दैवी कृपा संपादन करण्याच्या ज्ञानमार्ग, योगमार्ग इत्यादी इतर साऱ्या मार्गांप्रमाणेच एक मार्ग या दृष्टीने समाज भक्तीकडे पाहतो. खरेतर या सर्वांचे अंतिम उद्दिष्ट एकच असते. मात्र नागरिक आपापल्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे त्यातील एखादा मार्ग निवडतात. केवळ सुलभ आहे म्हणून भक्ती करावी असे नाही, तर इतर सर्व मार्गांमध्ये ती श्रेष्ठ असल्याने तिचे आचरण करावे. ज्ञानादेव हि कैवल्यम् असे म्हणणारे आद्य शंकराचार्यही हे ही प्रसंगी, ‘मोक्षसाधनमार्गेषु भक्तिरेव गरीयसी,’ असे म्हणून तिचे मोठेपण मान्य करतात.
भक्ती या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दामध्ये भज् असा मूळ संस्कृत धातू आहे. त्याचा खरा अर्थ वाटून घेणे; आजच्या मराठीत बोलायचे झाले तर शेअर करणे असा आहे. एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती आपली सर्व सुखदुःखे आपल्या आराध्याला सांगते, त्याच्याशी शेअर करते, असा अर्थ करता येतो. दैवी कृपा प्राप्त होण्यासाठी मात्र भक्ताची ही भक्ती निष्काम असणे मात्र जरुरीचे आहे. सकाम भक्ती केल्यास जो काम म्हणजे इच्छा मनात असते, ती कदाचित पूर्ण होईलही; परंतु त्यापलीकडे मग काहीही साधणार नाही. त्याउलट निष्काम म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता भक्ती केल्यास त्याने सर्वाथाने अधिक लाभ होऊ शकतो. कारण अशा भक्ती विशिष्ट उपचारांच्या गुंत्यामध्ये शरीराने न अडकता भक्त मनाने देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो.
बहुतेकदा भक्त यज्ञयाग, पूजा-अर्चा इत्याही विधी सकाम भक्तीने करण्यास प्रवृत्त होतात. अशा विधींचा संकल्प करतानाच त्याद्वारे आम्हाला काय मिळवायचे आहे, हे ते सांगत असतात. कोणाला आरोग्य आणि समाधान हवे असते, कोणाला संपत्ती, कोणाला नोकरी तर कोणाला विवाह व्हावासा वाटत असते. या आणि अशा व्यावहारिक गरजांकरिता धार्मिक पूजाविधींचे अवडंबर माजवून भक्तगण रोजच्या रोज देवाच्या मागे लागत असतात. अशा नवसांनी समजा देव प्रसन्न झालाच, तर तो फारतर जी इच्छा प्रकट केली असते, ती पूर्ण करतो. पुन्हा तो भक्त आणि तो देव यांचा मार्ग निराळा. अशा प्रकारच्या भक्तीने वास्तविक पाहता माणसाच्या हातात फारसे काही लागत नाही.
आपल्या समृद्ध भक्तिपरंपरेतील अनेकानेक संतमंडळी ज्या भक्तीची अपेक्षा करतात, ती भक्ती निष्काम प्रकारची होय. जेव्हा व्यक्ती ईश्वराच्या चिंतनात मग्न होऊन आपले दैनंदिन व्यवहार करीत राहते, त्यावेळी तिला अमुक एक अशा कोणत्याच गोष्टीच्या प्राप्तीची अपेक्षा नसते. त्यामुळे मग खऱ्या अर्थाने असे लोक ईश्वराच्या निकट पोहोचतात. न मागताही त्यांना ईश्वर सर्वकाही प्रदान करतो, असे अनुभवाने संत सांगतात. ‘न साधयति मां योगो न सांख्यं कर्म उद्धव । न स्वाध्यायतपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ।।’ या शब्दांत भगवान श्रीकृष्णाने भक्तीने जे साधते ते योग-सांख्यादी दर्शने आणि स्वाध्याय, तप किंवा त्याग अशा इतर मार्गांनी साधत नाही, असे स्पष्ट केले आहे.
यावरून असे लक्षात येते की भक्तीचे जे महत्त्व आहे ते मुळात भजन-पूजनात नसून भक्ताच्या भावात आहे. कामना मनात ठेवून भक्ती करताना मनुष्य ईश्वराचा वापर फक्त इच्छा पुरी व्हावी याकरिता करतो. म्हणजे, सकाम भक्तीमध्ये ईश्वर साध्य नसून केवळ साधन असतो. त्यामुळे, या प्रकारे ईश्वराची प्राप्ती झाली नाही तर त्यात नवल ते काय? मात्र, जेव्हा मनुष्य निष्काम भक्ती करतो, त्याचे मन त्याच्या आराध्याकडे एकरूप करतो, त्यावेळी ईश्वर हे साध्य बनते. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तीत असते. त्यामुळे, त्याला त्याचे साध्य प्राप्त होते. यामुळेच, बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्त्वाचा. देव फक्त भावाचा भुकेला आहे असे तुकोबा म्हणतात - ‘देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला । पहा महिमा आवडीची फळे खाय भिल्लिणीची ।। पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची । न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडें तुका म्हणे भक्तिपुढे ।।’
भक्ती या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दामध्ये भज् असा मूळ संस्कृत धातू आहे. त्याचा खरा अर्थ वाटून घेणे; आजच्या मराठीत बोलायचे झाले तर शेअर करणे असा आहे. एखादी व्यक्ती भक्ती करते म्हणजे ती आपली सर्व सुखदुःखे आपल्या आराध्याला सांगते, त्याच्याशी शेअर करते, असा अर्थ करता येतो. दैवी कृपा प्राप्त होण्यासाठी मात्र भक्ताची ही भक्ती निष्काम असणे मात्र जरुरीचे आहे. सकाम भक्ती केल्यास जो काम म्हणजे इच्छा मनात असते, ती कदाचित पूर्ण होईलही; परंतु त्यापलीकडे मग काहीही साधणार नाही. त्याउलट निष्काम म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता भक्ती केल्यास त्याने सर्वाथाने अधिक लाभ होऊ शकतो. कारण अशा भक्ती विशिष्ट उपचारांच्या गुंत्यामध्ये शरीराने न अडकता भक्त मनाने देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो.
बहुतेकदा भक्त यज्ञयाग, पूजा-अर्चा इत्याही विधी सकाम भक्तीने करण्यास प्रवृत्त होतात. अशा विधींचा संकल्प करतानाच त्याद्वारे आम्हाला काय मिळवायचे आहे, हे ते सांगत असतात. कोणाला आरोग्य आणि समाधान हवे असते, कोणाला संपत्ती, कोणाला नोकरी तर कोणाला विवाह व्हावासा वाटत असते. या आणि अशा व्यावहारिक गरजांकरिता धार्मिक पूजाविधींचे अवडंबर माजवून भक्तगण रोजच्या रोज देवाच्या मागे लागत असतात. अशा नवसांनी समजा देव प्रसन्न झालाच, तर तो फारतर जी इच्छा प्रकट केली असते, ती पूर्ण करतो. पुन्हा तो भक्त आणि तो देव यांचा मार्ग निराळा. अशा प्रकारच्या भक्तीने वास्तविक पाहता माणसाच्या हातात फारसे काही लागत नाही.
आपल्या समृद्ध भक्तिपरंपरेतील अनेकानेक संतमंडळी ज्या भक्तीची अपेक्षा करतात, ती भक्ती निष्काम प्रकारची होय. जेव्हा व्यक्ती ईश्वराच्या चिंतनात मग्न होऊन आपले दैनंदिन व्यवहार करीत राहते, त्यावेळी तिला अमुक एक अशा कोणत्याच गोष्टीच्या प्राप्तीची अपेक्षा नसते. त्यामुळे मग खऱ्या अर्थाने असे लोक ईश्वराच्या निकट पोहोचतात. न मागताही त्यांना ईश्वर सर्वकाही प्रदान करतो, असे अनुभवाने संत सांगतात. ‘न साधयति मां योगो न सांख्यं कर्म उद्धव । न स्वाध्यायतपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ।।’ या शब्दांत भगवान श्रीकृष्णाने भक्तीने जे साधते ते योग-सांख्यादी दर्शने आणि स्वाध्याय, तप किंवा त्याग अशा इतर मार्गांनी साधत नाही, असे स्पष्ट केले आहे.
यावरून असे लक्षात येते की भक्तीचे जे महत्त्व आहे ते मुळात भजन-पूजनात नसून भक्ताच्या भावात आहे. कामना मनात ठेवून भक्ती करताना मनुष्य ईश्वराचा वापर फक्त इच्छा पुरी व्हावी याकरिता करतो. म्हणजे, सकाम भक्तीमध्ये ईश्वर साध्य नसून केवळ साधन असतो. त्यामुळे, या प्रकारे ईश्वराची प्राप्ती झाली नाही तर त्यात नवल ते काय? मात्र, जेव्हा मनुष्य निष्काम भक्ती करतो, त्याचे मन त्याच्या आराध्याकडे एकरूप करतो, त्यावेळी ईश्वर हे साध्य बनते. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तीत असते. त्यामुळे, त्याला त्याचे साध्य प्राप्त होते. यामुळेच, बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्त्वाचा. देव फक्त भावाचा भुकेला आहे असे तुकोबा म्हणतात - ‘देव भावाचा भुकेला दास सेवकाचा झाला । पहा महिमा आवडीची फळे खाय भिल्लिणीची ।। पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची । न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडें तुका म्हणे भक्तिपुढे ।।’