उष्टी भांडी ठेवू नये
अनेकांना अशी सवय असते की ते काही कारणाने किंवा आळसाने उष्टी भांडी स्वयंपाकघरात जमा करून ठेवतात. रात्रीच्या जेवणानंतर बरेचदा लोक भांडी धुवत नाही. जर आपण वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत असाल, तर स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवू नयेत. यामुळे आर्थिक अजचण निर्माण होते आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही. स्वयंपाकघरामध्ये कधीही उष्टी, खरगटी भांडी ठेवू नका, जेवण झाल्यावर लगेचच भांडी धुवा.
पोळ्या बनवताना काळजी घ्या
गॅसवर तवा ठेवताच तुम्ही लगेच पोळी बनवायला सुरुवात कराल, पण मान्यतेनुसार तव्यावर पोळी टाकण्यापूर्वी तव्यावर थोडं पाणी शिंपडलं पाहिजे, म्हणजेच तव्याला पाण्याने पवित्र करून घ्यावं. . यानंतर पोळी टाकावी असं केल्यास तुम्हाला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील लोकांच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. अशी मान्यता आहे.
स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवू नका
आडकाल बरेच लोक स्वयंपाकघरात भाजीपाला इत्यादी कापून स्वयंपाकघरातील एका कोपऱ्यात असलेल्या डस्टबिनमध्ये टाकतात. अनेकजण स्वयंपाकघरातच छोटि डस्टबिन ठेवतात आणि त्यातच कचरा गोळा करत असतात. पण असे मानले जाते की, हे करणे ना व्यवहारिक दृष्टीने चांगले आहे ना वास्तुनुसार, असे केल्याने घराच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच घरातील वातावरणही दुषीत होऊ लागते. ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे राहूचा प्रतिकूल प्रभाव वाढतो.
kartik Purnima 2021 त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, मान्यता आणि परंपरा
स्वयंपाकघरात बुट आणि चप्पल घालू नये
व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा धार्मिक दृष्टिकोनातूनही स्वयंपाकघरात बुट आणि चप्पल घालून जाणे योग्य मानले जात नाही. बुटआणि चप्पल स्वयंपाकघरात नेण्यामुळे अन्न दूषित होते आणि घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्याप्रमाणे तुम्ही मंदिरात बुट आणि चप्पल घालत नाही, त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात चप्पल नेणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बुट आणि चप्पल घातल्याने आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते.
सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी गॅसला नमस्कार करणे शुभ मानले जाते, चूल हे अग्निदेवतेचे रूप आहे, त्यामुळे सकाळी चुलीची पूजा केल्याने आरोग्य लाभते.
गॅस चालू ठेवू नका
काही लोकांना अशी सवय असते की ते अन्न शिजवण्यासाठी गॅसवर ठेवतात आणि इतर कामं करण्यात व्यस्त होतात. बरेच लोक मंद आचेवर अन्न शिजवण्यासाठी ठेवून इतर कामे करू लागतात. मान्यतेनुसार असे करणे शुभ मानले जात नाही. असे करणाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत तुमचा पैसा कुठे खर्च होतोय, हेही तुम्हाला योग्य पद्धतीने कळत नाही. म्हणजेच न कळत पैसा खर्च होत राहतो. अशी मान्यता आहे.
हिंदू धर्मात अन्न शिजविणे हा यज्ञ मानला जातो, त्यामुळे जोपर्यंत अन्न पूर्णपणे शिजत नाही आणि गॅसवरून खाली उतरत नाही तोपर्यंत ते स्वीकारू नये.
कार्तिक पौर्णिमेला तुम्ही या ५ गोष्टी केल्या तर तुम्हाला धन, आरोग्य आणि मान-सन्मान मिळेल