म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या वेतनवाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा येणार असून त्यामुळे मागणीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेचा आकार वाढण्यात मदत होईल. अतिरिक्त बचतीत वाढ होण्यास त्याचा हातभार लागेल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ होईल आणि त्याचबरोबर महागाईच्या दरातही वाढ होणार आहे.
‘गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी रुपये येतील. हाती पैसा आल्याने मागणीत वाढ होईल, अतिरिक्त बचत होईल, त्याचबरोबर पैशाचा पुरवठा वाढल्याने महागाईत वाढ होणे स्वाभाविक आहे. या निर्णयाचे एकूणात संमिश्र परिणाम होतील’, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी येथे सांगितले. म्हणाले. ‘कुणाच्याही हाती पैसा येतो, तो कर, अप्रत्यक्ष कर, बचत अशा मार्गांनी देशाच्या विकासात लागतो आणि त्यामुळे अर्थप्रणालीत पैसा परत येऊन अर्थव्यवस्थेचा आकारही वाढतो. त्यामुळे या पैशातील काही पैसा परत येईल’, असे जेटली म्हणाले. वेतनवाढीपोटी करावा लागणारा एक लाख कोटींचा खर्च उचलण्याच्या स्थितीत मोदी सरकार आहे काय, असे विचारले असता, ‘त्याची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे’, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले. अर्थतज्ज्ञांच्या मते ही वेतनवाढ अर्थव्यवस्थेतील मागणीला चालना देण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि महागाईवर परिणाम होईल. केंद्रीय अर्थसंकल्पात वेतनवाढीसाठी ६० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे वित्तीय तुटीवर यावर्षी फारसा परिणाम होणार नाही, असा तज्ज्ञांचा होरा आहे.
आता कुरबूर करू नका
सातव्या वेतन आयोगानुसारच्या वाढीवर काही कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त करून निदर्शनेही केली. ही वाढ कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर, ‘सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक होणार आहेत. त्यामुळे या वाढीवर उगाच कुरबूर करण्याची वा निदर्शने करण्याची काहीही गरज नाही, असे जेटली म्हणाले.’
महागाईवाढ अपरिहार्यच
अर्थव्यवस्थेत अधिक पैसा आल्यामुळे महागाई वाढणार नाही का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तशी कबुली जेटली यांनी दिली. अशा प्रकारे जादा चलन व्यवहारात आल्याने महागाई वाढणे काहीसे अपरिहार्यच असते, अशी पुस्ती जेटली यांनी जोडली.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या वेतनवाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा येणार असून त्यामुळे मागणीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेचा आकार वाढण्यात मदत होईल. अतिरिक्त बचतीत वाढ होण्यास त्याचा हातभार लागेल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ होईल आणि त्याचबरोबर महागाईच्या दरातही वाढ होणार आहे.
‘गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत १ लाख कोटी रुपये येतील. हाती पैसा आल्याने मागणीत वाढ होईल, अतिरिक्त बचत होईल, त्याचबरोबर पैशाचा पुरवठा वाढल्याने महागाईत वाढ होणे स्वाभाविक आहे. या निर्णयाचे एकूणात संमिश्र परिणाम होतील’, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी येथे सांगितले. म्हणाले. ‘कुणाच्याही हाती पैसा येतो, तो कर, अप्रत्यक्ष कर, बचत अशा मार्गांनी देशाच्या विकासात लागतो आणि त्यामुळे अर्थप्रणालीत पैसा परत येऊन अर्थव्यवस्थेचा आकारही वाढतो. त्यामुळे या पैशातील काही पैसा परत येईल’, असे जेटली म्हणाले. वेतनवाढीपोटी करावा लागणारा एक लाख कोटींचा खर्च उचलण्याच्या स्थितीत मोदी सरकार आहे काय, असे विचारले असता, ‘त्याची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे’, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले. अर्थतज्ज्ञांच्या मते ही वेतनवाढ अर्थव्यवस्थेतील मागणीला चालना देण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि महागाईवर परिणाम होईल. केंद्रीय अर्थसंकल्पात वेतनवाढीसाठी ६० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे वित्तीय तुटीवर यावर्षी फारसा परिणाम होणार नाही, असा तज्ज्ञांचा होरा आहे.
आता कुरबूर करू नका
सातव्या वेतन आयोगानुसारच्या वाढीवर काही कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त करून निदर्शनेही केली. ही वाढ कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर, ‘सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक होणार आहेत. त्यामुळे या वाढीवर उगाच कुरबूर करण्याची वा निदर्शने करण्याची काहीही गरज नाही, असे जेटली म्हणाले.’
महागाईवाढ अपरिहार्यच
अर्थव्यवस्थेत अधिक पैसा आल्यामुळे महागाई वाढणार नाही का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तशी कबुली जेटली यांनी दिली. अशा प्रकारे जादा चलन व्यवहारात आल्याने महागाई वाढणे काहीसे अपरिहार्यच असते, अशी पुस्ती जेटली यांनी जोडली.