अ‍ॅपशहर

वास्तुशास्त्र : चुकूनसुद्धा असे करू नका अन्यथा संकटांचा सामना करावा लागू शकतो

अचानक कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले असेल तर वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया या उपायांची माहिती...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2021, 2:30 pm
अचानक कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले असेल किंवा घरातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण-तंटे होत असतील तर थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा वास्तुशास्त्रानुसार जीवनात संकटांची मालिकाच सुरु होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या उपायांची माहिती..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vastu remedies to get rid of all problems in marathi
वास्तुशास्त्र : चुकूनसुद्धा असे करू नका अन्यथा संकटांचा सामना करावा लागू शकतो



​दुध अशा पद्धतीने ठेऊ नका

वास्तुशास्त्रानुसार दुध कोणत्याही भांड्यात ठेवा पण ते झाकून ठेवा. बाहे उघड्यावर ठेऊ नका. दुध असे उघड्यावर ठेवल्यावर घरातील सदस्यांमध्ये वाद-विवादाला आमंत्रण मिळते असे मानले जाते. मानसिक आजार देखील होऊ शकतात.

अक्षय्य तृतीया २०२१ : हे खास उपाय करा आणि धनलाभ मिळवा

​तुम्ही हे असं तर करत नाही आहात ना

वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर रिकामी मडकी, जुन्या वस्तू, बिघडलेला कुलर, पंखा किंवा रद्दीचे समान ठेवू नये. विशेषतः ज्या खोलीत तुम्ही झोपता त्याच्या छतावर ह्या वस्तू कधीच ठेऊ नयेत. याव्यतिरिक्त झोपताना डोक्याजवळ लाल रुमाल ठेवा. असे केल्याने वाईट स्वप्ने येत नाहीत. तसेच घरात कधीही एकदन काळोख करु नये. घरात कुठेना कुठे उजेड असावा असे केल्याने वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि मानसिक आजारापासून मुक्तता होते.

करोना काळात ईदच्या अशा द्या शुभेच्छा

​मुख्य दरवाज्यासमोरच्या दिशेची काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चुकूनही काटेदार झाड किंवा फुल ठेवू नये. तसेच दुषित, अस्वच्छ पाणी सुद्धा तिथे जमा होणार नाही याची काळजी घ्या. यामुळे घरातील लोकांच्या आयुष्यात संकटांचे आगमन होऊ शकते. तसेच घरातील लोकं व्याधीग्रस्त होण्याची शक्यता असते. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर शुब प्रतिक चिन्हे जसे की, ओम, गणपती, शुभ-लाभ किंवा ज्या देवी-देवतांवर तुमची श्रद्धा असेल त्याचे नाव लिहू शकता. असे केल्याने आयुष्यात येणारी संकटे नाहीशी होतात.

या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही चपला घालून जाऊ नये. असे केल्याने देवी अन्नपूर्णा नाराज होते असे मानले जाते. असे केल्याने घरात राग-रुसवे निर्माण होतात. तसेच जोपर्यंत गायीला पोळी खायला देत नाही तोपर्यंत जेवण करू नये. जी माणसे असे करत नाहीत त्यांना आरोग्य तसेच धनसंबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

करोना काळात ईदच्या अशा द्या शुभेच्छा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज