आपल्यापासून कोण हिरावून घेऊ शकतो? कोणी आपल्या हृदयात असलेले अधात्म कसे काय संपवू शकतो?
ज्या हृदयात द्वेष आहे त्या ठिकाणी धर्माचे वास्तव्य कसे असेल? ज्या हृदयात भीती असेल त्या ठिकाणी धर्माची दमछाक होईल, तो ज्या हृदयात भीती आहे त्या ठिकाणी कसा राहणार? प्रकाश अंधाराला घाबरतो? अंधार प्रकाशाला घाबरतो. धर्म ज्यात वसलेला आहे, त्याला ना कोणापासून धोका आहे, ना कोणापासून भीती आहे. भीती आहे ती अर्धमाला.
जो संकटात आहे, तो धर्म नाही तर अधर्म आहे. जसा रावणाला सीतेमुळे धोका होता. काहीही हत्यार नसलेल्या बुद्धासमोर अंगुलीमाल दरोडेखोराला धोका होता. कर्बालामध्ये हुसैन याच्यापसून यजीद याला धोका होता. मूसा याच्यासमोर फिरऔन याला धोका होता. कृष्णापासून कंस मामाला धोका होता. ईसा याच्यामुळे संपूर्ण राज्य धोक्यात होते.
विषाचा प्याला सुकरात याच्या हातात होता, पण सत्ता धोक्यात होती. हे प्रत्येकवेळी घडत आलं आहे. जो धर्मात आहे, त्याला कोणापासूनही धोका नाही, धोका तर अर्धमाला आहे त्याच्यामुळेच सर्वनाश झाला आहे. धर्म आणि अर्धम यांच्यात एक पुसट रेषा आहे ज्याला ही माहिती नाही ते केव्हाही अर्धमाच्या मैदानात उभे ठाकतील. धर्माची पूजा पद्धती, कर्मकांड किंवा दुसऱ्या गोष्टींमुळे याचा थांगपत्ता लागत नाही किंवा ही गोष्ट वाढत नाही. धर्म हा चरित्रावर अवलंबून असतो. त्याच्या वाढण्यामुळे तो वाढतो आणि घटल्याने घटतो. केव्हा कोणी सांगतं की, एकत्र या, धर्म संकटात आहे तर ताबडतोब तेथेच थांबा.
म्हणणाऱ्याचे चारित्र्य पाहा आणि आपल्यात असलेल्या धर्माकडे पाहा. जोपर्यंत तुमच्यातला धर्म जिवंत आहे तोपर्यंत त्याला कोणताही धोका नाही. जोपर्यंत आपण धर्माचे मर्म जाणतो आहोत तोपर्यंत तो कधीही संकटात येणार नाही. जसे तुम्ही एखाद्याच्या सांगण्यावरून आपल्या हृदयाच्या अंतरंगात डोकावल्याशिवाय हाथ उचलून पाऊल उचलत नाही तेव्हा धर्म संकटात येतो. हे देखील सत्य आहे असं माना तेव्हाच आपल्या हृदयातला धर्म संकटात येतो, सर्वांचा नाही. आपल्या हृदयात धर्म आणा. दुसऱ्याच्या हृदयात आणण्याचा प्रयत्न कराल तर चूक करून बसाल.
आमचा धर्म संकटात आहे, हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आपण कधी विचार केला आहे की, धर्मावर संकट केव्हा येते आणि तो संकटातून कधी बाहेर येतो. अशी कोणती शकत्ती आहे की, जी नागा साधूंच्या धर्मावर संकट येऊ देत नाही. सुफींच्या धर्मावर संकटांची सावली पडू देत नाही. कधी कुंभ पाहा तेव्हा जाणवेल की, हजारो वर्ष सुरू असलेला हा कुंभ नागा साधूंशिवाय झालाच नाही. त्यांच्याजवळ कधाही तक्रार करायला जागाच उरली नाही. त्यांना कधी कोणत्या प्रकारची भीती वाटली नाही, कारण धर्म त्यांच्यात सामावलेला आहे. धर्म ज्यांच्यात सामावलेला आहे तो कधीही घाबरणार नाही किंवा कमकुवत होणार नाही.
धर्म जर आपल्या हृदयात आहे तर संसारातली अशी कोणती शक्ती आहे की, जी आपल्या हृदयातून त्याला विलग कर शकेल ही बाब आपल्याला लक्षात घ्यायला हवी. असं कोणती गोष्ट आहे ती आपलं हृदय जिंकू शकेल. हे लक्षात असू द्या की, धर्म कधाच संकटात नव्हता. धर्माच्या नावाखाली सत्तेत आलेल्या शक्तींचाच धर्म कमकुवत असू शकतो, आपला नाही, कारण आपल्या हृदयातून प्रेम कोणी कसं काय वेगळं करू शकतो, कोणी समर्पण कसं काढू शकतो. त्याग आपल्यापासून कोण हिरावून घेऊ शकतो? कोणी आपल्या हृदयात असलेले अधात्म कसे काय संपवू शकतो?
ज्या हृदयात द्वेष आहे त्या ठिकाणी धर्माचे वास्तव्य कसे असेल? ज्या हृदयात भीती असेल त्या ठिकाणी धर्माची दमछाक होईल, तो ज्या हृदयात भीती आहे त्या ठिकाणी कसा राहणार? प्रकाश अंधाराला घाबरतो? अंधार प्रकाशाला घाबरतो. धर्म ज्यात वसलेला आहे, त्याला ना कोणापासून धोका आहे, ना कोणापासून भीती आहे. भीती आहे ती अर्धमाला.
जो संकटात आहे, तो धर्म नाही तर अधर्म आहे. जसा रावणाला सीतेमुळे धोका होता. काहीही हत्यार नसलेल्या बुद्धासमोर अंगुलीमाल दरोडेखोराला धोका होता. कर्बालामध्ये हुसैन याच्यापसून यजीद याला धोका होता. मूसा याच्यासमोर फिरऔन याला धोका होता. कृष्णापासून कंस मामाला धोका होता. ईसा याच्यामुळे संपूर्ण राज्य धोक्यात होते.
विषाचा प्याला सुकरात याच्या हातात होता, पण सत्ता धोक्यात होती. हे प्रत्येकवेळी घडत आलं आहे. जो धर्मात आहे, त्याला कोणापासूनही धोका नाही, धोका तर अर्धमाला आहे त्याच्यामुळेच सर्वनाश झाला आहे. धर्म आणि अर्धम यांच्यात एक पुसट रेषा आहे ज्याला ही माहिती नाही ते केव्हाही अर्धमाच्या मैदानात उभे ठाकतील. धर्माची पूजा पद्धती, कर्मकांड किंवा दुसऱ्या गोष्टींमुळे याचा थांगपत्ता लागत नाही किंवा ही गोष्ट वाढत नाही. धर्म हा चरित्रावर अवलंबून असतो. त्याच्या वाढण्यामुळे तो वाढतो आणि घटल्याने घटतो. केव्हा कोणी सांगतं की, एकत्र या, धर्म संकटात आहे तर ताबडतोब तेथेच थांबा.
म्हणणाऱ्याचे चारित्र्य पाहा आणि आपल्यात असलेल्या धर्माकडे पाहा. जोपर्यंत तुमच्यातला धर्म जिवंत आहे तोपर्यंत त्याला कोणताही धोका नाही. जोपर्यंत आपण धर्माचे मर्म जाणतो आहोत तोपर्यंत तो कधीही संकटात येणार नाही. जसे तुम्ही एखाद्याच्या सांगण्यावरून आपल्या हृदयाच्या अंतरंगात डोकावल्याशिवाय हाथ उचलून पाऊल उचलत नाही तेव्हा धर्म संकटात येतो. हे देखील सत्य आहे असं माना तेव्हाच आपल्या हृदयातला धर्म संकटात येतो, सर्वांचा नाही. आपल्या हृदयात धर्म आणा. दुसऱ्याच्या हृदयात आणण्याचा प्रयत्न कराल तर चूक करून बसाल.