अ‍ॅपशहर

होळीच्या दिवशी हे उपाय करा, आजारापासून मुक्ती मिळवा

तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुम्ही निरोगी आयुष्याचा आस्वाद घेऊ शकता. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे या उपायांनी तुम्ही मोठ्यातली मोठी समस्या सुद्धा सहजतेने सोडवू शकता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2021, 5:51 pm
होळीचा सण आपापसातील वैरभाव विसरून प्रेम व आनंदाच्या रंगात रंगून जाण्याचा दिवस आहेच परंतु या दिवशी तुम्ही काही खास उपाय केलेत तर तुम्ही निरोगी आयुष्याचा आस्वाद घेऊ शकता. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे या उपायांनी तुम्ही मोठ्यातली मोठी समस्या सुद्धा सहजतेने सोडवू शकता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम do this remedy on the day of holi get rid of the disease
होळीच्या दिवशी हे उपाय करा, आजारापासून मुक्ती मिळवा


गंभीर आजारांनी ग्रासलेले असाल तर हा उपाय करा

एखाद्याला गंभीर आजार असेल किंवा कुटुंबात असा एखादा सदस्य असेल ज्याला झालेला आजार कितीही उपाय केले तरी तो बरा होत नसेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. होळीच्या दिवशी मोठ्या आकाराचे लिंबू घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा फिरवावे. यानंतर एक सुरी घेऊन ती आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करत शरीराच्या मध्यभागी नेऊन त्या लिंबाचे सुरीने दोन तुकडे करावेत. संध्याकाळच्या वेळी लिंबाचे दोन तुकडे घराच्या दोन दिशांना टाकून द्यावेत. असे केल्याने गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला आराम मिळतो असे मानले जाते.

गुरुचे कुंभ राशीत परिवर्तन, या ६ राशींसाठी चांगले दिवस येणार

जर एखाद्याची तब्येत सतत बिघडत असेल तर

घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्याची तब्येत सतत बिघडत असेल तर त्या व्यक्तीने होळीच्या दिवशी हा पानाचा उपाय करून बघावा. होळीच्या दिवशी न कापलेले पान व लाल रंगाची दोन गुलाबाची फुले आणि बत्ताशा घेऊन आजारी व्यक्तीच्या शरीरावरून ३१ वेळा फिरवावे. यानंतर सुर्योदयापूर्वी ते घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर ठेवावे. असे केल्याने आजारापासून हळू हळू आराम मिळतो असे मानले जाते.

Motivational story संघर्षावर विजय

याने सुद्धा आयुष्य निरोगी होते, करून बघा

एखाद्याला आजारपणामुळे पैशांची समस्या असेल तर त्यांनी होळीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात जाऊन मा लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. या व्यतिरिक्त सहस्रनामाचा जप करावा. पूजा झाल्यावरती यथाशक्ती गरजू लोकांना दान द्यावे. पक्ष्यांना चारा खायला द्यावा. निराश्रित लोकांना जेवण द्यावे. असे केल्याने मा लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मीची कृपा होते. त्यामुळे सुख-समृद्धीत वाढ होते तसेच व्यक्ती हळूहळू निरोगी होतो. पैशांचे नवीन स्त्रोत निर्माण होतात.

Holi 2021: होलिका दहन आणि रंगपंचमीची खास वैशिष्ट्ये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज