थोर कवयित्री इंदिरा संत यांची स्मृती जागविण्यासाठी ‘पाऊस’ हे आशयसूत्र देऊन काव्यसंध्या साजरी करण्याचा उपक्रम ओल्या दुष्काळात पार पडत आहे. सुक्या दुष्काळानंतर हा सृजन सोहळा सुखद वाटणारच. आईच्या, पावसाच्या, क्रांतीच्या, शेताच्या कविता हे आता फादर्स डे, मदर्स डे असे साचे बनत आहेत. असो. पावसाच्या कविता बाहेरच्या, मनातल्या, जनातल्या, मूर्त, अमूर्त, मुक्त, बंदिस्त, गूढ, प्रतीकात्मक अशा, तशा हजारो प्रकारच्या. पाऊस दारातला, घरातला, कावळा-चिमणीच्या गोष्टीतला. वादळी वाऱ्याबरोबर गारा व महापूर आणणारा. माणसं जोडणारा, तोडणारा, कथेतला, कादंबरीतला, महाकाव्यातला. वि. स. सुखटणकरांच्या ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’मध्ये महापूर ही कथा आहे. ती पाऊस कोसळताना मला नेहमी आठवते. तिच्याबरोबर, त्र्यं. शं. शेजवलकरांचे या गोमंतकीय कथेवरील मार्मिक भाष्यही पावसाच्या गारव्यात उबेचा प्रवाह सोडते. ती वाचल्यास विशिष्ट सनातनी लोकांच्या अंगाला ‘खाजकोलीत’ लावल्यासारखे होईल असे त्यांनी स्पष्टपणे प्रस्तावनेत म्हटले आहे. ‘वळीव’ ही शंकर पाटलांची कथा वाचणाऱ्यांना या वेगळ्या पर्यावरणाची कल्पना येईल. पाऊस हे साहित्यातील प्रभावी पात्र आहे.
सुखटणकरांच्या ‘महापुरात’ एका गावातील हिंदू व ख्रिश्चन अशी दोन धार्मिक हाडवैर असणारी कुटुंबे अडकलेली आहेत. सुटकेचा मार्ग पुरुष मंडळी दोन्ही घरांत शोधत आहेत; पण ते आयत्यावेळी एकत्र आल्याशिवाय तराफा बांधून बायका-मुलांना मांडवी नदीच्या प्रवाहाबाहेर काढणे शक्य नाही, हे लक्षात येताच वृद्ध बायका आपल्या घरातील पुरुषांची झाडाझडती घेतात. ‘मरणान्ताणि वैराणि’ हा न्याय बरोबर लागू पडतो. हाडवैर बाजूला ठेवून पुरुष एकजुटीने कामाला लागतात आणि दोन्ही कुटुंबे संकटातून वाचतात. अशीच सत्यकथेतील एक ‘गडदा’ नावाची माझी कथा पाऊस आणि शेतकरी कुटुंबाचे व्यामिश्र नाते स्पष्ट करते. साहित्यातील पावसाचे प्रताप आणि गुंतागुंतीचे नाते हाच स्वतंत्र संशोधनाचा विषय. र. वा. दिघे यांची ‘पड रे पाण्या’ असो की हरिभाऊ आपटे यांची ‘काळ तर मोठा कठीण आला’ असो, पावसाची नाना रूपे सतत खुणावत राहतात. ऋग्वेदातील पाऊस देवाच्या सूक्तापासून आपणाला भिजवत, जागवत आला आहे.
विल्यम शेक्सपीअरलाही ‘द टेम्पेस्ट’ (वादळ) हे शीर्षक रोमान्ससाठी निवडण्याचा मोह आवरला नाही. टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’मधील गवतकापणीची ‘इर्जिक’, बोरिस पास्टरनॅकच्या ‘डॉ. झिवॅगो’मधील बर्फाची नाना रूपे आणि विल्यम वर्डस्वर्थच्या काव्यातील हिरवळ ही ‘पाऊसपाण्या’चा स्पर्श सतत जाणवून देते. ‘पर्जन्य उपासना’ या ना त्या रूपात सर्व संस्कृतीत सुरू असते. नाटककार सॅम्युअल बेकेट (१९०६-८९) ‘अ वेट नाईट’मध्ये म्हणतो, ‘एका गणवेशात कुरकूर न करता पाऊस पडला. तो उपसागरावर, तीरावर, पर्वतावर व पठारावर पडला. विशेष करून, मध्य कच्छभूमीवर मात्र त्याने असमान उच्छाद मांडला. जॉन कीट्स या कवीने १० एप्रिल १८१८ साली जे. एच. रेनॉल्डसला लिहिलेल्या पत्रात पावसाचे वर्णन आहे. लॉर्ड ब्राऊनचा (१९२३) बुद्धी चातुर्यपूर्ण विनोद मात्र आपणाला गालातल्या गालात हसायला लावतो. तो म्हणतो, ‘पाऊस, तो न्यायी (माणसावर) वर पडतो आणि अन्यायी (गुंडा) लफंग्यावरसुद्धा कोसळतो; पण प्रामुख्याने धार्मिक न्यायीवर. कारण लफंगा न्यायी सद्गुणीची छत्री चोरतो.’
पहिल्या पावसातला मातीचा सुगंध आणि धूळवाफेच्या पेरण्या करून त्याच्यासाठी वाट पाहणं, वळवात झाडाखाली न थांबणं, पुरात पोहणं हे सारंच अद्भुत. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘पाऊस सातच्या आधीचा, तोच छान दंड अकराच्या आधीचा.’ मराठीत त्याच्याविषयी म्हणतात, ‘हा सकाळचा पाहुणा थांबत नाही, संध्याकाळी आला तर जातच नाही. ‘ये रे ये रे पावसा’... रिमझिम पाऊस पडे सारखा। यमुनेलाही पूर चढे गं बाई। गेला मोहन कुणीकडे?’
डॉ. आनंद पाटील
सुखटणकरांच्या ‘महापुरात’ एका गावातील हिंदू व ख्रिश्चन अशी दोन धार्मिक हाडवैर असणारी कुटुंबे अडकलेली आहेत. सुटकेचा मार्ग पुरुष मंडळी दोन्ही घरांत शोधत आहेत; पण ते आयत्यावेळी एकत्र आल्याशिवाय तराफा बांधून बायका-मुलांना मांडवी नदीच्या प्रवाहाबाहेर काढणे शक्य नाही, हे लक्षात येताच वृद्ध बायका आपल्या घरातील पुरुषांची झाडाझडती घेतात. ‘मरणान्ताणि वैराणि’ हा न्याय बरोबर लागू पडतो. हाडवैर बाजूला ठेवून पुरुष एकजुटीने कामाला लागतात आणि दोन्ही कुटुंबे संकटातून वाचतात. अशीच सत्यकथेतील एक ‘गडदा’ नावाची माझी कथा पाऊस आणि शेतकरी कुटुंबाचे व्यामिश्र नाते स्पष्ट करते. साहित्यातील पावसाचे प्रताप आणि गुंतागुंतीचे नाते हाच स्वतंत्र संशोधनाचा विषय. र. वा. दिघे यांची ‘पड रे पाण्या’ असो की हरिभाऊ आपटे यांची ‘काळ तर मोठा कठीण आला’ असो, पावसाची नाना रूपे सतत खुणावत राहतात. ऋग्वेदातील पाऊस देवाच्या सूक्तापासून आपणाला भिजवत, जागवत आला आहे.
विल्यम शेक्सपीअरलाही ‘द टेम्पेस्ट’ (वादळ) हे शीर्षक रोमान्ससाठी निवडण्याचा मोह आवरला नाही. टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’मधील गवतकापणीची ‘इर्जिक’, बोरिस पास्टरनॅकच्या ‘डॉ. झिवॅगो’मधील बर्फाची नाना रूपे आणि विल्यम वर्डस्वर्थच्या काव्यातील हिरवळ ही ‘पाऊसपाण्या’चा स्पर्श सतत जाणवून देते. ‘पर्जन्य उपासना’ या ना त्या रूपात सर्व संस्कृतीत सुरू असते. नाटककार सॅम्युअल बेकेट (१९०६-८९) ‘अ वेट नाईट’मध्ये म्हणतो, ‘एका गणवेशात कुरकूर न करता पाऊस पडला. तो उपसागरावर, तीरावर, पर्वतावर व पठारावर पडला. विशेष करून, मध्य कच्छभूमीवर मात्र त्याने असमान उच्छाद मांडला. जॉन कीट्स या कवीने १० एप्रिल १८१८ साली जे. एच. रेनॉल्डसला लिहिलेल्या पत्रात पावसाचे वर्णन आहे. लॉर्ड ब्राऊनचा (१९२३) बुद्धी चातुर्यपूर्ण विनोद मात्र आपणाला गालातल्या गालात हसायला लावतो. तो म्हणतो, ‘पाऊस, तो न्यायी (माणसावर) वर पडतो आणि अन्यायी (गुंडा) लफंग्यावरसुद्धा कोसळतो; पण प्रामुख्याने धार्मिक न्यायीवर. कारण लफंगा न्यायी सद्गुणीची छत्री चोरतो.’
पहिल्या पावसातला मातीचा सुगंध आणि धूळवाफेच्या पेरण्या करून त्याच्यासाठी वाट पाहणं, वळवात झाडाखाली न थांबणं, पुरात पोहणं हे सारंच अद्भुत. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘पाऊस सातच्या आधीचा, तोच छान दंड अकराच्या आधीचा.’ मराठीत त्याच्याविषयी म्हणतात, ‘हा सकाळचा पाहुणा थांबत नाही, संध्याकाळी आला तर जातच नाही. ‘ये रे ये रे पावसा’... रिमझिम पाऊस पडे सारखा। यमुनेलाही पूर चढे गं बाई। गेला मोहन कुणीकडे?’
डॉ. आनंद पाटील