अ‍ॅपशहर

एका उत्तराची शक्यता

एका स्नेह्यांच्या घरी गेलो होतो. घर प्रशस्त होते आणि ठिकठिकाणी फेंगशुईच्या वस्तू. चौकशी केली तेव्हा त्यांच्या आप्तांपैकी एक जाणकार होते असे कळले. इतकेच नव्हे तर त्यांचे वडील सिद्धपुरुष होते आणि एखादी व्यक्ती त्यांच्याकडे आली की त्यांना एखाद्या चित्रपटासारखा भूतकाळ स्पष्ट दिसे असे समजले. ते ऐकल्यावर जगन्नाथ कुंटे यांच्या ‘हर हर नर्मदे’ या पुस्तकात वर्णिलेले प्रसंग डोळ्यांसमोर आले.

Maharashtra Times 7 Aug 2017, 12:51 am
एका स्नेह्यांच्या घरी गेलो होतो. घर प्रशस्त होते आणि ठिकठिकाणी फेंगशुईच्या वस्तू. चौकशी केली तेव्हा त्यांच्या आप्तांपैकी एक जाणकार होते असे कळले. इतकेच नव्हे तर त्यांचे वडील सिद्धपुरुष होते आणि एखादी व्यक्ती त्यांच्याकडे आली की त्यांना एखाद्या चित्रपटासारखा भूतकाळ स्पष्ट दिसे असे समजले. ते ऐकल्यावर जगन्नाथ कुंटे यांच्या ‘हर हर नर्मदे’ या पुस्तकात वर्णिलेले प्रसंग डोळ्यांसमोर आले. अनंत गिरी नावाचे सिद्धपुरुष पुण्यात राहतात. त्यांना एकदा मी भेटायला गेलो असता ते मला म्हणाले, ‘मी तुम्हांला देवीचे दर्शन घडवीत; पण कोणत्या जन्मात ते सांगता येणार नाही.’ खरेतर या क्षेत्रात मला अनुभव नाही. एकदा कुंटे यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. ‘चित्ताची एकाग्रता कशी साधायची, ध्यान कसे लावायचे.’ स्वस्थ बसले तरी मनात विकारतरंग येतात. असे एकाने विचारले होते; तेव्हा ‘विकार येणारच पण सातत्य ठेवा; हळुहळू एकाग्रता साधेल.’ असे त्यांनी उत्तर दिले. डॉ. व. दि. कुलकर्णी नगरच्या क्षीरसागर महाराजांकडे गेले होते; तेव्हाचा प्रसंग त्यांनी सांगितला होता : ‘पूजाअर्चा मला जमत नाही. लेखनवाचनात जीव रमतो.’ वदि म्हणाले. त्यावर, ‘तुम्ही पूजाअर्चेत वेळ घालवू नका, तो तुमचा धर्म नाही. लेखनवाचन हीच तुमची ईश्वरपूजा असे समजा.’ असा उपदेश महाराजांनी केला. अळवणी नावाचे स्नेही आहेत. त्यांनी त्यांच्या मित्राचा सांगितलेला अनुभव : त्यांनी आयुष्यभर अष्टांग योगसाधना केलेली. इंद्रियांवर त्यांनी जय मिळवलेला. मृत्यूबद्दलची भीती पार गेलेली. योगसामर्थ्याने त्यांनी मोक्षतिथी मिळवलेली. ठराविक दिवशी ठराविक वेळेला न विसरता त्यांनी अळवणींना भेटायला बोलावले. अळवणींना उशीर झाला. तिथे हजर असलेले त्या गृहस्थांचे आप्त म्हणाले, ‘तुमची वाट पाहात होते. निश्चित वेळेला त्यांनी देह त्यागला.’ आता हे सारे आपल्या सर्वांच्या आकलनाच्या पलीकडले. योगसाधना, वाचासिद्धी, प्रायोपवेशन वगैरे काही शास्त्रे वा अभ्यासशाखा असू शकतील आणि तसे गूढ अनुभव काहींना येतात याबद्दल आपण अविश्वास दाखवण्याचे काही कारण नाही. पण आपला तो मार्ग नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waiting for answer
एका उत्तराची शक्यता


ज्ञानेश्वरांच्या आरतीमध्ये ‘विश्व ब्रह्मचि केले’ असा एक चरण आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी एका अभंगात ‘सबाह्य अभ्यंतरि अवघा व्यापक मुरारी’ असे म्हटले आहे.

ईश्वराविषयी ‘एकोऽहं बहुस्याम्’ असे म्हटले गेले आहे. शांताराम आठवले यांनी त्याचा भावाशय साध्या शब्दांत विशद केला आहे :

आधी बीज एकले।

बीज अंकुरले, रोप वाढले।

आधी बीज एकले।

एका बीजापोटी तरु कोटी।

कोटी जन्म घेती सुमन फळे।

आधी बीज एकले।

व्यापुनी जगता तूही अनंता।

बहुविध रूपे घेसी, घेसी।

परी अंती ब्रह्म एकले।।

गणेशोत्सवात घरोघरी म्हटल्या जाणाऱ्या ‘गणपति अथर्वशीर्षा’तही नेमका हाच अर्थ सामावलेला आहे. यातल्या काही ओळी मुद्दाम मनन करण्यासारख्या आहेत…

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि

त्वं प्रत्यक्षं ज्ञानमयो​ विज्ञानमयोसि

त्वं गुणत्रयातीतः

त्वं देहत्रयातीतः

त्वं कालत्रयातीतः

त्वं मूलाधारोस्थितोसि नित्यम्

त्वं शक्तित्रयात्मकः

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम्…..

शांताराम आठवले यांनी कवितेमधून जे वर्णन केले, तेच अथर्वशीर्षाच्या या विविध पंक्तींमधूनही साकारते…

ग‌णपति अथर्वशीर्षाचे यथार्थ आकलन शालेय जीवनातच करून दिले गेले तर पुढच्या आयुष्यात निर्माण होणारी ईश्वरविषयक बरीचशी कोडी सुटू शकतील, असा विश्वास वाटतो.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज