अ‍ॅपशहर

त्यागातून सुरू होतो भक्तीचा मार्ग

ज्याचा जन्म झाला त्याचा अंत हा निश्चित आहे. इथं श्रीराम आणि श्रीकृष्ण आले ... पण ते देखील हे जग सोडून गेले. आपण तर सामान्य मनुष्य आहोत. आपल्याला मिळालेला हा जन्म मागच्या जन्मातील कर्माचं फळ आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळं जितकं सत्कर्म करता येईल तितकं करावं. एखाद्या संधीचा दुरुपयोग करू नका. संधी चुकीच्या पद्धतीनं हाताळाल तर त्याचा परिणाम दिर्घ काळ तुमच्या आयुष्यावर राहातो.आपल्या संतानी, ऋषिंनी आपल्या आवघड काळतही धर्म आणि मुल्य यांची जपवनूक करायला हवी असं सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 8:51 am
ज्याचा जन्म झाला त्याचा अंत हा निश्चित आहे. इथं श्रीराम आणि श्रीकृष्ण आले ... पण ते देखील हे जग सोडून गेले. आपण तर सामान्य मनुष्य आहोत. आपल्याला मिळालेला हा जन्म मागच्या जन्मातील कर्माचं फळ आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळं जितकं सत्कर्म करता येईल तितकं करावं. एखाद्या संधीचा दुरुपयोग करू नका. संधी चुकीच्या पद्धतीनं हाताळाल तर त्याचा परिणाम दिर्घ काळ तुमच्या आयुष्यावर राहातो.आपल्या संतानी, ऋषिंनी आपल्या आवघड काळतही धर्म आणि मुल्य यांची जपवनूक करायला हवी असं सांगितलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sacrifice of lord rama gave the world the path of devotion
त्यागातून सुरू होतो भक्तीचा मार्ग



अधिक राग आणि मोह हे आपल्या आयुष्याला बाधक आहेत. त्यामुळं त्याग हा एकमेव मार्ग आहे परमात्मा आणि परमसत्यच्या जवळ जाण्याचा असं म्हटलं जातं. महान व्यक्ती त्यांच्या त्यागामुळेच महान होतात. ज्या लोकांनी त्याग केला त्या सर्वांनीच आयुष्यात एक विशेष मारदंड स्थापित केले आहेत. खरं सुख आणि शांती त्याग केल्याशिवाय मिळत नाही. गीतामध्येदी शांती प्राप्तीसाठी त्याग हा एकमेव पर्याय सांगितला आहे.

मनुष्य आपलं सगळं आयुष्य भौतिकसुखासाठी व्यतीथ करतो. आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या आपण प्राप्त केल्यानंतर काही काळ विचार करणं गरजेचं आहे. आता आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे? असा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. स्वत:ला समाजात एका विशिष्ठ उंचीवर न्यायचे असल्यास त्यागाशिवाय पर्याय नाही.

मनुष्यानं सर्व मोह आणि इच्छांचा त्याग करायला हवा आहे, त्यागाची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे, श्रीरामानं देखील अयोध्या राज्याचा क्षणार्धात त्याग केला होत. सर्व सोडून ते वनात केले. त्यामुळं ते श्रेष्ठ ठरले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज