अ‍ॅपशहर

मारुती सुझुकीने केली ३००० कामगारांची कपात

ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका मारुती सुझुकीसारख्या मोठ्या कंपनीलाही बसला आहे. परिणामी मारुती सुझुकीने ३,००० कंत्राटी कामगारांची कपात केली असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2019, 9:43 am
दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका मारुती सुझुकीसारख्या मोठ्या कंपनीलाही बसला आहे. परिणामी मारुती सुझुकीने ३,००० कंत्राटी कामगारांची कपात केली असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3000 temporary workers loose jobs in maruti suzuki
मारुती सुझुकीने केली ३००० कामगारांची कपात


मारुती सुझुकी कार निर्माण क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी समजली जाते. आपल्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी तत्वावर कामगार भर्ती मारुती सुझुकी करत असते. कंपनीचे संचालक आर सी भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात मागणी असते तेव्हा मोठ्या प्रमाणात कामगार भर्ती केली जाते. मंदीच्या काळात मात्र या कामगारांचे कंत्राट वाढवले जात नाही. कंत्राटाचा काळ संपला की त्यांना नोकरी सोडावी लागते. यामुळे ३००० कामगारांना आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे. या जुलैमध्ये मारुती सुझुकीच्या खूप कमी कार विकल्या गेल्या आहेत. ' या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीत विक्रीला थोडी गती येईल अशी अपेक्षा आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. तेव्हा ग्रामीण भागात कारची विक्री वाढण्याची शक्यता आहे' अशी आशा भार्गव यांनी व्यक्त केली आहे. तसंच सरकारने सकारात्मक पावलं उचलल्यास कार व्यवसायातील सद्यस्थिती बदलू शकते असं मतही भार्गव यांनी व्यक्त केलं आहे.

मारुती सुझुकी प्रमाणे देशातील अनेक कार कंपन्या सध्या तोट्यात गेल्या आहेत. त्यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज