अ‍ॅपशहर

Swami Samarth Preaching in Marathi स्वामी समर्थांचा उपदेश : सद्गुण म्हणजे तरी काय? वाचा, परमार्थ बोल

काम, क्रोध, मोह, माया, मत्सर आणि लोभ असे षड्रिपु मानले जातात. तसेच सहा सद्गुणही मानले जातात आणि ते भगवंतांच्या ठायी असतात, अशी मान्यता आहे. प्रपंचातून परमार्थ साधावा, असे अनेक संत, महंतांनी सांगितले आहे. जाणून घेऊया...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 8:08 am
श्री स्वामी समर्थ महाराजांचे संपूर्ण जीवन सिद्धपुरुषाचे असल्याने त्यांचे चरित्र म्हणजे अनुभव कथा आहेत, असे म्हटले जाते. सिद्धपुरुष 'प्रेरणा' देतात आणि 'कार्य' करून घेऊन 'सिद्धीस' नेतात. स्वामींच्या अनेक चरित्रकारांनी ही 'अनुभव-गाथा' अत्यंत रसाळपणाने, प्रेमाने आणि अपार श्रद्धेतून गुंफली आहे. वटवृक्षांच्या पारंब्या जशा विस्तारतात आणि त्या पुन्हा जमिनीत रुजून नवा वृक्ष त्यातून साकारतो. तशा या अनुभव-कथा आहेत. स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय, असे सांगितले जाते. अधिक महिना नामस्मरण, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेल्या विशेष पूजा-अर्चा, उपासना, आराधना, नामस्मरण, जप यांचे पुण्य दसपटीने मिळते, असे म्हणतात. मात्र, प्रपंचातून परमार्थ साधावा, असे अनेक संत, महंतांनी सांगितले आहे. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर आणि लोभ असे षड्रिपु मानले जातात. तसेच सहा सद्गुणही मानले जातात आणि ते भगवंतांच्या ठायी असतात, अशी मान्यता आहे. यावर स्वामी समर्थ महाराज भाष्य करताना दिसतात. नेमके काय सांगतात स्वामी महाराज? जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shree swami samarth maharaj


'श्री स्वामी समर्थ'चा नेमका अर्थ काय? म्हणा, प्रभावी तारक मंत्र

आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत:हून कोणतीही ज्ञानपिपासा, जिज्ञासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. भगवंताचे सहा सद्गुण असतात. ऐश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे ते सहा सद्गुण होत. यांनाच 'भग' म्हणतात. हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. हे सहा सद्गुण म्हणजे नेमके काय, असा प्रश्न पडतो.

वाचा : मदोन्मत्त हत्ती आणि ब्रह्मांडनाक स्वामी समर्थांची लीला

सुख, समाधान, शांती आणि आनंद म्हणजे ऐश्वर्य; नीती, न्याय आणि कृपा हा झाला धर्म; सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी म्हणजेच यश; निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव; निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव म्हणजे ज्ञान आणि हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य, असे स्वामी म्हणतात.

श्रीकृष्णार्जुन संवाद : सर्व धर्म त्यागून शरण या; मीच कर्ता, करविता आहे

या सहा गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो. पूर्व जन्मातील कर्मे हे 'संचीत' असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे 'प्रारब्ध'. प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख, समाधान, तर पापरूप दुशकृत्याने दुःख अनुभवास येते. देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत. कितीही म्हटले तरी प्रारब्ध टाळून टाळता येत नाही. ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे. प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव व गुरु करून देतात, असेही स्वामी म्हणतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज