डॉ. न. म. जोशी
मानवाचं जीवन यशस्वी व्हावं, सार्थकी लागावं यासाठी चार प्रेम, पैसा, प्रसिद्धी आणि पद हे ‘प’कार आवश्यक असतात. यांपैकी प्रेम अगदी अत्यावश्यक ऊर्जा असते. जन्माला येतानाच मातृप्रेमाच्या पान्ह्यात बाळ जोजवून जगात प्रवेश करतं. पुढे किती प्रकारचं प्रेम त्याला मिळतं. मित्र प्रेम,गुरूप्रेम, बंधूप्रेम, भगिनी प्रेम, प्रेयसी वा पत्नी प्रेम, अशा प्रेमाची ऊर्जाच त्याला पुढे पुढे नेत असते. पैसा हा तर आता मानवी जीवनाच्या धारणेचा नुसता महत्त्वाचाच नव्हे, तर जणू काही एकमेव घटक होऊन बसला आहे. पैसा हे साधन आहे. ते आवश्यक आहेच; पण पैशाचा पैस मोठा मोठा होत त्यानं आता प्रेमालाही मागे टाकलं आहे आणि पैशाचं प्रेम आता त्याची जागा घेऊ लागलं आहे.
आता आधुनिक संस्कृती ही अर्थसंस्कृती होऊन तिनं आयुष्यात अनर्थ घडवण्याचीही चिन्हं दिसू लागली आहेत. ‘फिरते पैशाभोवती दुनिया’ असं झालं, तर जीवनातली संवेदनशीलताच नष्ट होईल. दिवसभर कष्ट करावेत; पण चार घास प्रेमानं खावेत आणि चार घास प्रेमानं दुसऱ्यालाही द्यावेत,ही संस्कृती आपल्या समाजानं वर्षानुवर्षं जपली होती. प्रसिद्धी ही माणसाला प्रोत्साहित करते यात शंकाच नाही. मग ती कुटुंबातली असो, गल्लीतली असो, गावातील असो नाही तर दिल्लीतील असो. प्रसिद्धी असेल, तर जीवनाला गोडी प्राप्त होते. मात्र, कीर्ती आणि प्रसिद्धी यांची चटक लागली, तरती माणसाच्या मनाला अटक करते आणि त्याच्यातील संवेदनशीलता डांबून ठेवतं; कारण सारं काही प्रसिद्धीसाठी असं माणूस करू लागतो. आजच्या जीवनात तर फ्लेक्सबाजीनं केलेला कहर काहूर माजवीत आहे. कुणाचे वाढदिवस, कुणाची निवड, कुणाचा गावगन्ना पुरस्कार, कुणाचं अभीष्टचिंतन यांचे मोठमोठे फलक आणि त्यावरील चित्रविचित्र चेहरे यामुळे शहराचं सौंदर्य पार नाहीसं होतं. सक्तीनं आपली छबी इतरांना बघायला लावणारे हे फलकबाज प्रसिद्धीच्या इतके आहारी जातात, की जगात आपल्यापेक्षा विद्वान, कर्तृत्ववान, पराक्रमी, उद्योगी; पण प्रसिद्ध नसलेले खूप लोक आहेत याची त्यांना जाणीव नसते. हे नुसतं राजकारण वा समाजकारणातल्या लोकांबाबतच आहे असं नाही. साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही या मोहातून सुटता आलेलं नाही.
‘पद’ हा तर आता सार्वजनिक जीवनाचा आवश्यक भाग झाला आहे. प्रत्येकाला पद हवं आहे. ‘कशी या त्यजू पदाला’ असं एकदा पद मिळावं, ही सर्वांची भावना असते. आताशा एखाद्या संस्थेत, मंडळात पद रिकामं नसलं, तरी माणसांचा सोयीसाठी पदं निर्माण करावी लागतात. केंद्रीयमंत्रिमंडळापासून, ग्रामपंचायतीपर्यंत हीच गोष्ट आहे. ‘कामासाठी पद’ याऐवजी पदासाठी काम होत असतं आणि कधी कधी कामाविनाही पद भूषवलं जातं.
पदाविना काम झालं तर ते प्रेमानं होतं; पण त्यासाठी कामावर प्रेम असावं लागतं. एका कर्तव्यनिष्ठ; पण गरीब शिक्षकाच्या निरोप समारंभाप्रसंगी एका वक्त्यानं त्या शिक्षकासंबंधी सांगितलं, ‘सरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं. विद्येवर आणि विद्यार्थ्यांवर प्रेम केलं. प्रेम, पैसा, प्रसिद्धी आणि पद यांपैकी सरांजवळ खूप प्रेम आहे. सरांनी पैसा पोटापुरता मिळविला. त्यांना प्रसिद्धीही फार मिळाली नाही. पद तर त्यांना कुणी दिलंच नाही; पण मी सरांना सर्वांत जास्त भाग्यवान आणि श्रीमंत समजतो. ज्यांच्यापाशी गडगंज पैसा आहे, ज्यांना सर्वदूर प्रसिद्धी आणि जे नामवंत पदाधिकारी आहेत असे सर्व मोठमोठे विद्यार्थी सरांच्या प्रेमाच्या अकाउंटमध्ये आहेत.’
लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सरांना लाभलेली ही कृतार्थता प्रेमामुळेच लाभली ना?
कविवर्य गोविंदाग्रजांनी म्हटलंय,
प्रेमे डोले, प्रेमे बोले, प्रेमे जग हाले
प्रेमासाठी जगी आजवर काय नाही झाले!’
म्हणून चार ‘प’कारांपैकी अग्रक्रम पहिल्या ‘प’ काराला प्रेमाला. हा एकच ‘प’कार तुमच्यापाशी असला, तर बाकीचे तीन ‘प’कार मागोमाग येतात आणि नाही आले तरी जीवन तुडुंब होतं.
मानवाचं जीवन यशस्वी व्हावं, सार्थकी लागावं यासाठी चार प्रेम, पैसा, प्रसिद्धी आणि पद हे ‘प’कार आवश्यक असतात. यांपैकी प्रेम अगदी अत्यावश्यक ऊर्जा असते. जन्माला येतानाच मातृप्रेमाच्या पान्ह्यात बाळ जोजवून जगात प्रवेश करतं. पुढे किती प्रकारचं प्रेम त्याला मिळतं. मित्र प्रेम,गुरूप्रेम, बंधूप्रेम, भगिनी प्रेम, प्रेयसी वा पत्नी प्रेम, अशा प्रेमाची ऊर्जाच त्याला पुढे पुढे नेत असते. पैसा हा तर आता मानवी जीवनाच्या धारणेचा नुसता महत्त्वाचाच नव्हे, तर जणू काही एकमेव घटक होऊन बसला आहे. पैसा हे साधन आहे. ते आवश्यक आहेच; पण पैशाचा पैस मोठा मोठा होत त्यानं आता प्रेमालाही मागे टाकलं आहे आणि पैशाचं प्रेम आता त्याची जागा घेऊ लागलं आहे.
आता आधुनिक संस्कृती ही अर्थसंस्कृती होऊन तिनं आयुष्यात अनर्थ घडवण्याचीही चिन्हं दिसू लागली आहेत. ‘फिरते पैशाभोवती दुनिया’ असं झालं, तर जीवनातली संवेदनशीलताच नष्ट होईल. दिवसभर कष्ट करावेत; पण चार घास प्रेमानं खावेत आणि चार घास प्रेमानं दुसऱ्यालाही द्यावेत,ही संस्कृती आपल्या समाजानं वर्षानुवर्षं जपली होती. प्रसिद्धी ही माणसाला प्रोत्साहित करते यात शंकाच नाही. मग ती कुटुंबातली असो, गल्लीतली असो, गावातील असो नाही तर दिल्लीतील असो. प्रसिद्धी असेल, तर जीवनाला गोडी प्राप्त होते. मात्र, कीर्ती आणि प्रसिद्धी यांची चटक लागली, तरती माणसाच्या मनाला अटक करते आणि त्याच्यातील संवेदनशीलता डांबून ठेवतं; कारण सारं काही प्रसिद्धीसाठी असं माणूस करू लागतो. आजच्या जीवनात तर फ्लेक्सबाजीनं केलेला कहर काहूर माजवीत आहे. कुणाचे वाढदिवस, कुणाची निवड, कुणाचा गावगन्ना पुरस्कार, कुणाचं अभीष्टचिंतन यांचे मोठमोठे फलक आणि त्यावरील चित्रविचित्र चेहरे यामुळे शहराचं सौंदर्य पार नाहीसं होतं. सक्तीनं आपली छबी इतरांना बघायला लावणारे हे फलकबाज प्रसिद्धीच्या इतके आहारी जातात, की जगात आपल्यापेक्षा विद्वान, कर्तृत्ववान, पराक्रमी, उद्योगी; पण प्रसिद्ध नसलेले खूप लोक आहेत याची त्यांना जाणीव नसते. हे नुसतं राजकारण वा समाजकारणातल्या लोकांबाबतच आहे असं नाही. साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही या मोहातून सुटता आलेलं नाही.
‘पद’ हा तर आता सार्वजनिक जीवनाचा आवश्यक भाग झाला आहे. प्रत्येकाला पद हवं आहे. ‘कशी या त्यजू पदाला’ असं एकदा पद मिळावं, ही सर्वांची भावना असते. आताशा एखाद्या संस्थेत, मंडळात पद रिकामं नसलं, तरी माणसांचा सोयीसाठी पदं निर्माण करावी लागतात. केंद्रीयमंत्रिमंडळापासून, ग्रामपंचायतीपर्यंत हीच गोष्ट आहे. ‘कामासाठी पद’ याऐवजी पदासाठी काम होत असतं आणि कधी कधी कामाविनाही पद भूषवलं जातं.
पदाविना काम झालं तर ते प्रेमानं होतं; पण त्यासाठी कामावर प्रेम असावं लागतं. एका कर्तव्यनिष्ठ; पण गरीब शिक्षकाच्या निरोप समारंभाप्रसंगी एका वक्त्यानं त्या शिक्षकासंबंधी सांगितलं, ‘सरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं. विद्येवर आणि विद्यार्थ्यांवर प्रेम केलं. प्रेम, पैसा, प्रसिद्धी आणि पद यांपैकी सरांजवळ खूप प्रेम आहे. सरांनी पैसा पोटापुरता मिळविला. त्यांना प्रसिद्धीही फार मिळाली नाही. पद तर त्यांना कुणी दिलंच नाही; पण मी सरांना सर्वांत जास्त भाग्यवान आणि श्रीमंत समजतो. ज्यांच्यापाशी गडगंज पैसा आहे, ज्यांना सर्वदूर प्रसिद्धी आणि जे नामवंत पदाधिकारी आहेत असे सर्व मोठमोठे विद्यार्थी सरांच्या प्रेमाच्या अकाउंटमध्ये आहेत.’
लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सरांना लाभलेली ही कृतार्थता प्रेमामुळेच लाभली ना?
कविवर्य गोविंदाग्रजांनी म्हटलंय,
प्रेमे डोले, प्रेमे बोले, प्रेमे जग हाले
प्रेमासाठी जगी आजवर काय नाही झाले!’
म्हणून चार ‘प’कारांपैकी अग्रक्रम पहिल्या ‘प’ काराला प्रेमाला. हा एकच ‘प’कार तुमच्यापाशी असला, तर बाकीचे तीन ‘प’कार मागोमाग येतात आणि नाही आले तरी जीवन तुडुंब होतं.