सन २०२० मध्ये संपूर्ण वर्षांत एकूण ६ ग्रहण होणार आहेत. यामध्ये २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणांचा समावेश आहे. नवीन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. ग्रहणकाळात पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे, असे सांगितले जाते. जाणून घेऊया तुळशीपत्राचे महत्त्व...
आपल्या देशात तुळशीला धार्मिक महत्त्व जास्त आहे. समुद्र मंथनावेळी ज्यावेळी अमृत जमिनीवर सांडले, त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. ग्रहणकाळात शुद्धीकरणासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.
चंद्रग्रहण २०२०: जाणून घ्या वेध, वेळ आणि समाप्ती
ग्रहणकाळात घरात येणाऱ्या अशुद्ध हवेपासून पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर तुळशीची पाने ठेवली जातात. तुळशीच्या पानांमुळे दुषित हवेचा परिणाम होत नाही. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते, अशी मान्यता आहे.
ग्रहण लागण्यापूर्वी तुळशीची पाने पाण्यात टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी, असे सांगितले जाते. तसेच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पाने टाकून ठेवावीत. यामुळे ग्रहणकाळात पाणी दुषित होत नाही, असे मानले जाते.
चंद्रग्रहण २०२०: 'या' राशींवर पडणार प्रभाव
ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुळशीमध्ये पारा असतो. त्याचप्रमाणे तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आरोग्यासाठी तुळशी वरदान आहे. तुळशीपत्रांमध्ये असलेल्या पाऱ्यामुळे कोणत्याही दुषित किरणांचा त्यावर प्रभाव पडत नाही. यासाठी तुळशीची पाने पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांवर ठेवावीत, असे सांगितले जाते.
खास करून घरातील लोणचे, मुरंबा, दूध, दही आणि अन्य खाद्य पदार्थांवर ग्रहणकाळात तुळशीपत्र ठेवावे, असे मानले जाते. ग्रहणकाळानंतर करण्यात येणाऱ्या पूजाविधीमध्येही तुळशीच्या पानांचा उपयोग करावा, असे सांगितले जाते.
चंद्रग्रहण २०२०: ग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?
वर्ष २०२० मधील आगामी ग्रहणेः
१० जानेवारी - चंद्रग्रहण
५ जून - चंद्रग्रहण
२१ जून - सूर्यग्रहण
५ जुलै - चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर - चंद्रग्रहण
१४ डिसेंबर - सूर्यग्रहण
चंद्रग्रहण २०२०: ग्रहणात पाळण्याची खाण्याची पथ्ये
खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण पाहायला मिळते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. ग्रहणाच्या दिवशी खाण्यापिण्यापासून ते पूजाअर्चा करण्यापर्यंतची अनेक बंधने धार्मिक मान्यतेनुसार टाकण्यात आली आहेत.
आपल्या देशात तुळशीला धार्मिक महत्त्व जास्त आहे. समुद्र मंथनावेळी ज्यावेळी अमृत जमिनीवर सांडले, त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. ग्रहणकाळात शुद्धीकरणासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.
चंद्रग्रहण २०२०: जाणून घ्या वेध, वेळ आणि समाप्ती
ग्रहणकाळात घरात येणाऱ्या अशुद्ध हवेपासून पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर तुळशीची पाने ठेवली जातात. तुळशीच्या पानांमुळे दुषित हवेचा परिणाम होत नाही. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते, अशी मान्यता आहे.
ग्रहण लागण्यापूर्वी तुळशीची पाने पाण्यात टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी, असे सांगितले जाते. तसेच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पाने टाकून ठेवावीत. यामुळे ग्रहणकाळात पाणी दुषित होत नाही, असे मानले जाते.
चंद्रग्रहण २०२०: 'या' राशींवर पडणार प्रभाव
ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुळशीमध्ये पारा असतो. त्याचप्रमाणे तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आरोग्यासाठी तुळशी वरदान आहे. तुळशीपत्रांमध्ये असलेल्या पाऱ्यामुळे कोणत्याही दुषित किरणांचा त्यावर प्रभाव पडत नाही. यासाठी तुळशीची पाने पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांवर ठेवावीत, असे सांगितले जाते.
खास करून घरातील लोणचे, मुरंबा, दूध, दही आणि अन्य खाद्य पदार्थांवर ग्रहणकाळात तुळशीपत्र ठेवावे, असे मानले जाते. ग्रहणकाळानंतर करण्यात येणाऱ्या पूजाविधीमध्येही तुळशीच्या पानांचा उपयोग करावा, असे सांगितले जाते.
चंद्रग्रहण २०२०: ग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?
वर्ष २०२० मधील आगामी ग्रहणेः
१० जानेवारी - चंद्रग्रहण
५ जून - चंद्रग्रहण
२१ जून - सूर्यग्रहण
५ जुलै - चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर - चंद्रग्रहण
१४ डिसेंबर - सूर्यग्रहण
चंद्रग्रहण २०२०: ग्रहणात पाळण्याची खाण्याची पथ्ये
खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण पाहायला मिळते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. ग्रहणाच्या दिवशी खाण्यापिण्यापासून ते पूजाअर्चा करण्यापर्यंतची अनेक बंधने धार्मिक मान्यतेनुसार टाकण्यात आली आहेत.