अ‍ॅपशहर

घरात लहान-सहान गोष्टींमुळे भांडण होत असेल तर हे उपाय नक्की करा

घरात छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. ही समस्या वास्तूच्या या उपायांनी सोडविली जाऊ शकते. तर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया ..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2021, 6:29 am
प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु बर्‍याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुवीधी असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. यामुळे घराची शांती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. पण सचिन मेहरा यांच्या म्हणण्यानुसार वास्तूदोषामुळे असे घडते. तसेच, ही समस्या वास्तूच्या या उपायांनी सोडविली जाऊ शकते. तर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vastu tips to get rid of house quarrel in marathi
घरात लहान-सहान गोष्टींमुळे भांडण होत असेल तर हे उपाय नक्की करा



​जर खर्चासंबंधी भांडण होत असेल तर

वास्तूशास्त्रानुसार घरात पैशाशी संबंधित वाद असल्यास.. खर्चासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे. तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे. चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते.

​पती आणि पत्नीमध्ये वाद होत असेल तर

वास्तूशास्त्रानुसार, जर पती-पत्नी मध्ये विवाद असेल तर हे वास्तू दोषाचे लक्षण आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे. बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये. हलका रंग असला पाहिजे. असे म्हटले जाते की, हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्यात वाढ करते.

हस्तरेषाशास्त्रानुसार, अशा लोकांपासून सावध राहा अन्यथा तुम्ही अडचणीत याल

​घरातील सदस्यांनी हे लक्षात ठेवा

घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीत सदस्यांमध्ये भांडणे होत असतील तर सतर्क होणे आवश्यक आहे. त्वरित वास्तू दोषाचे निवारण करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभुत असते. वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे.

​​हे खूप उपयुक्त आहे, नक्कीच करा

एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तूदोषामुळे होते. म्हणून, रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यात तूपात भिजवलेला कपूर जाळा. असे म्हणतात की यामुळे वादाच्या या समस्येपासून आराम मिळतो.

ही ४ कार्य मुळीच करू नका, नाहीतर अपमानीत व्हावं लागेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज