अ‍ॅपशहर

अडचणींवर मार्ग सापडत नाही ? तर पाहा हातावरील 'या' रेषा यातच दडलाय उपाय

तुम्ही येणार्‍या त्रासाशी झुंज द्यायला तयार होऊ शकतात किंवा येणाऱ्या सुखद बदलांबद्दलही माहिती घेऊ शकता. तर मग जाणून घ्या की हस्तरेषांमार्फात अडचणी सोडवण्याचे मार्ग कोणते आहेत ?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2021, 10:48 am
हो खरंच हातावरील रेषांवरून आयुष्याबाबत बरीच माहिती मिळू शकते. कारकीर्द असो की वैयक्तिक आयुष्याची गोष्ट असो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच्यात लपलेले आहे. म्हणजेच, जर तुम्ही त्यांना वेळेवर समजून घेत असाल तर तुम्ही येणार्‍या त्रासाशी झुंज द्यायला तयार होऊ शकतात किंवा येणाऱ्या सुखद बदलांबद्दलही माहिती घेऊ शकता. तर मग जाणून घ्या की हस्तरेषांमार्फात अडचणी सोडवण्याचे मार्ग कोणते आहेत ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem signs in palmistry and its remedies in marathi
अडचणींवर मार्ग सापडत नाही ? तर पाहा हातावरील 'या' रेषा यातच दडलाय उपाय

मैत्री आणि प्रेम करतांना उपयोगी, नखांमध्ये सुद्धा दडलेली आहेत अशी रहस्ये


​जर सतत नुकसानीचा सामना करावा लागत असेल तर

हस्तरेषाशास्त्रानुसार जर भाग्य रेषेत भेगा पडलेल्या असेल किंवा भाग्य रेषा लहान असेल तर तर अशा परिस्थितीत लोकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, नुकसानीपासून वाचण्यासाठी आणि लाभ मिळावा म्हणून कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र 'ऊं ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट लक्ष्मी मम गृहे धनं पूरय पूरय नमः' चा जप करावा.

​मंत्रजप करण्याची पद्धत

कुबेर मंत्राचा जप करण्यासाठी रात्री अंघोळ करून खाली पांढरे कापड अंथरा. यानंतर त्यावर कुबेर यंत्राची स्थापना करा. त्यानंतर त्याला पाण्याने आंघोळ घालावी आणि केशर, फुलांनी पूजा केल्यावर त्याच्या समोर दिवा ठेवा. यानंतर, संपूर्ण भक्ती व श्रद्धेने या कुबेर अष्ट लक्ष्मी मंत्राचा संकल्प घ्या आणि १००८ वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर त्यास मनुका प्रसाद म्हणून अर्पण करा. यानंतर या पद्धतीने नियमितपणे मंत्र जप करावा.

सूर्यग्रहण जून २०२१: १० जूनच्या सूर्यग्रहणाचा "या" राशींच्या लोकांना सर्वात जास्त त्रास

​हा बघा मंत्राचा अद्भुत परिणाम

हा कुबेर अष्ट लक्ष्मी मंत्र संपूर्ण भक्तिभावाने जप केला तर भाग्य रेषा आपोआप सुधारू लागते अशी मान्यता आहे. यासह व्यवसायात येणाऱ्या अडचणीही दूर होऊ लागतात. या व्यतिरिक्त कोणाच्या तळहातावर रेषांचे जाळे असेल तर ते अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, हे आयुष्यात येणाऱ्या त्रासांचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत उशीर न करता बुधवारी सकाळी श्वेतार्क गणपती घेऊन त्याला लाल रंगाच्या आसनावर बसवा.

​मग अशाप्रकारे या विशेष मंत्राचा जप करावा

श्वेतार्क गणपतीची स्थापना केल्यानंतर त्याला कुंकवाचा टिळा लावा. तुमचे त्रास दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करा. यानंतर पूर्ण विश्वासाने 'ऊॅं अंतर‍िक्षाय स्‍वाहा' या मंत्राचा सव्वा लाख वेळा जप करा. यानंतर मंत्र पूर्ण झाल्यावर बुधवारी मुलांना आणि गरजूंना गोड पदार्थ द्या. असे केल्याने आयुष्यातील कठीण समस्यांपासून आराम मिळतो असे मानले जाते.

कंकणाकृती सूर्यग्रहण, देश आणि जगावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज