अ‍ॅपशहर

बँक खातेदारांना गिफ्ट; ठेवींवर ५ लाखांचा विमा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधी बँक खातेदारांसाठी सर्वात मोठी घोषणा केली. विविध घोटाळयांमुळे धास्तावलेल्या बँक ग्राहकांना सीतारामन यांनी दिलासा दिला. बँकांवरील विमा कवच पाच लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. सर्वसामान्य खातेदारांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2020, 1:28 pm
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधी बँक खातेदारांसाठी सर्वात मोठी घोषणा केली. विविध घोटाळयांमुळे धास्तावलेल्या बँक ग्राहकांना सीतारामन यांनी दिलासा दिला. बँक खात्यातील रकमेवरील विमा कवच ५ लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. सर्वसामान्य खातेदारांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. सध्या बॅंकामधील ठेवीवर ठेवीदाराला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम budget-live


सध्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट ग्यारंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बॅंकामधील ठेवीवर ठेवीदाराला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. मात्र मागील काही वर्षांत बॅंकांमध्ये अनेक बडे घोटाळे झाले असून त्यात सामन्य ठेवीदारांना मोठी झळ बसली. नुकताच सहकार क्षेत्रातील पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्याने लाखो ठेवीदार भरडले गेल्याने ठेवींवरील त्रोटक विमा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. बॅंकांमधील आर्थिक घोटाळ्यांमुळे भरडणाऱ्या सामान्य ठेवीदारांचे हित जपण्याच्यादृष्टीने ठेवींवरील अर्थसंकल्पात विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली.'एसबीआय'च्या अभ्यासानुसार ६१ टक्के ठेवी या एक लाखांच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे विमा कवच वाढवण्याची मागणी करण्यात येत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज