ललित गर्ग
माणूस सदैव सुखाच्या शोधात असतो. मात्र, तो सुखाने जगत नाही. याचे कारण माणसाचे तन आणि मन शांत नसते. चिंता, भीती, आशंका, उदासी या प्रकारचे नकारात्मक भाव माणसाचे अस्तित्व तसेच अस्मिता या दोन्हींचे नुकसान करतात. माणसाचे हित, नशीब हे दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून नसते. मन आणि शरीर यांच्यात योग्य संतुलन असणे आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. शारीरिक गोष्टींनी मन प्रभावित होते आणि मानसिक गोष्टींमुळे शरीर. निरोगी शरीरामुळे मन प्रसन्न राहतं. तसेच निरोगी मनामुळे शरीर उत्तम राहण्यास मदत होते.
प्रत्यक्ष आजार होण्यापेक्षा त्याच्या चिंतेमुळे माणूस अधिक क्षीण होतो. शरीराला आजार झाला, तरी विचार निरोगी राहायला हवेत. शारीरिक आजारावर भौतिक उपचार करताना, मनावर त्याचे परिणाम होऊ नयेत, म्हणून आध्यात्मिक उपचार करायला हवेत. आपणास उदास, दुर्बल, निराश आणि संशयी, संकोची वाटत असेल, तर लगेचच स्वत्वाचा शोध घ्या. वर्तमानात आपली स्थिती काय आणि कशी, यावर विचार करा. आत्मसाक्षात्कार हा चिखलात उमललेल्या कमळाप्रमाणे असतो, असं मॅसे इमाटो यांनी म्हटलंय.
जो माणूस आपल्या प्रकृती आणि प्रवृत्तीत स्थिर असतो, तोच निरोगी राहू शकतो. आपले मन, इंद्रिय प्रसन्न असेल, तर आपण निरोगी राहू शकता. निरोगी जीवनासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. चांगले जीवन जगण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान स्वतःवर विश्वास ठेवल्याने साध्य केले जाऊ शकते. माणसामध्ये अनंत शक्ती भरलेली आहे आणि ऊर्जा आहे. शक्ती आणि ऊर्जेने संपन्न माणूस कितीही कठीण प्रसंग आला, तर त्यावर सहजतेने मात करू शकतो. मात्र, यासाठी सकारात्मकता अंगी बाणवणे, गरजेचे आहे.
माणूस सदैव सुखाच्या शोधात असतो. मात्र, तो सुखाने जगत नाही. याचे कारण माणसाचे तन आणि मन शांत नसते. चिंता, भीती, आशंका, उदासी या प्रकारचे नकारात्मक भाव माणसाचे अस्तित्व तसेच अस्मिता या दोन्हींचे नुकसान करतात. माणसाचे हित, नशीब हे दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून नसते. मन आणि शरीर यांच्यात योग्य संतुलन असणे आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. शारीरिक गोष्टींनी मन प्रभावित होते आणि मानसिक गोष्टींमुळे शरीर. निरोगी शरीरामुळे मन प्रसन्न राहतं. तसेच निरोगी मनामुळे शरीर उत्तम राहण्यास मदत होते.
प्रत्यक्ष आजार होण्यापेक्षा त्याच्या चिंतेमुळे माणूस अधिक क्षीण होतो. शरीराला आजार झाला, तरी विचार निरोगी राहायला हवेत. शारीरिक आजारावर भौतिक उपचार करताना, मनावर त्याचे परिणाम होऊ नयेत, म्हणून आध्यात्मिक उपचार करायला हवेत. आपणास उदास, दुर्बल, निराश आणि संशयी, संकोची वाटत असेल, तर लगेचच स्वत्वाचा शोध घ्या. वर्तमानात आपली स्थिती काय आणि कशी, यावर विचार करा. आत्मसाक्षात्कार हा चिखलात उमललेल्या कमळाप्रमाणे असतो, असं मॅसे इमाटो यांनी म्हटलंय.
जो माणूस आपल्या प्रकृती आणि प्रवृत्तीत स्थिर असतो, तोच निरोगी राहू शकतो. आपले मन, इंद्रिय प्रसन्न असेल, तर आपण निरोगी राहू शकता. निरोगी जीवनासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. चांगले जीवन जगण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान स्वतःवर विश्वास ठेवल्याने साध्य केले जाऊ शकते. माणसामध्ये अनंत शक्ती भरलेली आहे आणि ऊर्जा आहे. शक्ती आणि ऊर्जेने संपन्न माणूस कितीही कठीण प्रसंग आला, तर त्यावर सहजतेने मात करू शकतो. मात्र, यासाठी सकारात्मकता अंगी बाणवणे, गरजेचे आहे.