अ‍ॅपशहर

Why is sindoor offering to Hanuman हनुमंतांला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी सुरु झाली? वाचा, कारण

हनुमंतांना शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, ही प्रथा सुरू होण्यामागे नेमके काय कारण घडले? मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? जाणून घेऊया...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2020, 3:48 pm
ज्ञान, बुद्धी, शिक्षण, पराक्रम, नम्रता, लीनता, भक्तिभाव आणि सामर्थ्यासह अनेक गुण हनुमंतांच्या ठायी दिसून येतात. रामभक्त असलेल्या हनुमंतांनी रामायणात अनेक पराक्रम केल्याचे दिसून येते. वाली-सुग्रीव युद्धापासून ते सीता मातेची गुप्त भेट घेईपर्यंत हनुमंतांनी केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर रामकार्य पुढे नेल्याचे दिसून येते आणि त्यानंतर रावणाशी झालेल्या युद्धात आपले बलकौशल्यही दाखवून दिले. श्रीरामांच्या अवतारकार्याची सांगता होईपर्यंत हनुमंतांनी सेवक कसा असावा, याचा उत्तम आदर्शपाठ सर्वांसमोर ठेवल्याचे पाहायला मिळते. हनुमंतांचे नामस्मरण, आराधना, उपासना कोट्यवधी भाविक नियमितपणे करत असतात. हनुमंतांना शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, ही प्रथा सुरू होण्यामागे नेमके काय कारण घडले? मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hanumanala shendur ka lavtat


घरात उजव्या सोंडेचा गणपती स्थापन करावा का? वाचा, शास्त्र व मान्यता

हनुमानाला शेंदूर वाहण्यामागे रामायणातील एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकदा सीता देवी साजश्रुंगार करत होत्या. त्याचवेळेस हनुमान तिथे पोहोचले. सीता मातेला नमस्कार केला. सीता मातेची सात्विकता हनुमंतांना अतिशय भावली. साजश्रुंगार झाल्यावर सीताने भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ते पाहून हनुमंताने कुतुहलाने विचारले, माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?, त्यावर हसून सीता माता म्हणाली की, हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्यलंकार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात.

घरात देवघर नेमके कुठे असावे? वाचा, देव्हाऱ्याचे नियम, शास्त्र व योग्य दिशा

सीता मातेने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देत हनुमान म्हणाले की, पतीला दीर्घायुष्य, म्हणजे प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य! पती म्हणजे पालन करणारा. म्हणजेच ते माझ्यासह या साऱ्या विश्वाचे पती आहेत. मग तुमच्यासारखेच प्रत्येकाने भांगात शेंदूर लावले पाहिजे. मात्र, केवळ एक रेघ का? माझ्या रामरायाचे नाव अजरामर व्हावे, त्यांचे अस्तित्त्व कायम राहावे, म्हणून मी शेंदूराची पूर्ण वाटीच अंगाला चोपडून घेतो.

महाराष्ट्रात ९५० वर्षांपूर्वी बांधलेल्या 'या' शिवमंदिराचे रहस्य माहित्येय? वाचा

हनुमान नुसते सांगून थांबले नाहीत, तर क्षणार्धात सर्वांगाल सिंदुरलेपन करून घेतले. हनुमानांची भाबडी व वेडी रामभक्ती तसेच अलोट रामप्रेम पाहून सीता माता आणि प्रभू श्रीरामचंद्रांना भरून आले. तेव्हापासून हनुमंताला शेंदूर अर्पण करायची प्रथाच सुरू झाली, ती आजतागायत सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. मारुतीला उडीद, तेल, शेंदुर, रुईच्या पान-फुलांचा हार आवडतो. या सर्व गोष्टी आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. बल, शक्तीवर्धक आहेत. प्रत्येक रंगात विशेष प्रकाराची ऊर्जा असते. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्यावर भक्त याचा तिलक करतात, तेव्हा दोन्ही डोळ्यांमध्ये असलेले ऊर्जाकेंद्र सक्रिय होते. असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच ऊर्जा प्राप्त होते. हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज