मूल्यांचा ऱ्हास होतो आहे, प्रामाणिकपणा संपतो आहे, समाजासाठी झटणारे कमी होत आहेत, अप्पलपोटे वाढताहेत, अशी तक्रार हल्ली ऐकू येते. ती अगदीच चुकीची नाही; परंतु उत्तुंग असे कार्य करणारे नाहीतच, असे म्हणता येणार नाही. ही मंडळी शांतपणे आपले कार्य करीत असतात. एरवी सर्वसामान्यांत वावरणारी ही माणसे असे काही काम करतात, की ती असामान्यही ठरून जातात. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊनत्यांनी केलेले काम आपल्याला थक्क करणारे असतात. खऱ्या अर्थाने ती मूल्ये जगत असतात. इतिहासातील संत-महात्म्यांचे दाखले अनेकदा दिले जातात. कोणतीही अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे, समाजहित साधणारी कामे करणारी आणि समाजाला दिशादर्शन करणारी ही मंडळी म्हणजे आजच्या काळातील संतच. सगुण वा निर्गुण रूपातील उपासना तर अनेक जण करतात. अशांच्या कामाबद्दल आदर बाळगणे, त्यांचे काम जाणून घेऊन ते पुढच्या पिढ्यांपर्यंत नेणे ही देखील उपासनाच होय.
आजच्या काळातील आदर्श असलेल्यांत सर्वच ख्यातनाम असतात, असेही नाही. काहींची नावे सर्वदूर गेलेली असतातही, परंतु अजिबात प्रसिद्ध नसलेलेही असतात. मी शिक्षिका होते, त्या जिजामाता प्रशालेच्या मुख्याध्यापिका विद्या मिश्र या त्यांपैकीच एक. आमच्यासाठी त्या ऋषितुल्य. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’हे ब्रीद असलेल्या आणि प्रामुख्याने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या या शाळेचे आव्हान त्यांनी स्वीकारले. विद्यार्थिनी आणि शिक्षक या दोघांच्याही त्या दीदी बनल्या. विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही त्यांनी घडविले. या दोन्ही घटकांसह शाळेच्या विकासासाठी त्यांनी सर्वस्व झोकून दिले. शाळेतील शिपाई असो, की स्वच्छता कर्मचारी... या सर्वांचा आत्मसन्मान त्यांनी जपला. उच्च नैतिक मूल्यांचा अंगिकार ही त्यांची मूलभूत प्रवृत्ती. त्यांच्या नावात विद्या होती आणि त्या स्वतःही विद्यासंपन्न होत्या. अध्यापनाच्या जोडीने त्यांनी नैतिक मूल्यांवर भर दिला.
स्वच्छता आणि नेटकेपणा यांबाबत त्या कमालीच्या दक्ष असत. विद्यार्थिनींनी कळत-नकळत जिन्यात, गॅलरीत कचरा केला किंवा कागदाचे कपटे टाकले, की त्या न रागवता त्या स्वतः कचरा गोळा करीत. स्वतःच्या खोलीची टापटीप स्वतः करीत. शिक्षकांच्या खोलीत आल्यानंतर तिथे अस्ताव्यस्त खुर्च्या नीट करीत. मधल्या सुटीत चहा घेतल्यानंतर आपली कपबशी स्वतः उचलून ठेवत. स्वच्छतागृहांकडे त्यांचे विशेष लक्ष असे. त्या स्वतः ही कामे करीत असल्याने सर्वांवर एक प्रकारे नैतिक जबाबदारी येत असे आणि त्यामुळे प्रत्येकजण स्वच्छतेबाबत दक्ष असे. त्यांनी असे स्वतःच्या कृतीतून स्वावलंबनाचे धडे दिले.
दीदी म्हणजे मूर्तिमंत करुणा! एखादी विद्यार्थिनी पडली, कोणाला चक्कर आली तर त्या स्वतः आधी धावत. त्या विद्यार्थिनीवर प्रथोमपचार करीत. तिला शिक्षकांच्या खोलीत आणत. चहा देत. गरीब विद्यार्थिनींची आर्थिक अडचण ओळखून त्या उपक्रम राबवित. वर्षाच्या शेवटी विद्यार्थिनींना लहान होणारे आणि सुस्थितीत असणारे गणवेश त्या आवाहन करून मिळवत आणि मग या गणवेशांचे वाटप गरजूंना करीत. शाळा आणि विद्यार्थिनी या दोहोंवर त्यांची घारीसारखी नजर असे. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थिनी बाहेर पडल्या की नाहीत, याची खात्री करून घेण्यासाठी त्या शाळाभर फिरत आणि मगच शिपायांना वर्गाची दारे बंद करायला सांगत. प्रत्येक विद्यार्थिनींना त्या आपल्या वाटत. अनेकदा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांबद्दल भीती वाटते; परंतु दीदींबद्दल विद्यार्थिनींना आपलेपणा वाटे. स्वतः अविवाहित राहून, कुटुंबाचा गोवर्धन पर्वत खांद्यावर घेऊन आपल्या भावंडांचे संसारही त्यांनी फुलविले. कसलाही स्वार्थ न जपता त्या जगल्या आणि सतत दुसऱ्यांच्या उपयोगी पडत राहिल्या. असतील तिथे त्या कस्तुरीचा सुगंध फैलावत राहिल्या. एका अर्थाने त्या निष्काम कर्मयोगी होत्या.
कवी कुसुमाग्रजांची आज जयंती. ‘अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन् आशा..’ अशा शब्दांत त्यांनी ध्येयवाद्यांचे वर्णन केले आहे. दीदींना ते चपखल लागू होणारे आहे.
आजच्या काळातील आदर्श असलेल्यांत सर्वच ख्यातनाम असतात, असेही नाही. काहींची नावे सर्वदूर गेलेली असतातही, परंतु अजिबात प्रसिद्ध नसलेलेही असतात. मी शिक्षिका होते, त्या जिजामाता प्रशालेच्या मुख्याध्यापिका विद्या मिश्र या त्यांपैकीच एक. आमच्यासाठी त्या ऋषितुल्य. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’हे ब्रीद असलेल्या आणि प्रामुख्याने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या या शाळेचे आव्हान त्यांनी स्वीकारले. विद्यार्थिनी आणि शिक्षक या दोघांच्याही त्या दीदी बनल्या. विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही त्यांनी घडविले. या दोन्ही घटकांसह शाळेच्या विकासासाठी त्यांनी सर्वस्व झोकून दिले. शाळेतील शिपाई असो, की स्वच्छता कर्मचारी... या सर्वांचा आत्मसन्मान त्यांनी जपला. उच्च नैतिक मूल्यांचा अंगिकार ही त्यांची मूलभूत प्रवृत्ती. त्यांच्या नावात विद्या होती आणि त्या स्वतःही विद्यासंपन्न होत्या. अध्यापनाच्या जोडीने त्यांनी नैतिक मूल्यांवर भर दिला.
स्वच्छता आणि नेटकेपणा यांबाबत त्या कमालीच्या दक्ष असत. विद्यार्थिनींनी कळत-नकळत जिन्यात, गॅलरीत कचरा केला किंवा कागदाचे कपटे टाकले, की त्या न रागवता त्या स्वतः कचरा गोळा करीत. स्वतःच्या खोलीची टापटीप स्वतः करीत. शिक्षकांच्या खोलीत आल्यानंतर तिथे अस्ताव्यस्त खुर्च्या नीट करीत. मधल्या सुटीत चहा घेतल्यानंतर आपली कपबशी स्वतः उचलून ठेवत. स्वच्छतागृहांकडे त्यांचे विशेष लक्ष असे. त्या स्वतः ही कामे करीत असल्याने सर्वांवर एक प्रकारे नैतिक जबाबदारी येत असे आणि त्यामुळे प्रत्येकजण स्वच्छतेबाबत दक्ष असे. त्यांनी असे स्वतःच्या कृतीतून स्वावलंबनाचे धडे दिले.
दीदी म्हणजे मूर्तिमंत करुणा! एखादी विद्यार्थिनी पडली, कोणाला चक्कर आली तर त्या स्वतः आधी धावत. त्या विद्यार्थिनीवर प्रथोमपचार करीत. तिला शिक्षकांच्या खोलीत आणत. चहा देत. गरीब विद्यार्थिनींची आर्थिक अडचण ओळखून त्या उपक्रम राबवित. वर्षाच्या शेवटी विद्यार्थिनींना लहान होणारे आणि सुस्थितीत असणारे गणवेश त्या आवाहन करून मिळवत आणि मग या गणवेशांचे वाटप गरजूंना करीत. शाळा आणि विद्यार्थिनी या दोहोंवर त्यांची घारीसारखी नजर असे. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थिनी बाहेर पडल्या की नाहीत, याची खात्री करून घेण्यासाठी त्या शाळाभर फिरत आणि मगच शिपायांना वर्गाची दारे बंद करायला सांगत. प्रत्येक विद्यार्थिनींना त्या आपल्या वाटत. अनेकदा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांबद्दल भीती वाटते; परंतु दीदींबद्दल विद्यार्थिनींना आपलेपणा वाटे. स्वतः अविवाहित राहून, कुटुंबाचा गोवर्धन पर्वत खांद्यावर घेऊन आपल्या भावंडांचे संसारही त्यांनी फुलविले. कसलाही स्वार्थ न जपता त्या जगल्या आणि सतत दुसऱ्यांच्या उपयोगी पडत राहिल्या. असतील तिथे त्या कस्तुरीचा सुगंध फैलावत राहिल्या. एका अर्थाने त्या निष्काम कर्मयोगी होत्या.
कवी कुसुमाग्रजांची आज जयंती. ‘अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन् आशा..’ अशा शब्दांत त्यांनी ध्येयवाद्यांचे वर्णन केले आहे. दीदींना ते चपखल लागू होणारे आहे.