अ‍ॅपशहर

घरी या ठिकाणी पाण्याचा कारंजा ठेऊन पाहा, खूप फायदा होईल

अथक प्रयत्न करूनसुद्धा करिअर आणि कुटुंबात नेहमीच उलथापालथ होते. तसेच, वास्तुशास्त्रातही या समस्येचे निराकरण दिसून येते. ज्योतिषी व वास्तू तज्ज्ञ सचिन मेहरा यांच्या मते घरात पाण्याचे कारंजा बसवला तर तुम्हाला बराच फायदा होतो. चला जाणून घेऊया ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2021, 6:35 am
सुख-समृद्धी प्रत्येकाला हवी असते. प्रत्येकाला आपल्या कुटुंबात सर्वत्र आनंद आणि सुख समृद्धी असली पाहिजे अशी इच्छा असते. परंतु बर्‍याच वेळा, अथक प्रयत्न करूनसुद्धा करिअर आणि कुटुंबात नेहमीच उलथापालथ होते. तसेच, वास्तुशास्त्रातही या समस्येचे निराकरण दिसून येते. ज्योतिषी व वास्तू तज्ज्ञ सचिन मेहरा यांच्या मते घरात पाण्याचे कारंजा बसवला तर तुम्हाला बराच फायदा होतो. चला जाणून घेऊया ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम benefits of water fountain at home in marathi
घरी या ठिकाणी पाण्याचा कारंजा ठेऊन पाहा, खूप फायदा होईल


येथे पाण्याचे कारंजे किंवा त्याचे शोपीस ठेवा

वास्तुशास्त्रानुसार घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा तुम्ही व्यवसाय-नोकरीमध्ये समस्यांना तोंड देत असाल तर नक्कीच पाण्याचे कारंजा घरात ठेवा. परंतु ते कॉरिडॉर किंवा बाल्कनीमध्ये ठेवले जाईल याची काळजी घ्या. यामुळे घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहील. तसेच संपत्तीतही वाढ होईल. व्यवसाय-नोकरीच्या समस्याही दूर होतील.

Shravan Somvar Vrat in Marathi यावर्षातील श्रावण सोमवार किती, कधी, महत्व आणि कथा जाणून घ्या

घरात या ठिकाणी पाण्याचे कारंजे असावे

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर बाग असेल तर तेथे पाण्याचा कारंजा नक्कीच बांधून घ्या. परंतु एका दिशेने असलेला हा पाण्याच्या प्रवाहाची दिशा कधीही बाहेरील बाजूला नसावी. त्याचा प्रवाह नेहमी घराकडे असावा. असं म्हणतात की, जर प्रवाह घराबाहेरच्या दिशेला असेल तर पैसे कमी होण्याची शक्यता वाढते. घरामध्ये पाण्याचे कारंजे उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेने ठेवले पाहिजेत. या दिशेने पाण्याचे कारंजे असल्याने कारकीर्द आणि कुटुंबात सुख समृद्धी होते असे मानले जाते.

जर स्वप्नात भोलेनाथ आले असतील तर मग समजून घ्या की...

पाण्याचे कारंजे लावणे शक्य नसेल तर

वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा काम चांगले होता होता अचानक खराब होत असेल तर पाण्याचे कारंजे बसवल्यास तुम्हाला खूप फायदा मिळू शकतो. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला पाण्याचे कारंजे ठेवणे शक्य नसेल तर मग मातीच्या भांड्यात पाणी भरून ते घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. मानले जाते की, असे केल्याने घरातील लोकांचे दुर्दैव संपते. त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळते.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य २५ ते ३१ जुलै २०२१ : या आठवड्यात कोणत्या राशींना आर्थिक लाभ होईल जाणून घेऊया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज