नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षात म्हणजे २०१९-२०मध्ये देशाचा विकासदर ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे. पुढील आर्थिक वर्षात जीडीपीच्या (सकल राष्ट्रीय उत्पादन) वाढीचा दर साडेसात टक्क्यांवर पोहोचेल व महागाईचा दर चार टक्क्यांपर्यंत नियंत्रणात राहील, अशी आमची धारणा आहे, असे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात ७.२ टक्के विकासदर अपेक्षित आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जात असून गेल्या पाच वर्षांतील सरासरी जीडीपी हा १९९१नंतरचा सर्वाधिक ठरला आहे, असे ते म्हणाले.
'२०१९-२०मध्ये ७.५ टक्के जीडीपी'
पुढील आर्थिक वर्षात म्हणजे २०१९-२०मध्ये देशाचा विकासदर ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे...
PTI 6 Feb 2019, 4:00 am