घरात, कुटुंबात काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात. त्या चुकांमुळे लक्ष्मी देवीची अवकृपा आपल्यावर होते, असे सांगितले जाते. काही चुका आपल्याकडून अनावधानाने होत असतात. वास्तुशास्त्रातही यासंदर्भात काही उल्लेख असल्याचे पाहायला मिळते. घरातील छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे लक्ष्मी देवीची अवकृपा होऊ शकते, असे वास्तुशास्त्र सांगते. या गोष्टी टाळल्या, या चुका टाळल्या, तर लक्ष्मी देवीची नाराजी पत्करली जाणार नाही. लक्ष्मी देवीच्या कृपेमुळे धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य यांची कमतरता राहणार नाही. आपल्या घरात लक्ष्मी देवीचा वास कायम राहील, असे शास्त्र सांगते. चला तर मग पाहूया...
स्वच्छता करताना घ्या काळजी
घराची स्वच्छता ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो. स्वच्छ आणि नेटनेटके घर सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते, असे सांगितले जाते. मात्र, स्वच्छतेनंतर जमा केलेला कचरा, भंगार एकत्र करून घराच्या गच्चीवर ठेवू नये. असे करणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या गच्चीवर कचरा एकत्रित करून ठेवला असल्यास धनसंबंधीच्या समस्या वारंवार उद्भवू शकतात. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कचरा जमा झाल्याने तेथे अस्वच्छता निर्माण होते. पाऊस पडल्याने पाणी साचते. कचऱ्यामुळे पाणी तुंबते. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. अशा गोष्टी लक्ष्मी देवीला अजिबात पसंत नाहीत, असेही सांगितले जाते.
४ हजार वर्षांपासून उपलब्ध तुरटीचे 'हे' उपाय भाग्योदयास उपयुक्त; वाचा
घरातील व्यवहार
घर म्हटले की, भांड्याला भांडे लागते. मात्र, अनेकदा घरातील सदस्यांचा व्यवहार हा चुकीचा असतो. काही घरात रागाच्या भरात कुटुंबातील महिला आणि मुलांवर हात उचलण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात. अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र, या अशा गोष्टी लक्ष्मी देवीला अजिबात आवडत नाही, असे मानले जाते. घरातील महिलेला लक्ष्मीचे रुप मानले जाते आणि अशा महिलेबाबत असे व्यवहार घडत असतील, तर ते शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, अशा कुटुंबामध्ये लक्ष्मी देवीचा वास दीर्घकाळ राहत नाही. आर्थिक आघाडीवर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील महिलेला आनंदी ठेऊन तिच्याबरोबरचा व्यवहार हा चांगला असला पाहिजे, असे शास्त्र सांगते.
आर्थिक विवंचनेतून मुक्ती हवीय? मिठाचे 'हे' उपाय उपयुक्त; वाचा
पादत्राणे ठेवण्याची जागा
काही जणांना घरी आल्यावर पादत्राणे म्हणजेच चपला, बूट इथे तिथे टाकण्याची सवय असते. मात्र, लक्ष्मी देवीला असा अव्यवस्थितपणा अजिबात आवडत नाही, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार, पादत्राणे म्हणजचे चपला, बुट नेहमी जागच्या जागी ठेवावे, असे सांगितले जाते. दुसरे म्हणजे बाहेरून घरात आल्यावर घराच्या प्रवेशद्वारासमोर कधीही चपला, बूट काढू नये. ते अशुभ मानले जाते. असे केल्यास धनसंबंधी समस्या वृद्धिंगत होतात, असे सांगितले जाते.
सावधान! 'या' पाच राशीच्या व्यक्तींना कर्ज देताय? शंभरदा विचार करा; वाचा
पाण्यासंदर्भात घ्या काळजी
पाणी हेच जीवन आहे, असे म्हटले जाते. अनेक कुटुंबामध्ये घरातील नळ हे सदा ठिपकत असतात, असे चित्र पाहायला मिळते. नळातून होत राहणारी पाणी गळती ही अत्यंत अशुभ मानली जाते. पाण्याची सतत होत गळती ही एका प्रकारे अभिशाप समजला जातो. या अशा प्रकाराने लक्ष्मी देवी नाराज होते, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, ही बाब अत्यंत चुकीची मानली गेली आहे. ज्या घरातून पाणी वाया जाते, तेथे पैसा टिकत नाही, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? 'ही' आहेत खास गुणवैशिष्ट्ये; जाणून घ्या
तुळशीच्या रोपट्याची योग्य दिशा
तुळस ही श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. तसेच तुळस ही महालक्ष्मी स्वरुप मानली जाते. तुळस घरात लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील वातावरण उत्तम राहते. घरातील सकारात्मकता वाढीस लागते, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोपटे हे योग्य दिशेला लावले गेले पाहिजे. काही ठिकाणी अनावधानाने तुळशीचे रोपटे चुकीच्या दिशेला लावलेले पाहायला मिळते. तुळशीचे रोपटे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे, असे सांगितले जाते. अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी पत्करावी लागते. अन्य कुठेही तुळशीचे रोपटे लावू नये, असे सांगितले गेले आहे.
तुळशीचे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? वाचा, महत्त्व व मान्यता