अ‍ॅपशहर

५० उद्योजकांकडून ६० हजार कोटींची परतफेड

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील शीर्षस्थ ५० उद्योजकांनी ५९,६०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत या उद्योजकांनी ४३ हजार कोटी रुपयांनी कर्जभार कमी केला होता. केंद्र सरकारच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ताळेबंदामध्ये समतोल साधण्यासाठी ही परतफेड करण्यात आली आहे.

Maharashtra Times 30 Dec 2019, 4:00 am
ईटी वृत्त, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम debt


चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील शीर्षस्थ ५० उद्योजकांनी ५९,६०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत या उद्योजकांनी ४३ हजार कोटी रुपयांनी कर्जभार कमी केला होता. केंद्र सरकारच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ताळेबंदामध्ये समतोल साधण्यासाठी ही परतफेड करण्यात आली आहे.

दिवाळखोरी कायद्याची कठोर अंमलबजावणी व अन्य स्रोतांतून (एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोइंग) कमी व्याजदरात मिळणारे कर्ज यामुळेही या कंपन्यांनी आपल्या कर्जांची परतफेड केल्याचे या सूत्राने सांगितले. भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा आकडा ऑक्टोबर २०१९मध्ये दुपटीने वाढून ३.४१ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला. गेल्या वर्षी याच कालावधीत या कर्जाचे प्रमाण १.४१ अब्ज अमेरिकी डॉलर होते.

यामुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय बँकांनी दिलेल्या कर्जाचे प्रमाण केवळ १.७ टक्क्यांनी वाढले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज