अ‍ॅपशहर

नोटाबंदीला महिना झाला; देश अजूनही रांगेतच!

पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आज महिना पूर्ण होत असून महिन्याभरानंतरही बँका व एटीएमसमोरच्या रांगा कमी झाल्या नसल्याचं चित्र आहे. रिझर्व्ह बँकेकडून नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्यानं लोकांना दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतही ठोस काहीच न सांगितल्यानं संभ्रम आणखी वाढला आहे.

Maharashtra Times 8 Dec 2016, 10:25 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a month after demonetisation
नोटाबंदीला महिना झाला; देश अजूनही रांगेतच!


पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आज महिना पूर्ण होत असून महिन्याभरानंतरही बँका व एटीएमसमोरच्या रांगा कमी झाल्या नसल्याचं चित्र आहे. रिझर्व्ह बँकेकडून नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्यानं लोकांना दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतही ठोस काहीच न सांगितल्यानं संभ्रम आणखी वाढला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली. अचानक झालेल्या या घोषणेमुळं जुन्या नोटा बदलण्यासाठी व जमा करण्यासाठी बँकांपुढं रांगा लागल्या. मात्र, नव्या नोटांचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं रांगा वाढत गेल्या. काही दिवसांनी बँकेतून नोटा बदलून देणं बंद करण्यात आलं. मात्र, जुन्या नोटा डिपॉझिट करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत असल्यानं रांगा अजूनही कायम आहेत. दुसरीकडं, एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा लागत आहेत. त्यातच एटीएममधून केवळ दोन हजारांच्या नोटा मिळत असल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे.

महिन्याभरानंतरचं चित्र हे असं आहे...

>> अनेक बँकांकडेही नव्या नोटा नाहीत. टपाल कार्यालयांनाही नोटांच्या टंचाईशी झगडावं लागत आहे. टपाल कार्यालयांना ३० ते ३५ टक्केच नव्या नोटा मिळत आहेत.

>> नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. व्यापारी जुन्या नोटा देत असल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल विकणं कठीण झालं आहे. बटाटे व टोमॅटोसारखी ८० टक्के नगदी पिकं खराब होत आहेत.

>> नोटाबंदीनंतर सरकारनं ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अशा व्यवहारांत फार वाढ झालेली नाही. पेटीएम, मोबिक्विक व फ्री-चार्जसारख्या ऑनलाइन वॉलेट कंपन्या व्यवहार वाढल्याचं सांगत असल्या तरी खुद्द रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ऑनलाइन व्यवहारांना अपेक्षित गती मिळाली नसल्याचं दिसत आहे.

>> नोटाबंदीनंतर शेअर बाजाराचं आकर्षण कमी झालं आहे. गुंतवणकूदारांचा विश्वास काही प्रमाणात कमी झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

>> नोटाबंदीमुळं रोजगार हमी योजनेवरील मजुरांचे पगार रखडले आहेत. चलन तुटवड्यामुळं आठ राज्यांनी मजुरांचं वेतन रोखल्याचं केंद्र सरकारला कळवलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज