अ‍ॅपशहर

दुजेविण संवादु

मतभेदांच्या वेळी संघर्षाच्या ऐवजी संवादांनी समस्या सोपी होते. दुःखाच्या वेळी आप्तांशी केलेल्या संवादामुळे दुःखाचं ओझं थोडं हलकं होतं, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामु‍ळे, इतरांशी आपला संवाद किंवा कम्युनिकेशन सुधारण्यासाठी निरनिराळे वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स असं खूप काम आता कार्पोरेट क्षेत्रात होताना दिसतं. पण स्वतःशीच संवाद वाढवण्याच्या संदर्भात तेवढी जागृती आजच्या जगात अजून आलेली दिसत नाही.

Maharashtra Times 19 Jan 2017, 9:53 am
मतभेदांच्या वेळी संघर्षाच्या ऐवजी संवादांनी समस्या सोपी होते. दुःखाच्या वेळी आप्तांशी केलेल्या संवादामुळे दुःखाचं ओझं थोडं हलकं होतं, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामु‍ळे, इतरांशी आपला संवाद किंवा कम्युनिकेशन सुधारण्यासाठी निरनिराळे वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स असं खूप काम आता कार्पोरेट क्षेत्रात होताना दिसतं. पण स्वतःशीच संवाद वाढवण्याच्या संदर्भात तेवढी जागृती आजच्या जगात अजून आलेली दिसत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम communication is major tool to solve problems
दुजेविण संवादु


इतरांशी संवादांनी जशी समस्या हलकी होते, मार्ग निघतो वा दुःखाचा भार हलका होतो तसाच तो आपल्या स्वतःशीच केलेल्या संवादामुळेही होऊ शकतो का, हा इथे कळीचा मुद्दा आहे. आणि तो तसा होऊ शकतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे. अशा काळात बाहेर मन रमवण्यापेक्षा स्वतःच्या 'आत' जाऊन आपल्या अस्वस्थ शक्तींचा आसरा, आधार, मार्गदर्शन घेणे हा जास्ती प्रभावी उपाय व उपचार असतो.

असा स्वतःशी संवाद साधायला नियमितपणे प्रत्येक दिवसाला काहीतरी निवांत वेळ बाजूला काढणं अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना, स्वतःशी संवाद साधायची ती पहिली आणि मूलभूत पायरी आहे. स्वतःशीच बोलायला, स्वतःला समजून घ्यायला नुसत्या अशा निवांत वेळेचीच नव्हे तर एकान्ताची पण नितान्त आवश्यकता असते. आपण इतर कुणासोबत असतो तेव्हा आपलं स्वतःशी बोलणं होऊच शकत नसतं.

स्वतःशी असा एकाग्र संवाद आपण लिखाणाच्या माध्यमातूनच सगळ्यात चांगला साधू शकतो, असं मला वाटतं. स्वतःशीच संवादाने स्वतःचंच दुःख हलकं होऊ शकतं का, याची तुम्हाला प्रचीती घ्यायची असेल तर यापुढे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही छोट्यामोठ्या दुःखाच्या प्रसंगात आपल्या मनात त्या दुःखांनी उमळून येणाऱ्या भावना कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करून पाहा. हे लिहून झाल्याक्षणीच तुम्हाला थोडं हलकं वाटल्याचा अनुभव येईल. असंच काही गोंधळाची 'कन्फ्युज्ड' मनस्थिती किंवा कुठल्या निर्णयाबाबत द्विधा मनस्थिती झाली असेल तर मनाच्या अशा अस्वस्थतेच्या क्षणी त्या संदर्भात आपल्या मनात त्यावेळी येत असलेले निरनिराळे विचार कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करून पहा. या लिहिण्याच्या काळातच आपल्या मनात हळुहळू येत गेलेल्या स्पष्टतेचा व शंकानिरसनाचा विलक्षण अनुभव तुम्हाला यात येईल. अशा प्रयत्नांत येणारी ही हलकाई वा स्पष्टतेचं कारण हे दुहेरी असतं. एकतर लिखाणातून आपल्या स्वतःशीच झालेल्या संवादांनी आलेली ती हलकाई असते व दुसरं म्हणजे लिखाणाच्या निमित्ताने त्यावेळी झालेल्या एकाग्रतेने पण या हलकेपणाचा व स्पष्टतेचा ‘रिलिफ’ आपल्यात आलेला असतो. मनाच्या कुठल्याही प्रॉब्लेम, डिप्रेशन किंवा निगेटिव्हिटी अशा रोगांवर एकाग्रता हा एकमेव अक्सीर इलाज आहे असा माझा स्वतःचा अनेकवेळचा अनुभव आहे.

लिखाणांनी होऊ शकत असलेल्या अशा एकाग्र संवादामु‍ळेच नियमितपणे रोजनिशी लिहिणं, हे नियमित आत्मसंवादाचं एक प्रभावी साधन आहे. डायरी न लिहिणाऱ्यांनी निदान स्वतःच्या वाढदिवसाला गेलेल्या वर्षातल्या सुख-दुःखाचा व अचिव्हमेन्ट्सचा आढावा घेणे, नवीन वर्षासाठी टार्गेट्स लिहिणे अशा स्वरुपाच्या डायरीलेखनाला सुरुवात करून पाहावी. हेच प्रमाण पुढे वाढवून मग दर महिन्याच्या एक तारखेला किंवा आपल्या मासिक वाढदिवशी हा आढावा घेणे, दर आठवड्याच्या रविवारी हा आढावा लिहिणे, असं करत करत दर दिवशी निदान दहा-पंधरा मिनिटे तरी असं स्वतःशी बोलायला राखीव ठेवण्यापर्यंत येणं. मग त्यांना हळुहळू सहज शक्य होत जाईल असं वाटतं.. शुभेच्छा…
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज