अ‍ॅपशहर

मनी नाही भाव

धर्माची उत्पत्ती आदिम काळात भयातून झाली. निसर्गात घडणाऱ्या अनाकलनीय घटनांचा माणूस तेव्हा अन्वयार्थ लावू शकत नव्हता. प्रगती झाली, तसा मानवाला निसर्ग आणि मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळू लागला. तेव्हा भयाची जागा भक्ती आणि श्रद्धेनं घेतली.

Maharashtra Times 24 Aug 2017, 4:00 am
समाजाची धारणा करतो तो धर्म. समाजकल्याण तसेच व्यक्ती हितासाठी धर्माचं पालन आवश्यक आहे. धर्माचं पालन म्हणजे सामाजिक आणि नैतिक मूल्यानुसार वर्तन करणं. धर्म म्हणजे अलौकिक, अतिमानवी शक्तीवरची श्रद्धा, भक्ती, भय आणि विश्वास होय. सृष्टीत आणि मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांवर ही शक्ती नियंत्रण करते अशी श्रद्धा. त्यामुळं त्या अलौकिक शक्तीबद्दल माणसाच्या मनात भक्ती, भीती अशा काही घटना घडत असतात. त्याचा अन्वयार्थ लावणं, हे मानवी क्षमतेच्या पलीकडे असतं. उदाहरणार्थ मानवी जीवनात एखादी चांगली किंवा वाईट घटना का घडली, याचं उत्तर सद‍सद‍्विवेकबुद्धीने देणं शक्य होत नाही. तेव्हा ते उत्तर निसर्गात असलेल्या अलौकिक शक्तीवरील श्रद्धेतून मिळतं, अशी भावना असते. बुद्धिनिष्ठ विचारानं सत्याचा शोध घेणं म्हणजे विज्ञान. धर्मही सत्याचा शोध घेतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
मनी नाही भाव


धर्माची उत्पत्ती आदिम काळात भयातून झाली. निसर्गात घडणाऱ्या अनाकलनीय घटनांचा माणूस तेव्हा अन्वयार्थ लावू शकत नव्हता. प्रगती झाली, तसा मानवाला निसर्ग आणि मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळू लागला. तेव्हा भयाची जागा भक्ती आणि श्रद्धेनं घेतली. विज्ञानात सातत्यानं होणारा बदल हा पूर्वीच्या शोधाला कालबाह्य ठरवतो. कालबाह्य ठरलेला विचार मानवाला टाकवत नाही. मानवाची मानसिकता पटकन बदलत नाही. शेवटी मन हे एक गूढ आहे. विज्ञानाला अजूनही मनाचा ठाव घेता आला नाही. परंतु श्रद्धा आणि विश्वास मनाचा ठाव घेऊ शकतात.

माणूस हा इतका स्वार्थी आहे की, तो आपल्या सोयीने दोन्ही स्वीकारतो आणि नाकारतोही. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. देवापुढे मनोभावे नतमस्तक होणारा माणूस हा भ्रष्टाचारी असू शकतो. भ्रष्टाचाराचे पाप धुण्यासाठी तो देवाला विनवतो. तर हाच माणूस देवाचं सर्वत्र अस्तित्व मान्य करतो. अंतर्यामी असलेल्या देवाला या स्वार्थी माणसाच्या करतुती कशा कळत नाहीत? देव जागृत होऊन माणसावर का कोपत नाही? तसंच माणसाला स्वतःला धर्मभ्रष्ट कृतीचं भय का वाटत नाही, हे एक कोडंच आहे. खरंतर प्रत्येक धर्मात व्यक्ती आणि समाजहितासाठी वर्तनाचे नियम आहेत. खोटं बोलू नये, चोरी करू नये. प्रत्येकानं प्रेम, करुणा, दया, त्याग भावना बाळगावी. परंतु आपण असं वागतो का? आज जगभर हिंसा, युद्ध, अत्याचार, दंगोधोपे, बलात्कार, धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टी घडतात. धर्म पाळणारे आपणंच, धर्म मोडीत काढणारे आपणच.

अलीकडे देळातल्या रांगांमध्ये तरुणांची संख्या वाढते आहे, ही चिंतेची बाब वाटते. तरुण म्हणजे आत्मविश्वास, तारुण्य म्हणजे Head, Hand and Heartचं सुंदर समन्वय. तारुण्य म्हणजे श्रम करण्याची वृत्ती. परंतु आज हा घटक बहुतांशी अत्याचार, गुन्हे, बलात्कार, फसवणूक अशा वाईट प्रवृत्तीत गुंतला आहे. त्याला अपवादही आहे.

तरुणाचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास का नाही? देवळात जाऊन देव शोधायचा, तो तर आपल्या अंतःकरणात आहे, ही आपल्या संताची शिकवण. ‘देव देवळात नाही, देव नाही देव्हाऱ्यात,’ तो आपल्या मनात आहे. पण मनी नाही भाव, देवा मला पाव, असं असल्यास देव कसा पावेल?

जर्मनीत प्रोटेस्टंट ख्रिश्चानिटी या पंथाच्या श‌‌िकवणीतून नवी भांडवलशाही उदयास आली. कारण या पंथाच्या नवीन अनुयायांचा श्रमावर विश्वास होता. जर्मनीची अभूतपूर्व भौतिक प्रगती झाली. माणसं सर्वार्थांन सुखी, समृद्ध झाली. अखंड देव देव करणारे देवाच्या पूजेचं पावित्र्य जपण्यासाठी स्नान करून शुचिभूर्त होतात. स्नान केल्यांन शरीराची स्वच्छता होईल, पण मनाच्या स्वच्छतेचं काय? महात्मा गांधींनी तर ईश्वर हा सत्य आहे, इथपासून सत्य हेच ईश्वर इथवर प्रवास केला. या मूल्यानुसार ते जगले. सत्याच्या मार्गानेच मानवता जपली. सत्य या मूल्यानुसार जे वर्तन तो खरा धर्म!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज