सियोल:
दक्षिण कोरियाने BMW च्या गाड्यांच्या इंजिनात आग लागल्याच्या घटना लक्षात घेता कंपनीला ९९लाख डॉलर्स म्हणजेच ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच तक्रारींबाबत वारंवार सांगूनही चाढकल केल्याने कंपनीवर खटला दाखल करण्यात येणार आहे. दक्षिण कोरियाने सोमवारी ही बाब स्पष्ट केली.
दक्षिण कोरियाच्या परिवहन मंत्रालय समितीने पाच महिने चौकशी-विचारपूस करून जर्मनीची कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने तांत्रिक बाबींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि इंजिनात आग लागल्याच्या घटना समोर आल्यानंतर कार परत घेण्यास दिरंगाईदेखील केली असा निष्कर्ष काढला. वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण कोरियात बीएमडब्ल्यूच्या जवळपास ४० कार्सच्या इंजिनात आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
एग्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन (ईजीआर) कूलरमध्ये वॉल्व खराब असल्यानेच आग लागल्याची बाब मंत्रालयाच्या ध्यानात आली. बीएमडब्ल्यूने आगीच्या घटनांबद्दल माफी मागितली होती. कंपनीने जुलै आणि ऑक्टोबरमध्ये ६५ विविध मॉडेल्सच्या १७२,००० हजार वाहने परत बोलवली होती.
कंपनीच्या दक्षिण कोरियाच्या शाखेने मंत्रालयाने काढलेले निष्कर्ष हे कंपनीच्या आकलनानुसारच आहेत. ईजीआर कुलर्समध्ये कुलंटची गळती हेच आगीचे कारण आहे असं स्पष्ट करत कंपनीने मंत्रालयाच्या आरोपांवर थेट भाष्य करण्याचे टाळले.
दक्षिण कोरियाने BMW च्या गाड्यांच्या इंजिनात आग लागल्याच्या घटना लक्षात घेता कंपनीला ९९लाख डॉलर्स म्हणजेच ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच तक्रारींबाबत वारंवार सांगूनही चाढकल केल्याने कंपनीवर खटला दाखल करण्यात येणार आहे. दक्षिण कोरियाने सोमवारी ही बाब स्पष्ट केली.
दक्षिण कोरियाच्या परिवहन मंत्रालय समितीने पाच महिने चौकशी-विचारपूस करून जर्मनीची कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने तांत्रिक बाबींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि इंजिनात आग लागल्याच्या घटना समोर आल्यानंतर कार परत घेण्यास दिरंगाईदेखील केली असा निष्कर्ष काढला. वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण कोरियात बीएमडब्ल्यूच्या जवळपास ४० कार्सच्या इंजिनात आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
एग्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन (ईजीआर) कूलरमध्ये वॉल्व खराब असल्यानेच आग लागल्याची बाब मंत्रालयाच्या ध्यानात आली. बीएमडब्ल्यूने आगीच्या घटनांबद्दल माफी मागितली होती. कंपनीने जुलै आणि ऑक्टोबरमध्ये ६५ विविध मॉडेल्सच्या १७२,००० हजार वाहने परत बोलवली होती.
कंपनीच्या दक्षिण कोरियाच्या शाखेने मंत्रालयाने काढलेले निष्कर्ष हे कंपनीच्या आकलनानुसारच आहेत. ईजीआर कुलर्समध्ये कुलंटची गळती हेच आगीचे कारण आहे असं स्पष्ट करत कंपनीने मंत्रालयाच्या आरोपांवर थेट भाष्य करण्याचे टाळले.