>> डॉ. अंबरीष खरे
आपल्या मनावर पालक आणि गुरुजन विद्येचे महत्त्व ठसवत असतात. विद्येमुळेच मनुष्याला जगात श्रेष्ठत्व मिळत असल्याने त्याने हरेक प्रयत्न करून विद्या मिळवली पाहिजे, असे सांगितले जाते. किंबहुना, ऐहिक इच्छांची पूर्ती ज्या धनाच्या साहाय्याने होत असते, ते धनही विद्येमुळे माणसाला प्राप्त होते. त्यामुळे, मनुष्याच्या सर्वांगीण उत्कर्षाकरिता त्याने कोणती ना कोणती विद्या मिळवणे अत्यावश्यक मानले जाते.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर विद्येचा आपल्याला नेहमी परिचित असणारा अर्थ अपेक्षित नसावा असे दिसते. हा दृष्टिकोन अगदी उपनिषदांपासून चालत आलेला आहे. ‘ईशावास्योपनिषदा’तविद्या आणि आविद्या या दोहोंचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते’ या प्रसिद्ध उक्तीतून हे उपनिषद असे सांगते की, ज्याला विद्या आणि अविद्या या दोहोंचे ज्ञान आहे, तो अविद्येच्या साहाय्याने मृत्यूस पार करून विद्येद्वारे अमृतत्व प्राप्त करून घेतो. या ठिकाणी विद्या म्हणजे काय, आणि अविद्या म्हणजे काय, याचा खुलासा करणे गरजेचे आहे. शंकराचार्यांसारख्या भाष्यकारांनी यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगितलेले दिसते. विद्या म्हणजे आत्मज्ञान आणि अविद्या म्हणजे व्यवहारज्ञान होय.
अविद्या म्हणजे ते ज्ञान, जे उपजीविकेकरिता आवश्यक असते. एखादा माणूस विद्यालयात अथवा गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतो आणि त्याच्या जोरावर पुढे नोकरी किंवा काही उद्योग सुरू करतो. काही लोक तर एखाद्या कलेला आत्मसात करण्यात आपले आयुष्य वेचतात. एक कलाकार म्हणून जरी एका बाजूने ते कलेची सेवा करतात असे म्हणता येत असले, तरी ती कला त्यांना त्यांचा चरितार्थ चालविण्यास मदत करत असते, हे पण खरेच. व्यवासायाभिमुख प्रशिक्षण अगर नोकरीसाठी आवश्यक अर्हता मिळवून देणारे शिक्षण काय किंवा चरितार्थ चालविण्यास मदत करणारी कला काय, या सर्वच गोष्टी अविद्या ठरतात; कारण मनुष्य त्यांच्यामुळे ऐहिक जीवन सुखाने जगू शकतो.
मात्र, अशा प्रकारच्या शिक्षणामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होत नाही. त्याकरिता त्याला गुरू भेटणे, आणि त्याच्याकडून अध्यात्मविद्येचे धडे मिळणे गरजेचे असते. अनेकदा आत्मज्ञानाच्या मागे लागणारे लोक लौकिक गोष्टींना फारसे महत्त्व देत नाहीत. याउलट आध्यात्मिक जगतास भासमान आणि मिथ्या मानणारे लोक लौकिक जगात उपयुक्त ठरणाऱ्या शिक्षणासच प्राधान्य देताना दिसतात. हे दोन्ही टोकाचे विचारप्रवाह टाळून ईशोपनिषदात सांगितलेला विद्या आणि अविद्येचा मिलाफ साधणारा दृष्टिकोन लक्षणीय आहे.
जी व्यक्ती केवळ अविद्येच्या मागे लागेल, ती अविद्येच्या साहाय्याने जगणे सुसह्य बनवेल आणि मृत्यूपर्यंतचे इहलोकीचे आयुष्य यश,लीपणे पार पाडेल; परंतु त्यापलीकडे तिची गती कुंठित होईल. तसेच जर कोणी केवळ आत्मविद्येच्या मागे लागून आयुष्य खर्ची पाडले, तर त्याला ऐहिकायुष्यात कदाचित अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागू शकतो, मात्र त्याची मोक्षप्राप्तीसारखी उच्च आकांक्षा निश्चित पूर्ण होऊ शकेल. म्हणजेच,विद्या किंवा अविद्या यांपैकी कोणा एकीचाच संग धरल्यास कधी ना कधी अडचण येऊ शकते. मात्र, जो विद्या आणि अविद्या या दोन्ही मिळविण्याचा प्रयत्न करेल, त्याचे ऐहिक आयुष्य अविद्येने सुखकर बनेल आणि विद्या त्याचे पारमार्थिक आयुष्य समृद्ध करेल.
उपनिषदे साधारणपणे केवळ मोक्षमार्गाचा विचार करणारी, ऐहिक सुखांचा त्याग करून विरक्तीचा मार्ग घेण्यास सुचविणारी मानली जातात. उपनिषदांविषयीचा हा समज बऱ्याच अंशी खरा असला, तरी या ठिकाणी मात्र उपनिषदाने विद्येइतकेच अविद्येलाही महत्त्व दिले आहे, असे म्हणता येते. एकीकडे लक्ष देण्याच्या नादात दुसरीकडे दुर्लक्ष होऊ देणे योग्य नाही हाच संदेश यातून आपल्याला मिळतो. यामुळेच संसार नेटका केल्याशिवाय विरक्तीचा मार्ग धरणे योग्य नसल्याचा उपदेश तुकोबांसारखे संतही करतात.
आपल्या मनावर पालक आणि गुरुजन विद्येचे महत्त्व ठसवत असतात. विद्येमुळेच मनुष्याला जगात श्रेष्ठत्व मिळत असल्याने त्याने हरेक प्रयत्न करून विद्या मिळवली पाहिजे, असे सांगितले जाते. किंबहुना, ऐहिक इच्छांची पूर्ती ज्या धनाच्या साहाय्याने होत असते, ते धनही विद्येमुळे माणसाला प्राप्त होते. त्यामुळे, मनुष्याच्या सर्वांगीण उत्कर्षाकरिता त्याने कोणती ना कोणती विद्या मिळवणे अत्यावश्यक मानले जाते.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर विद्येचा आपल्याला नेहमी परिचित असणारा अर्थ अपेक्षित नसावा असे दिसते. हा दृष्टिकोन अगदी उपनिषदांपासून चालत आलेला आहे. ‘ईशावास्योपनिषदा’तविद्या आणि आविद्या या दोहोंचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते’ या प्रसिद्ध उक्तीतून हे उपनिषद असे सांगते की, ज्याला विद्या आणि अविद्या या दोहोंचे ज्ञान आहे, तो अविद्येच्या साहाय्याने मृत्यूस पार करून विद्येद्वारे अमृतत्व प्राप्त करून घेतो. या ठिकाणी विद्या म्हणजे काय, आणि अविद्या म्हणजे काय, याचा खुलासा करणे गरजेचे आहे. शंकराचार्यांसारख्या भाष्यकारांनी यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगितलेले दिसते. विद्या म्हणजे आत्मज्ञान आणि अविद्या म्हणजे व्यवहारज्ञान होय.
अविद्या म्हणजे ते ज्ञान, जे उपजीविकेकरिता आवश्यक असते. एखादा माणूस विद्यालयात अथवा गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतो आणि त्याच्या जोरावर पुढे नोकरी किंवा काही उद्योग सुरू करतो. काही लोक तर एखाद्या कलेला आत्मसात करण्यात आपले आयुष्य वेचतात. एक कलाकार म्हणून जरी एका बाजूने ते कलेची सेवा करतात असे म्हणता येत असले, तरी ती कला त्यांना त्यांचा चरितार्थ चालविण्यास मदत करत असते, हे पण खरेच. व्यवासायाभिमुख प्रशिक्षण अगर नोकरीसाठी आवश्यक अर्हता मिळवून देणारे शिक्षण काय किंवा चरितार्थ चालविण्यास मदत करणारी कला काय, या सर्वच गोष्टी अविद्या ठरतात; कारण मनुष्य त्यांच्यामुळे ऐहिक जीवन सुखाने जगू शकतो.
मात्र, अशा प्रकारच्या शिक्षणामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होत नाही. त्याकरिता त्याला गुरू भेटणे, आणि त्याच्याकडून अध्यात्मविद्येचे धडे मिळणे गरजेचे असते. अनेकदा आत्मज्ञानाच्या मागे लागणारे लोक लौकिक गोष्टींना फारसे महत्त्व देत नाहीत. याउलट आध्यात्मिक जगतास भासमान आणि मिथ्या मानणारे लोक लौकिक जगात उपयुक्त ठरणाऱ्या शिक्षणासच प्राधान्य देताना दिसतात. हे दोन्ही टोकाचे विचारप्रवाह टाळून ईशोपनिषदात सांगितलेला विद्या आणि अविद्येचा मिलाफ साधणारा दृष्टिकोन लक्षणीय आहे.
जी व्यक्ती केवळ अविद्येच्या मागे लागेल, ती अविद्येच्या साहाय्याने जगणे सुसह्य बनवेल आणि मृत्यूपर्यंतचे इहलोकीचे आयुष्य यश,लीपणे पार पाडेल; परंतु त्यापलीकडे तिची गती कुंठित होईल. तसेच जर कोणी केवळ आत्मविद्येच्या मागे लागून आयुष्य खर्ची पाडले, तर त्याला ऐहिकायुष्यात कदाचित अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागू शकतो, मात्र त्याची मोक्षप्राप्तीसारखी उच्च आकांक्षा निश्चित पूर्ण होऊ शकेल. म्हणजेच,विद्या किंवा अविद्या यांपैकी कोणा एकीचाच संग धरल्यास कधी ना कधी अडचण येऊ शकते. मात्र, जो विद्या आणि अविद्या या दोन्ही मिळविण्याचा प्रयत्न करेल, त्याचे ऐहिक आयुष्य अविद्येने सुखकर बनेल आणि विद्या त्याचे पारमार्थिक आयुष्य समृद्ध करेल.
उपनिषदे साधारणपणे केवळ मोक्षमार्गाचा विचार करणारी, ऐहिक सुखांचा त्याग करून विरक्तीचा मार्ग घेण्यास सुचविणारी मानली जातात. उपनिषदांविषयीचा हा समज बऱ्याच अंशी खरा असला, तरी या ठिकाणी मात्र उपनिषदाने विद्येइतकेच अविद्येलाही महत्त्व दिले आहे, असे म्हणता येते. एकीकडे लक्ष देण्याच्या नादात दुसरीकडे दुर्लक्ष होऊ देणे योग्य नाही हाच संदेश यातून आपल्याला मिळतो. यामुळेच संसार नेटका केल्याशिवाय विरक्तीचा मार्ग धरणे योग्य नसल्याचा उपदेश तुकोबांसारखे संतही करतात.