म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रोखीच्या वापरावर विविध बंधने घालूनही नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर रोखीचा वापर झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळेच एटीएममधून रोकड काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. एटीएमसाठी चलनी नोटांचा पुरवठा ३० टक्के कमी होत असल्याचा दावा कॅश लॉजिस्टिक्स संघटनेने केला आहे.
देशातील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम बँकांनी एसआयएस प्रोसेगर, ब्रिन्क्स आर्या, सीएमएस अशा कंपन्यांना दिले आहे. परंतु दोन लाखांहून अधिक एटीएमसाठी या कंपन्यांकडे पुरेशी वाहने नाहीत. सुमारे नऊ हजार वाहनांद्वारे रोकड सर्व एटीएममध्ये घातली जाते. त्यातच अद्याप अनेक एटीएमचे रिकॅलिब्रेशन झालेले नाही.
यामुळे सर्वसामान्यांच्या हालांना पारावार उरलेला नाही. कॅशलेस व्यवहारांना साह्यभूत होणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ झाल्याचे प्रकार घडल्यामुळे रोखीचा वापर वाढला आहे. असे असताना, रिझर्व्ह बँक व सरकार रिमॉनीटायझेशन करण्याच्या अट्टहासापायी डिजिटल पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंट जनतेवर लादत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. हे दुर्दैवी ‘कम्पल्शन’ असल्याचे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून एटीएममध्ये रोकड नसूनही याबाबत आरबीआय कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, ही गोष्ट चलन नियामक असलेल्या आरबीआयला शोभणारी नाही, याकडेही उटगी यांनी लक्ष वेधले आहे.
रोखीच्या वापरावर विविध बंधने घालूनही नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर रोखीचा वापर झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळेच एटीएममधून रोकड काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. एटीएमसाठी चलनी नोटांचा पुरवठा ३० टक्के कमी होत असल्याचा दावा कॅश लॉजिस्टिक्स संघटनेने केला आहे.
देशातील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम बँकांनी एसआयएस प्रोसेगर, ब्रिन्क्स आर्या, सीएमएस अशा कंपन्यांना दिले आहे. परंतु दोन लाखांहून अधिक एटीएमसाठी या कंपन्यांकडे पुरेशी वाहने नाहीत. सुमारे नऊ हजार वाहनांद्वारे रोकड सर्व एटीएममध्ये घातली जाते. त्यातच अद्याप अनेक एटीएमचे रिकॅलिब्रेशन झालेले नाही.
यामुळे सर्वसामान्यांच्या हालांना पारावार उरलेला नाही. कॅशलेस व्यवहारांना साह्यभूत होणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ झाल्याचे प्रकार घडल्यामुळे रोखीचा वापर वाढला आहे. असे असताना, रिझर्व्ह बँक व सरकार रिमॉनीटायझेशन करण्याच्या अट्टहासापायी डिजिटल पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंट जनतेवर लादत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. हे दुर्दैवी ‘कम्पल्शन’ असल्याचे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून एटीएममध्ये रोकड नसूनही याबाबत आरबीआय कोणतेही स्पष्टीकरण देत नाही, ही गोष्ट चलन नियामक असलेल्या आरबीआयला शोभणारी नाही, याकडेही उटगी यांनी लक्ष वेधले आहे.