अ‍ॅपशहर

...म्हणून महिला जास्त प्रेमळ असतात

अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, पण आध्यात्मिक जगात अशी स्थिती नाही. मानव इतिहासात अनेक संत पुरुष होऊन गेले, महिलांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2019, 4:44 pm
अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, पण आध्यात्मिक जगात अशी स्थिती नाही. मानव इतिहासात अनेक संत पुरुष होऊन गेले, महिलांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. महिला संतांविष्यी सांगायचं झालं तर महर्षी अत्री यांची पत्नी अनुसया, मोहंमद साहेबांच्या परंपरेत राबिया, रविदास साहेबांची शिष्या मीरा, चरणदास यांच्या शिष्या सहजो आणि दया, काश्मिरी संत ललना, गुजरातच्या संत गंगाबाई आणि त्यांच्या शिष्या पानबाई अशी बोटावर मोजता येतील एवढी थोडीच नावे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thats why women are more loving than men
...म्हणून महिला जास्त प्रेमळ असतात


ऊर्जा चक्राची जी प्राकृतिक अवस्था आहे, त्यातही स्त्री-पुरुष यांची महत्त्वाची भूमिका आहे. ऊर्जेचे सात चक्र मानले आहेत. प्रकृतिकदृष्ट्या पहिला, तिसरा, पाचवे आणि सातवे चक्र पुरुषांचे मजबूत असते. दुसरे, चौथे आणि सहावे चक्र महिलांचे मजबूत असते. पहिले चक्र शरीराचे आहे. यासाठी स्त्रीच्या तुलनेत पुरुष नेहमीच बलिशाली ठरतात. दुसरे चक्र त्वचेचे, सौंदर्याचे, इंद्रियाचे असून स्त्रियांसाठी हे मजबूत चक्र आहे. यामुळेच महिला दिसायला पुरुषांपेक्षा अधिक सुंदर असतात. तिसरे चक्र आरोग्याचे आहे. पुरुष महिलांच्या तुलनेत धडधाकट असतात पण महिलांना सतत व्याधीग्रस्त असतात.

चौथे चक्र प्रेमाचे आहे. हे चक्र महिलांसाठी मजबूत असते. यामुळेच महिला अधिक प्रेमळ आणि मृदू स्वभावाच्या असतात. त्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण कमी आढळते. या चक्रामुळेच महिला पुरुषाच्या प्रेमात पडतात. पाचवे चक्र सन्मानाचे, मित्रत्वाचे आहे. पुरुष या चक्राच्या सक्रियतेमुळे महिलांच्या तुलनेत अधिक चांगले मित्र असतात. दुसरीकडे महिला पाचव्या चक्राच्या कमकुवतपणामुळे पुरुषांचा सन्मान करत नाहीत. सहावे चक्र संकल्पाचे आहे. महिलांचा संकल्प दृढ असतो. सण-उत्सव परंपरेनुसार, कष्ट सहन करत करणे पुरुषांच्या गणतीतही नसतात, पण महिलांना या गोष्टी सहज शक्य होतात.

सहाव्या चक्रामुळे महिला अधिक चांगल्या भक्त सिद्ध होतात. सातवे चक्र बोधाचे आहे. महिलांमध्ये हे चक्र निष्क्रिय असल्यासारखे असते म्हणून त्यांच्या तुलनेत साधनेत पुरुषांची अधिक तीव्रतेने प्रगती होते. या चक्रामुळेच पुरुष उत्तम ज्ञानी असतात. भगवान महावीरांनीही सांगतले आहे की, संबुद्ध होण्यासाठी एकदा पुरुष होणं आवश्यक आहे.

धार्मिक परंपरेत महिला संतांच्या प्रति सहज स्वीकार भाव असलेला दिसत नाही. इस्लाममध्ये मुलगी अधिक शिकली तरी तिला अर्धेच ज्ञान आहे असे मानले जाते. जैन परंपरेत महिलेला मोक्ष मोक्ष मिळविण्याचा अधिकार नाही. ज्या परिस्थितीत महिला आपले जीवन जगत आहे, त्यात बोटावर मोजण्याइतक्या महिलाही चमत्कारापेक्षा कमी नाहीत. याबाबत मीरेचे उदाहरण देता येईल. चित्तौडची ती राणी होती. महाल सोडून तिने रविदासाचे शिष्यत्व पत्करले, जे छोट्या जातीतले होते. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या काळात हे खूपच धाडसाचे काम होते. याचा परिणाम असा झाला की, तिला विष प्राशन करावे लागले.

कालांतराने भारतीय समाजाने याचा स्वीकार केला की, मीरेने जे केलं ती खूपच धाडसाची गोष्ट होती. म्हणूनच अनेक आई-वडिलांनी आपल्या मुलींची नावे मीरा ठेवली आहेत. पुरुषांना नेहमीच मान-सन्मान मिळतो. संत पदाला पोहोचल्यावर लोक त्यांच्या पायाशी लोळण घेतात. पण जेव्हा कधी महिलेने आध्यात्मिक मार्ग निवडला, तेव्हा तिला तिरस्कार, अपमान, बहिष्कार यांचे धनी व्हावे लागले आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीत ज्या थोड्या महिलांनी आध्यात्माचा मार्ग स्वीकारला, त्यांचे साहस अद्वितीय आहे.

- ओशो सिद्धार्थ औलिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज