पुरूषोत्तम बेर्डे
“माणूस कितीही बांधून ठेवला तरी स्वत:च्या जिभेने तो मोकाट सुटतो.” असे प. पू. सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी म्हटले आहे. त्याची प्रत्यक्ष जीवनात अनेकदा प्रचीती येते. जिभेला अनेक कामे आहेत. चव तपासण्यापासून ते अन्न व्यवस्थित दाताखाली फिरवण्यापर्यंत. पण सर्वांत मोठे म्हणजे ‘उच्चार’. जीभ उच्चार करीत असली तरी तिच्यावर ताबा मेंदूचा. उच्चारातून केवळ शब्द निघत नाहीत तर परिणामकारक असा आशय निर्माण होतो. भावना मिसळतात. आपल्या मनात काय आहे ते शब्दांतून व्यक्त करण्याची ताकद जिभेत असते. स्तुतीपासून टोमण्यांपर्यंत सर्व लीला या जिभेला लीलया जमतात. आणि तितक्याच सहज जहरी टीका आणि आणि मारक हिंसा या एवढ्याशा अवयवाला विनासायास जमते.
‘जीभ’ सोडल्यास आंतरशरीरातील कोणत्याही अवयवावर आपला ताबा नाही. आणि जिभेवर तो ठेवणे सर्वांत कठीण. मग ते ‘खाणे’ असो वा ‘चघळणे’. हे जरी असले तरी जिभेचे सर्वांत मोलाचे काम ‘उच्चार’ हेच आहे. यातून आपण संपूर्ण जगाशी संवाद साधतो. ते कसे असावेत, हे आपला मेंदू किवा आपले विचार ठरवतात. आणि आपल्यावरील संस्कार त्यातून परावर्तित होतात. अत्यंत मजेशीर, मनोरंजक, अमूल्य आणि तितकाच दुर्लक्षित अवयव म्हणजे जीभ. या जिभेचे सामर्थ्य तेव्हाच कळते जेव्हा ती आजारी पडते, चावली जाते, जड असते. सहज सुंदर उच्चारांची सवय असलेल्या जिभेत प्रचंड सामर्थ्य असते. त्यामुळे त्यातून निघणारे उच्चार कसे असावेत, मांडले जाणारे विचार कसे असावेत याचे तारतम्य विचारांच्या संस्कारांवर अवलंबून आहेत. किंबहुना, त्यातल्या विचारांचे गांभीर्य ‘आध्यात्म’ शिकवते. जिभेचा व्यायाम करण्यासाठी मैदानात, बागेत, किवा जिममध्ये जाण्याची गरज नाही. संस्कृत भाषेत अत्यंत सोपे आणि अत्यंत कठीण असे उत्तमोत्तम श्लोक त्याच्या गहन अर्थासह आहेत. अगदी रोजच्या व्यावाहारातला ‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:, गुरु: साक्षात परब्रह्म, तस्मै: श्री गुरुवे नम:’ हा श्लोकही उच्चार आणि विचार सुधारण्यास मदत करतो.
वेदवाणीत हे सामर्थ्य आहे. गुरुदेव म्हणतात, ‘वेद ऐकण्यामध्येच सर्व काही आहे, त्यांचा अर्थ समजला नाही तरी केवळ स्पष्ट आणि स्वच्छ आवाजात उच्चारलेले वेद मन लावून ऐकले तरी चैतन्य निर्माण होते.” वेद उच्चारणातून निर्माण होणाऱ्या कंपनातून प्रचंड शक्ती निर्माण होते. विविध ध्वनिस्फोटाची आणि स्वरांच्या कंपनांची योजना या वेदांत आहे. वातावरणात अशी कंपने निर्माण करण्याची ताकद वेदांत आहे. या वेदांत निराकार शक्तीची साकार प्राणप्रतिष्ठा करण्याची पात्रता आहे.
‘जीभ’ हे अस्त्र आहे. त्याने जी हिंसा होते ती एके-४७ पेक्षा भयानक आहे. मानसिक हिंसा जास्त तीव्र असते. शस्त्राने शरीर संपते. पण वारंवार टोमणे मारले तर तो मानसिक छळ हा शारीर हिंसेपेक्षा भयानक आहे. याची असंख्य उदाहरणे सापडतील. उच्चारातून निघणारी शिवी हीसुद्धा हिंसा आहे, आणि उच्चारातून निघालेले चार प्रेमाचे शब्द अहिंसक आहेत. ‘मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही’ या उच्चारात दोन जीव जवळ येण्याची आशा आहे, तर ‘भाई, इनको ठोक देंगे,’ मध्ये दोन जीव धारातीर्थी पाडणारी ‘हिंसा’ आहे.
अलेक्झांडर, नेपोलियन आणि हिटलर यांनी घणाघाती उच्चारांच्या जोरावर लाखो सैनिकांचे रक्त तापवून जग जिंकण्याचा प्रयत्न केला. प्रचंड हिंसेतून प्रसंगी धाक, दरारा, उभा करून हिंसेच्या भीतीने विजय मिळवला. याउलट झाशीच्या राणीची ‘मेरी झांशी नाही दूंगी,’ सुभाषचंद्र बोस यांच्या ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ हे आवाहन वा सावरकरांचे ‘सागरा प्राण तळमळला’ आणि लोकमान्यांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सारखी आवाहने इंग्रजांना कायम जागी ठेवत राहिली. महात्मा गांधी यांनी या शस्त्राचा वापर ‘न’ करून, त्यातून मांडलेले विचार संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून कसे देतात, हे दाखवून दिले.
जीभ हे एकमेव शस्त्र असे आहे की ज्यावरचा ‘ताबा’ सुटला की ‘हिंसा’ होते.
“माणूस कितीही बांधून ठेवला तरी स्वत:च्या जिभेने तो मोकाट सुटतो.” असे प. पू. सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी म्हटले आहे. त्याची प्रत्यक्ष जीवनात अनेकदा प्रचीती येते. जिभेला अनेक कामे आहेत. चव तपासण्यापासून ते अन्न व्यवस्थित दाताखाली फिरवण्यापर्यंत. पण सर्वांत मोठे म्हणजे ‘उच्चार’. जीभ उच्चार करीत असली तरी तिच्यावर ताबा मेंदूचा. उच्चारातून केवळ शब्द निघत नाहीत तर परिणामकारक असा आशय निर्माण होतो. भावना मिसळतात. आपल्या मनात काय आहे ते शब्दांतून व्यक्त करण्याची ताकद जिभेत असते. स्तुतीपासून टोमण्यांपर्यंत सर्व लीला या जिभेला लीलया जमतात. आणि तितक्याच सहज जहरी टीका आणि आणि मारक हिंसा या एवढ्याशा अवयवाला विनासायास जमते.
‘जीभ’ सोडल्यास आंतरशरीरातील कोणत्याही अवयवावर आपला ताबा नाही. आणि जिभेवर तो ठेवणे सर्वांत कठीण. मग ते ‘खाणे’ असो वा ‘चघळणे’. हे जरी असले तरी जिभेचे सर्वांत मोलाचे काम ‘उच्चार’ हेच आहे. यातून आपण संपूर्ण जगाशी संवाद साधतो. ते कसे असावेत, हे आपला मेंदू किवा आपले विचार ठरवतात. आणि आपल्यावरील संस्कार त्यातून परावर्तित होतात. अत्यंत मजेशीर, मनोरंजक, अमूल्य आणि तितकाच दुर्लक्षित अवयव म्हणजे जीभ. या जिभेचे सामर्थ्य तेव्हाच कळते जेव्हा ती आजारी पडते, चावली जाते, जड असते. सहज सुंदर उच्चारांची सवय असलेल्या जिभेत प्रचंड सामर्थ्य असते. त्यामुळे त्यातून निघणारे उच्चार कसे असावेत, मांडले जाणारे विचार कसे असावेत याचे तारतम्य विचारांच्या संस्कारांवर अवलंबून आहेत. किंबहुना, त्यातल्या विचारांचे गांभीर्य ‘आध्यात्म’ शिकवते. जिभेचा व्यायाम करण्यासाठी मैदानात, बागेत, किवा जिममध्ये जाण्याची गरज नाही. संस्कृत भाषेत अत्यंत सोपे आणि अत्यंत कठीण असे उत्तमोत्तम श्लोक त्याच्या गहन अर्थासह आहेत. अगदी रोजच्या व्यावाहारातला ‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:, गुरु: साक्षात परब्रह्म, तस्मै: श्री गुरुवे नम:’ हा श्लोकही उच्चार आणि विचार सुधारण्यास मदत करतो.
वेदवाणीत हे सामर्थ्य आहे. गुरुदेव म्हणतात, ‘वेद ऐकण्यामध्येच सर्व काही आहे, त्यांचा अर्थ समजला नाही तरी केवळ स्पष्ट आणि स्वच्छ आवाजात उच्चारलेले वेद मन लावून ऐकले तरी चैतन्य निर्माण होते.” वेद उच्चारणातून निर्माण होणाऱ्या कंपनातून प्रचंड शक्ती निर्माण होते. विविध ध्वनिस्फोटाची आणि स्वरांच्या कंपनांची योजना या वेदांत आहे. वातावरणात अशी कंपने निर्माण करण्याची ताकद वेदांत आहे. या वेदांत निराकार शक्तीची साकार प्राणप्रतिष्ठा करण्याची पात्रता आहे.
‘जीभ’ हे अस्त्र आहे. त्याने जी हिंसा होते ती एके-४७ पेक्षा भयानक आहे. मानसिक हिंसा जास्त तीव्र असते. शस्त्राने शरीर संपते. पण वारंवार टोमणे मारले तर तो मानसिक छळ हा शारीर हिंसेपेक्षा भयानक आहे. याची असंख्य उदाहरणे सापडतील. उच्चारातून निघणारी शिवी हीसुद्धा हिंसा आहे, आणि उच्चारातून निघालेले चार प्रेमाचे शब्द अहिंसक आहेत. ‘मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही’ या उच्चारात दोन जीव जवळ येण्याची आशा आहे, तर ‘भाई, इनको ठोक देंगे,’ मध्ये दोन जीव धारातीर्थी पाडणारी ‘हिंसा’ आहे.
अलेक्झांडर, नेपोलियन आणि हिटलर यांनी घणाघाती उच्चारांच्या जोरावर लाखो सैनिकांचे रक्त तापवून जग जिंकण्याचा प्रयत्न केला. प्रचंड हिंसेतून प्रसंगी धाक, दरारा, उभा करून हिंसेच्या भीतीने विजय मिळवला. याउलट झाशीच्या राणीची ‘मेरी झांशी नाही दूंगी,’ सुभाषचंद्र बोस यांच्या ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ हे आवाहन वा सावरकरांचे ‘सागरा प्राण तळमळला’ आणि लोकमान्यांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सारखी आवाहने इंग्रजांना कायम जागी ठेवत राहिली. महात्मा गांधी यांनी या शस्त्राचा वापर ‘न’ करून, त्यातून मांडलेले विचार संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून कसे देतात, हे दाखवून दिले.
जीभ हे एकमेव शस्त्र असे आहे की ज्यावरचा ‘ताबा’ सुटला की ‘हिंसा’ होते.