अ‍ॅपशहर

Solar Eclipse 14 December 2020 Timings सोमवती अमावास्येला सूर्यग्रहण : कोणाचे नुकसान, कोणाला लाभ? वाचा

डिसेंबर महिन्यातील शेवटचे सूर्यग्रहण कार्तिक अमावास्येच्या दिवशी आहे. सोमवती अमावास्येला लागणाऱ्या सूर्यग्रहणाचा नेमका कसा प्रभाव राहील? कोणाला याचा फायदा होऊ शकेल? सद्गुरु स्वामी आनंदजी यांच्याकडून जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2020, 2:01 pm
सन २०२० मधील अखेरचे सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजून ०३ मिनिटांनी सूर्यग्रहण लागेल आणि त्याच दिवशी रात्री १२ वाजून २३ मिनिटांनी संपेल. सदर सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिकाच्या काही भागात सूर्यग्रहण दिसणार आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातील शेवटचे सूर्यग्रहण कार्तिक अमावास्येच्या दिवशी आहे. अमावास्या तिथी सोमवारी येत असल्यामुळे याला दर्श सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. ग्रहणावेळी सूर्य वृश्चिक राशीत विराजमान असेल. तसेच यावेळी ज्येष्ठ नक्षत्र, शूल योग आणि कौलव करण असेल. सोमवती अमावास्येला लागणाऱ्या सूर्यग्रहणाचा नेमका कसा प्रभाव राहील? कोणाला याचा फायदा होऊ शकेल? सद्गुरु स्वामी आनंदजी यांच्याकडून जाणून घ्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम solar eclipse december 2020 predictions


सूर्यग्रहण डिसेंबर २०२० : 'या' ५ राशींना उत्तम फायदेशीर; वाचा

सूर्यग्रहणानंतरची स्थिती

दर्श सोमवती अमावास्येला लागणाऱ्या ग्रहणावेळी सूर्यासह चंद्र, बुध, शुक्र आणि केतु आदी ग्रह वृश्चिक राशीत असतील. ज्योतिषीय अभ्यासानुसार, डिसेंबरमधील अखेरचे सूर्यग्रहण जागतिक स्तरावर अशांतता आणि बेचैनीचे वातावरण निर्माण करणारे ठरू शकेल. अनेकविध प्रकारच्या आंदोलनांमुळे ताण-तणाव वृद्धिंगत होण्याचे संकेत आहेत. जनमानसातील असंतोष वाढीस लागेल. सामान्य जनतेचे मानसिक कष्ट वृद्धिंगत होऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सन २०२१ मध्ये ४ ग्रहणे; भारतात किती दिसणार? पाहा, अद्भूत योग

सूर्यग्रहणाचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव

सूर्यग्रहणाचा राजकारण आणि समाज या दोन्हींवर प्रतिकूल प्रभाव राहील, असे सांगितले जात आहे. राजकीय आणि सामाजिक पातळीवरील संघर्ष तीव्र होऊ शकेल. जनतेच्या क्रयशक्तीमध्ये कमतरता आल्याचे दिसून येईल. जनतेमध्ये द्वेषाचे वातावरण वृद्धिंगत होऊ शकेल. सरकारच्या अडचणीत भर पडून प्रतिमा मलीन होण्याची चिन्हे आहेत. प्रतिकूल वार्ता समजतील. करोना संकटासह अन्य आजार बळावून विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाचे शेवटचे सूर्यग्रहण : देशासह जागतिक पातळीवर मोठा प्रभाव; वाचा

सूर्यग्रहणाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

आताच्या घडीला शेअर बाजार नवनवे विक्रम नोंदवताना पाहायला मिळत आहे. मात्र, सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव शेअर बाजारावर दिसून येऊ शकेल. आगामी कालावधीत मोठ्या प्रमाणात निर्देशांक गडगडू शकेल, असा दावा केला जात आहे. मौल्यवान धातूंच्या किमती कमी होऊ शकतील. चांदीचा दर वाढू शकतील. मात्र, तेजीत चढ-उतार पाहायला मिळू शकतील. दर घसरणाचा गुंतवणूकदारांवर प्रतिकूल प्रभाव दिसू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज